शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

कायदे असूनही जनावरांच्या कत्तली सुरूच

By admin | Updated: July 20, 2016 00:33 IST

राज्य शासनाने गाय, बैल, म्हैश, वळू, वासरे या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी त्यांची अवैध कत्तल थांबावी ....

गोवंश हत्याबंदी करा : कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीची गरजभंडारा : राज्य शासनाने गाय, बैल, म्हैश, वळू, वासरे या गोवंशीय प्राण्यांच्या रक्षणासाठी त्यांची अवैध कत्तल थांबावी म्हणून महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम १९९५ मार्च २०१५ पासून राज्यात सर्वत्र लागू केला आहे. तरीही जनावरांना कत्तलीकरिता नेण्याचे प्रकार सर्रास घडत आहेत. यामुळे या कायद्याच्या संदर्भात शासकीयस्तरावर जनजागृती करणे अत्यावश्यक ठरले आहे.महाराष्ट्र प्राणी रक्षण सुधारणा अधिनियम १९९५ हा कायदा ४ मार्च २०१५ पासून राज्यातील सर्वच जिल्ह्यात लागू करण्यात आला आहे. त्या कायद्यानुसार गाय किंवा वासरे, बैल किंवा वळू, दूभत्या म्हशी किंवा तीन महिन्यापर्यंतच्या वयाचा कालवड्या, रेडे किंवा संकरीत गायी यांचा कत्तलीत किंवा कत्तल करण्यासाठी वाहतूक करण्यास कायदेशीर प्रतिबंध घालण्यात आले आहे. गोवंश मांस बाळगण्यास प्रतिबंध घालण्यात आला असून अशा गुन्ह्यांना गैरजमानती व दखल पात्र केले आहे. यातून शेतकऱ्यांना स्वमालकीच्या पशुधनाची वाहतूक करावयाची असल्यास तशी तरतूद या अधिनियमात केली आहे. ग्रामीण भागातील पशुधनात घट होऊन जनावरांचे कळप नाहीशे झाले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या मशागतीकरिता बैलजोडी मिळणे कठीण झाले आहे. शेतजमिनीला उपयुक्त असणारे शेणखत दुरापास्त झाले आहे. जमिनीची सुपिकता कमी होत आहे. त्याचा विपरित परिणाम अन्नधान्य उत्पादनावर होत आहे. पिकांच्या उत्पादनात मोठी घट होत असून दूधाळू प्राण्यांचेही प्रमाण कमी होत आहे. दुग्धजन्य पदार्थांची कमतरता निर्माण होऊन जनतेला रासायनिक बनावटी कृत्रीम दुग्धजन्य पदार्थ खरेदी करुन सेवन करणे भाग पडत आहे. त्यामुळे मानवी जीवनावर दुष्परिणाम होवून आजारांना सामोरे जावे लागत आहे. सध्याच्या हंगामात बैलजोडी खरेदी करण्याकरिता अल्प भूधारक शेतकऱ्यांना ४० ते ५० हजार रुपये मोजूनच शेतीसाठी बैलजोडी विकत घ्यावी लागत आहे. भविष्यात शेतीकरिता बैलजोडीची साथ राहील किंवा नाही, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी लोकसहभाग आवश्यक असून गोहत्याबंदी कायद्याची व्यापक स्तरावर जनजागृती केल्यास निश्चितच याचा फायदा होवू शकेल. याकडे शासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची नितांत गरज आहे. (शहर प्रतिनिधी)