शहरं
Join us  
Trending Stories
1
आजचा अग्रलेख: तेलाचा भडका निश्चित!
2
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
3
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
4
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
5
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
विशेष लेख: नायजेरियात पाण्यावरून वाद: १०,००० ठार!
8
लेख: शहरे 'एक्स्प्रेस' धावत सुटली, गावखेड्यांनी काय करायचे?
9
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
10
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
11
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
12
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
13
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
14
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
15
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
16
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
17
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
18
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
19
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
20
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू

कृषी विभागाला तांत्रिक दर्जा देण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:24 IST

भारत कृषी प्रधान देश आहे. आजही देशाची ६५ टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात शेतीवर आधारित व्यवसायाशी निगडित आहे. या ...

भारत कृषी प्रधान देश आहे. आजही देशाची ६५ टक्के लोकसंख्या ही ग्रामीण भागात शेतीवर आधारित व्यवसायाशी निगडित आहे. या विभागाच्या उन्नतीचे काम शासनाच्या कृषी विभागामार्फत केले जाते. विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शन केले जातात. त्यांच्या समस्या व अडचणी लक्षात घेऊन समस्यांचे निराकरण केले जाते, परंतु कृषी विभागात तांत्रिक काम करणाऱ्या अधिकारी अथवा कर्मचाऱ्यांना अजूनही तांत्रिक दर्जा प्रदान करण्यात आलेला नाही. शासनाच्या वतीने अभियंता व वैद्यकीय (एमबीबीएस, बीएएमस, व्हेटनरी) सेबेला तांत्रिक दर्जा देण्यात आलेला आहे, परंतु कृषी विभागात कार्यरत होण्यासाठी आवश्यक कृषी पदवी व पदविका, तसेच प्रमाणपत्रधारकांना शासनाने तांत्रिक दर्जा दिलेला नाही. व्यावसायिक दर्जा दिलेला आहे.

ज्या विभागावर देशातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचाविण्याचा भार आहे. शेतकऱ्यांच्या प्रगतीचा कणा मानल्या जातो. त्याच कृषी विभागासंबंधी शासनाचे दुर्लक्षितपणाचे धोरण आहे. त्यामुळे आजही शेतकऱ्यांची पाहिजे तशी प्रगती झालेली नाही. अजूनही व्यवसायिक दर्जा आहे. शासनाने प्रकरणी गांभीर्याने विचार करीत कृषी क्षेत्रालाही तांत्रिक दर्जा देण्याची मागणी शेतकरी व कृषी महाराष्ट्र कृषी समन्वय महासंघाचे जिल्हाध्यक्ष गणेश शेंडे यांनी केली आहे.