शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
2
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
3
सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
4
Vat Purnima 2025: कशी करावी वटपौर्णिमेच्या पूजेची तयारी? जाणून घ्या साहित्य, विधी आणि शुभ मुहूर्त!
5
राजा रघुवंशी हत्येप्रकरणात नवा ट्विस्ट...! सोनमचा मोठा दावा, स्वतःला सांगतेय निर्दोष; अशी पोहोचली गाझीपूरला
6
Viral Video : मुलीला इम्प्रेस करायला गेला अन् पचका झाला! तरुणाचा व्हिडीओ बघून तुम्हीही म्हणाल अरेरे..
7
३००० गाड्या वाहून नेणाऱ्या जहाजाला भीषण आग! ७५० इलेक्ट्रिक कार धोक्यात; आगीचं नेमकं कारण काय?
8
Sonam Raghuvanshi : नेपाळला पळून जाण्याचा होता सोनमचा प्लॅन?, कोणीही ओळखू नये म्हणून 'अशी' लढवली शक्कल
9
ज्योतिषानं सांगितलेली २ भविष्यवाणी खरी ठरली; राजा-सोनम लग्नाआधी अन् नंतर काय घडले?
10
"मोदी सरकार उत्सव करत असताना लोक रेल्वेतून पडून मेली" मुंब्रातील घटनेवरून राहुल गांधी बरसले
11
'छावा'नंतर महाराष्ट्रातील 'या' तमाशा कलावंतावर लक्ष्मण उतेकर बनवणार सिनेमा? श्रद्धा कपूर साकारणार भूमिका
12
Vat Purnima 2025 Wishes: वटपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! जोडीदाराला पाठवा आणि स्टेटसला ठेवा 'हे' प्रेमळ संदेश
13
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
14
'रेल्वे मंत्री आहेत की रील मंत्री?' मुंबई रेल्वे दुर्घटनेवरून आदित्य ठाकरेंची केंद्रावर टीका
15
मुंबईला जाणाऱ्या मालवाहू जहाजात स्फोट, ५० कंटेनर समुद्रात पडले; ४ कर्मचारी बेपत्ता
16
ना युक्रेन, ना ब्रिटन, 'हा' देश रशियाचा शत्रू नंबर वन; हिटलरशी आहे थेट कनेक्शन, कारण...
17
भारताच्या कंपन्यांवर टाळं लावण्याच्या प्रयत्नात पाकिस्तानचा मित्र चीन! आपली काय आहे तयारी?
18
परप्रातांमधून मुंबईत आदळणारे लोंढेच जबाबदार; मुंबईत मुंब्रा घटनेवरून राज ठाकरेंचा संताप
19
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशीची हत्या करणारे हेच ते; आरोपींचे फोटो आले समोर, सोनमसोबत रचला भयंकर कट
20
लोकलमधील पोलला घट्ट धरून ठेवलं म्हणून, नाहीतर..; अपघातातून बचावलेल्या मच्छिंद्रने सांगितली आपबिती

दुष्काळग्रस्तांना कर्जमाफी देण्याची मागणी

By admin | Updated: January 30, 2016 00:54 IST

तालुक्यातील धोप व ताडगाव परिसरातील शेतकऱ्यांना या वर्षी पीक झाले नसून या दोन्ही गावांची पैसेवारी २९ पैसे निघाली ...

तहसीलदारांना निवेदन : धोप, ताडगावासीयांची मागणीमोहाडी : तालुक्यातील धोप व ताडगाव परिसरातील शेतकऱ्यांना या वर्षी पीक झाले नसून या दोन्ही गावांची पैसेवारी २९ पैसे निघाली असल्याने येथील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, तसेच सोरणा तलावात बावनथडी प्रकल्पाचा पाणी सोडण्यात यावा, अशी मागणी ग्रामपंचायत धोप व ग्रामवासी यांनी तहसीलदार मोहाडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.धोप व ताडगाव जवळील सोरणा तलावात फक्त २० टक्के जलसाठा उपलब्ध होता. पाऊस न आल्यामुळे तसेच तलावात पाणी नसल्याने या दोन्ही गावातील शेतकऱ्यावंर नापिकीची पाळी आली. तसेच ज्यांचे थोडेफार पिक झाले होते त्यांचा किडीच्या प्रादुर्भावाने पूर्ण तनसीत रूपांतर झाले. अशा परिस्थितीत जगायचे कसे असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. शासनाच्या सर्व्हेक्षणाद्वारे या दोन्ही गावांची आणेवारी २० पैसे काढण्यात आली असून या दोन्ही गावांना दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहे.त्यामुळे या दोन्ही गावातील शेतकऱ्यांना पुर्ण कर्जमाफी देण्यात यावी, वीज बिल माफ करण्यात यावे, नुकसान भरपाई देण्यात यावी तसेच अशी परिस्थिती पुन्हा शेतकऱ्यावर येवू नये, यासाठी बावनथडी प्रकल्पाचा एक कालवा सोरणा तलावात जोडण्यात यावा व सोरणा तलावाची साठवण क्षमता वृद्धी करावी अशा मागण्या करण्यात आल्या असून मागण्या पूर्ण न झाल्यास तिव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला असून रास्ता रोको करण्याचा सुद्धा इशारा देण्यात आला आहे.निवेदन देताना सरपंच मंगला पिकलमुंडे, कृष्णा पिंगरे, वर्षा नागलवाडे, केवलचंद कांबळे, नरेंद्र पिकलमुंडे, किरण अतकरी, प्रभु मोहतुरे, अरुण तितीरमारे, श्याम कांबळे, केशव बांते, चंगेज खान, दिलीप ढोसरे, गणेश पाटील, केवल कांबळे, निलकंठ गिरीपुंजे, राजेश शेंडे, संजय पाटील, रवि सपाटे, मणिराम निमकर, पुरूषोत्तम शेंडे, उरकुडा राखडे, गुड्डू बांते, संतोष उके, दुर्गा सपाटे, शारदा भोयर आदी गावकरी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)