करडी (पालोरा) : करडी परिसरातील साझ्यांमध्ये चार तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. शेतीच्या हंगामाला सुरूवात झाली असताना, नागरिकांना विविध कामांसाठी तलाठ्यांच्या कागपत्रांची आवश्यकता असताना रिक्त पदे असल्याने गैरसोय होत आहे. त्वरीत रिक्तपदे भरण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष उमेश इलमे व कार्यकर्त्यांकडून होत आहे.करडी परिसरातील अनेक साझ्यांमध्ये तलाठ्यांची पदे रिक्त आहेत. रिक्त साझ्यांमध्ये देव्हाडा, करडी व मुंढरी बु. येथील तलाठ्यांची बढती झाल्याने पदे रिक्त आहेत तर मोहगाव येथील तलाठी सेवा निवृत्त झाल्याने जागा रिकामी आहे. पदे रिकामी असताना अजुनही पदे भरलेली नाही.इतर तलाठ्यांना प्रभार सोपविण्यात आला आहे. ऐन शेतीच्या हंगामात प्रभार मिळाल्याने तलाठ्यांची गैरसोय होत आहे.शिवाय नागरिकांची कामेही खोळंबली आहेत. तलाठी मिळत नसल्याची ओरड संपूर्ण परिसरात ऐकावयास मिळत आहे. शेतकऱ्यांना विविध कागपत्रांची गरज असताना तलाठी मिळत नसल्याने असंतोषाचे वातावरण आहे. शैक्षणिक कामासाठी मुलांना, पालकांना प्रमाणपत्रे व दाखले हवे असताना तेही वेळेवर मिळत नसल्याने नागरिक वैतागले आहेत. परिसरातील चार रिक्त पदे त्वरित भरण्यात यावी. नागरिकांची गैरसोय दूर करण्यात यावी अन्यथा आंदोलनाचा इशारा जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष उमेश इलमे, हेमंत भडके, वासू कडव, भूषण बांते, राजेश भडके यांनी दिला आहे. (वार्ताहर)
तलाठ्यांची चार पदे रिक्त$$्रिकामाचा बोजवारा : राष्ट्रवादी युवक काँग्रेसची मागणी
By admin | Updated: June 21, 2014 23:50 IST