शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांच्या आर्थिक मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

कोंढा-कोसरा : ' ब्रेक द चेन ' अंतर्गत राज्यसरकारने सर्वत्र संचारबंदी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची व शेती ...

कोंढा-कोसरा : ' ब्रेक द चेन ' अंतर्गत राज्यसरकारने सर्वत्र संचारबंदी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची व शेती व्यवसायाशी संबंधित काम करणारे बारा बलुतेदार हे कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. दररोज कामे करून उदरनिर्वाह करणारे बारा बलुतेदार यांच्यावर आज संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत देऊन शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे बारा बलुतेदारातील लोहार, चांभार, धोबी, न्हावी, सुतार, कुंभार, सोनार, गवळी, गुरव, चांभार, बेलदार, मातंग यांच्यावर रोजगाराचे मोठे संकट उभे झाले आहे. अठरा अलुतेदार असलेले कासार, गोंधळी, कोरव, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, माळी, जोशी, भाट, जंगम, शिंपी, सनगर, साळी, वाजंत्री आणि मुस्लीम समाजातील बारा बलुतेदार आत्तार, कुरेशी, छप्परबंद, तांबोळी, पिंजारी, फकीर, बागवान, मदारी, मन्यार, मोमीन, मिसगर आणि घोड्याची नाल बनविणारे शिकलगार यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वी या बलुतेदार व अलुतेदारांकडे वतने होती. आता ती नष्ट झाल्याने काम केल्याशिवाय यांच्या घरी चुली पेटत नाहीत. यातही अनेकजण भटके जीवन जगतात तर काही जातीचे लोक रस्त्याच्या कडेला आपली दुकाने मांडून कामे करीत आहेत. औद्योगिक प्रगती झाल्याने अनेकांचे कामधंदे बंद पडले. सध्या हया सर्व जाती अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त व भटक्या जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय जातीत त्यांचा समावेश आहे. सद्य परिस्थितीत बलुतेदारांचे धंदे बंद पडले आहेत. मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये देखील यांना मोठ्या कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. परंतु सरकारने एक रुपयाही मदत केली नाही. यावेळी देखील १५ एप्रिलला संचारबंदी लागू केल्याने अनेकांची रोजीरोटी बुडाली आहे. बलुतेदार मधील अनेक जातीची गंभीर परिस्थिती आहे.

लोहार, चांभार, न्हावी, धोबी, कुंभार ,मातंग समाजाची सध्या पूर्ण धंदे बंद पडल्याने उपासमार सुरू झाली आहे. १८ अलुतेदार असलेल्या व भटके जीवन जगणारे गोंधळी, गोसावी, भाट, वाजंत्री, भोई (धिवर) यांची देखील जगणे मुश्किल झाले आहे. तसेच मुस्लिम समाजातील शिकलगार, छप्परबंद, पिंजारी, फकीर, मदारी यांची अवस्थाही बिकट झाली आहे. तेव्हा महाविकास आघाडी सरकारने अनेक व्यावसायीकांना संचारबंदीच्या काळात मदतीचा हात दिला तसाच बलुतेदार व अलुतेदारांनाही आर्थिक मदतीची मागणी जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, जिल्हा लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा. चरणदास बावने व बेलदार संघटनेचे राजेश यलशेट्टीवार यांनी शासनाकडे केली आहे.