शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
2
संभल समितीनं CM योगींना सादर केला अहवाल, करण्यात आले खळबळजनक खुलासे; जिल्ह्यात फक्त १५% हिंदू उरले!
3
भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
4
१ वर्षात केली स्पर्धा परीक्षेची तयारी, पहिल्याच प्रयत्नात यश; MBBS डॉक्टर बनली IAS अधिकारी
5
TCS-एचसीएलसह आयटी क्षेत्रात 'भूकंप'! बाजार ७०६ अंकांनी घसरला; या कारणामुळे मोठी घसरण
6
४ महिन्यांपूर्वी झाले होते लग्न, क्षणार्धात मोडले सुखी संसाराचे स्वप्न; वैष्णो देवी दुर्घटनेत चांदनीने गमावला जीव
7
"माझी एवढीच अपेक्षा आहे की कुठलेही..."; मनोज जरांगेंच्या आंदोलनावर CM फडणवीसांनी मांडली स्पष्ट भूमिका
8
'चिता' झेपावला, जवान बनले 'देवदूत'; मृत्यूच्या दाढेतून २७ जणांना बाहेर काढले, पूरग्रस्त भागात लष्कराची सेवा
9
अमेरिकन लढाऊ विमानाला हवेतच आग लागली, अलास्कामध्ये F-35 विमान कोसळले
10
प्रेमासाठी काय पण! क्वांटम डेटिंग म्हणजे काय, नव्या पिढीमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
11
शी जिनपिंग यांचं सीक्रेट लेटर, मैत्रीसाठी पुढाकार; भारत-चीन संंबंध सुधारण्यामागची Inside Story
12
रोज फोनवर बोलता बोलता मित्राच्या पत्नीवर जीव जडला, अडथळा ठरलेल्या नवऱ्याचा प्रियकरानेच खेळ खल्लास केला! 
13
भयंकर! तांत्रिकाच्या सांगण्यावरून ११ वीतील युवकाचा दिला नरबळी; शीर धडापासून वेगळे केले, अन्...
14
बॉयफ्रेंडने लाथा-बुक्क्यांनी मारलं, सर्व पैसे चोरले, माझं घर घेतलं; प्रसिद्ध गायिकेचा गंभीर आरोप
15
ना चित्रपट ना जाहिरात, तरीही सोनू सूदने कमावले ३.१० कोटी रुपये; काय आहे उत्पन्नाचा स्त्रोत?
16
संतापजनक! मोबाईल दुरुस्ती दुकानातून खाजगी व्हिडीओ लीक, आता येत आहेत वाईट मेसेज
17
पहिलाच टी-२० सामना ठरला शेवटचा; जाणून घ्या 'त्या' ५ भारतीय खेळाडूंबद्दल!
18
AAI Recruitment: एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये नोकरी, निवड झाल्यास दीड लाख पगार!
19
EV सेक्टरच्या शेअरची कमाल! दिला 8600% परतावा, 59 पैशांचा स्टॉक 51 रुपयांवर पोहोचला; करतोय मालामाल
20
पार्थ पवारांनी पैसे दिले, जॅकलिनने लालबागच्या राजाच्या पेटीत टाकले, पाहा VIDEO

कायदे असूनही जनावरांच्या कत्तली सुरूच

By admin | Updated: July 20, 2016 00:33 IST

राज्य शासनाने गाय, बैल, म्हैश, वळू, वासरे या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी त्यांची अवैध कत्तल थांबावी ....

गोवंश हत्याबंदी करा : कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची गरजभंडारा : राज्य शासनाने गाय, बैल, म्हैश, वळू, वासरे या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी त्यांची अवैध कत्तल थांबावी म्हणून महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम १९९५ मार्च २०१५ पासून राज्यात सर्वत्र लागू केला आहे. तरीही जनावरांना कत्तलीकरिता नेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे या कायद्याच्या संदर्भात शासकीयस्तरावर जनजागृती करणे अत्यावश्यक ठरले आहे.महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम १९९५ हा कायदा ४ मार्च २०१५ पासून राज्यातील सर्वच जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. त्या कायद्यानुसार गाय किंवा वासरे, बैल किंवा वळू, दूभत्या म्हशी किंवा तीन महिन्यापर्यंतच्या वयाचा कालवड्या, रेडे किंवा संकरीत गायी यांचा कत्तलीत किंवा कत्तल करण्यासाठी वाहतूक करण्यास कायदेशीर प्रतिबंध घालण्यात आले आहे. गोवंश मांस बाळगण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून अशा गुन्ह्यांना गैरजमानती व दखल पात्र केले आहे. यातून शेतकऱ्यांना स्वमालकीच्या पशुधनाची वाहतूक करावयाची असल्यास तशी तरतूद या अधिनियमात केली आहे. ग्रामीण भागातील पशुधनात घट होऊन जनावरांचे कळप नाहीशे झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीकरिता बैलजोडी मिळणे कठीण झाले आहे. शेतजमिनीला उपयुक्त असणारे शेणखत दुरापास्त झाले आहे. जमिनीची सुपिकता कमी होत आहे. त्याचा विपरित परिणाम अन्नधान्य उत्पादनावर होत आहे. पिकांच्या उत्पादनात मोठी घट होत असून दूधाळू प्राण्यांचेही प्रमाण कमी होत आहे. दुग्धजन्य पदार्थांची कमतरता निर्माण होऊन जनतेला रासायनिक बनावटी कृत्रीम दुग्धजन्य पदार्थ खरेदी करुन सेवन करणे भाग पडत आहे. त्यामुळे मानवी जीवनावर दुष्परिणाम होवून आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या हंगामात बैलजोडी खरेदी करण्याकरिता अल्प भूधारक शेतकऱ्यांना ४० ते ५० हजार रुपये मोजूनच शेतीसाठी बैलजोडी विकत घ्यावी लागत आहे. भविष्यात शेतीकरिता बैलजोडीची साथ राहील किंवा नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असून गोहत्याबंदी कायद्याची व्यापक स्तरावर जनजागृती केल्यास निश्चितच याचा फायदा होवू शकेल. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (शहर प्रतिनिधी)