शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

केसलवाड्यात डेंग्यूचा उद्रेक

By admin | Updated: June 22, 2014 23:52 IST

मोहाडी तालुक्यातील केसलवाडा (पालोरा) येथे डेंग्यूचा उद्रेक झालेला असून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गावात डेंग्यूचा पसार झालेला असताना आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त आहे.

सहा रुग्ण आढळले : आरोग्य यंत्रणा सुस्त, रुग्णांमध्ये बालकांचा समावेशयुवराज गोमासे - करडी (पालोरा) मोहाडी तालुक्यातील केसलवाडा (पालोरा) येथे डेंग्यूचा उद्रेक झालेला असून सहा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. गावात डेंग्यूचा पसार झालेला असताना आरोग्य यंत्रणा मात्र सुस्त आहे. प्रभावी नियंत्रणासाठी कोणतीही उपाययोजना करण्यात आलेली नाही. रुग्ण तुमसर येथील खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे. मोहाडी तालुक्यातील केसलवाडा येथे डेंग्यूचा प्रकोप जाणवला असून आतापर्यंत सहा रुग्णांना याची लागण झाल्याचै वैद्यकीय तपासणीअंती स्पष्ट झाले आहे. आजारी रुग्णांमध्ये प्रणय रामेश्वर मेश्राम (११), प्रेम गौरीशंकर देवगडे (१२), साक्षी अरविंद साठवणे (३) तेजस अशोक साठवणे (४), आचल अशोक साठवणे, रुपेश हिरालाल साठवणे या बालकांचा समावेश आहे. सर्व रुग्ण तुमसर येथील अग्रवाल यांच्या खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. त्यापैकी चार रुग्णांना नुकतीच सुटी देण्यात आली असून प्रणय मेश्राम व प्रेम देवगडे आजही रुग्णालयात उपचार घेत आहेत. गावात आणखी रुग्ण आजारी आढळून आले. रुग्ण योग्य उपचाराअभावी त्रस्त आहेत. मात्र कुणीही त्यांच्या व्यथांकडे लक्ष द्यायला तयार नाही अशी अवस्था आहे. फक्त ७५० लोकसंख्या असलेल्या केसलवाडा गावात सहा रुग्ण आढळून आल्याने नागरिकात भितीचे वातावरण आहे. पावसाळ्यात पुन्हा डेंग्यूचा उद्रेक वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एकाच वेळी मोठ्या संख्येने डेंग्यू रुग्ण आढळून आल्याने आरोग्य विभाग व त्यांची यंत्रणा खडबडून जागी व्हायला पाहिजे होती. परंतु तसे झाले नाही. आरोग्य विभागाच्या एकाही अधिकाऱ्याने भेट दिलेली नाही. गावाचा सर्व्हे व रुग्ण तपासणी करण्यात आलेली नाही. रक्त तपासणी व पाण्याचे नमूनेही घेण्यात आलेले नाही किंवा नागरिकांनी घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले नाही.करडी व पालोरा येथे सुद्धा डेंग्यूचा उद्रेक जाणवला असताना आरोग्य विभागाने धडा शिकलेला नाही. त्यामुळे परिसरातील अनेक गावातून डेंग्यूचा उद्रेक होताना दिसत असल्याची भावना नागरिकांत व्यक्त होत आहे. जि.प. सदस्य महेंद्र शेंडे यांनी केसलवाडा गावाला भेट देऊन गावाची पाहणी केली. आरोग्य विभागाला गावात शिबिर लावण्याची, गावाचा सर्व्हे व रुग्ण तपासणी करण्यासाठी कळविले. ग्रामपंचायत प्रशासनाला सुद्धा नाल्यांची साफ सफाई व सांडपाण्याचा निचरा करण्यासाठी उपाययोजना करण्यास सुचविले. यावेळी सरपंच नत्थू इनवाते, शामराव गजबे, ओबीसी छावा संग्राम तालुकासचिव उमेश तुमसरे, यादोराव साठवणे, अरविंद साठवणे, विरेंद्र रंगारी, अन्नू सपाटे, भूपेंद्र पवनकर व गावकरी उपस्थित होते.