शहरं
Join us  
Trending Stories
1
ब्लॅकमेल करणाऱ्या प्रेयसीचा खून, मृतदेह दौलताबाद घाटात फेकून प्रियकर पोलिस ठाण्यात हजर
2
"आम्ही ओबीसींच्या हिताचं रक्षण करू शकलो नाही", राहुल गांधींनी चूक मान्य केली; आता दिलं मोठं आश्वासन
3
चालत गेली अन् शाळेच्या चौथ्या मजल्यावरून मारली उडी; दहावीतील विद्यार्थिनीचा व्हिडीओ आला समोर
4
गिलनं ज्याला वेटिंगवर ठेवलं तोच कामी आला! ओली पोप पाठोपाठ ब्रूकही वॉशिंग्टनच्या 'सुंदर' चेंडूवर फसला
5
दोन रुग्णवाहिका घेऊन सासरी पोहोचला जावई, २०-२५ जण उतरले, मारहाण, तुफान राडा, कारण काय?
6
Mhada Lottery 2025: म्हाडाच्या लॉटरीत लागलेले घर भाड्याने देऊ शकतो का? जाणून घ्या नियम!
7
Sarzameen Movie Review: देशभक्तीच्या पार्श्वभूमीवरील पिता-पुत्राची भावनिक कथा 'सरजमीं'
8
"नरेंद्र मोदी मोठी समस्या नाहीत, त्यांच्यात ..."; विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांचा मोठा हल्ला!
9
मुंबई लोकलमध्ये ६२ कोटी रुपयांचे मोबाईल चोरीला; किती लोकांना परत मिळाले? 
10
चीनचा Bajaj ला मोठा धक्का; ऑगस्टपासून बंद होऊ शकते EV चे उत्पादन, कारण काय..?
11
‘५६ लाख घुसखोर आले कसे? तुम्ही राजीनामाच द्या’, महुआ मोईत्रांनी अमित शाहांना सुनावले  
12
Bank Job 2025: बँक ऑफ बडोदामध्ये मॅनेजर, सिनियर मॅनेजर पदांसाठी भरती; संधी सोडू नका!
13
'एक नंबर'! 'लोकमत डॉट कॉम'सोबत वाचकांची 'महायुती'; ६,२१,५३,००० 'लोकमतां'सह घेतली 'महाआघाडी'
14
फहाद फासिलनं सांगितले त्याचे आवडते '५' चित्रपट, तुम्ही पाहिलेत का?
15
पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारायला तयार; मंत्रि‍पदाच्या चर्चांवर राहुल नार्वेकरांचे सूचक विधान
16
एक दोन नाही तर २५००० कर्मचाऱ्यांची कपात होणार, एप्रिलनंतर आता पुन्हा एकदा Intel च्या कर्मचाऱ्यांवर संकट
17
"...हे विरोधी पक्ष ठरवू शकत नाही"; लोकसभेत प्रचंड गोंधळ, कोणत्या मुद्द्यावर केंद्रीय मंत्री भडकले?
18
'माझ्या मनावर ओझं पण...' ९००० कर्मचाऱ्यांना काढल्यानंतर सत्या नाडेला यांनी अखेर मौन सोडले; म्हणाले...
19
सरकार आता आमची गेलेली मुलं परत आणून देऊ शकतं का? शाळा दुर्घटनेनंतर पालकांचा आक्रोश
20
31 जुलैपासून सुरू होणार 'या' कंपनीचा कार प्लांट, दर वर्षी बाहेर पडणार 1.50 लाख इलेक्ट्रिक कार!

बारा बलुतेदार व अठरा अलुतेदारांच्या आर्थिक मदतीची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:33 IST

कोंढा-कोसरा : ' ब्रेक द चेन ' अंतर्गत राज्यसरकारने सर्वत्र संचारबंदी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची व शेती ...

कोंढा-कोसरा : ' ब्रेक द चेन ' अंतर्गत राज्यसरकारने सर्वत्र संचारबंदी लावली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील शेतीची व शेती व्यवसायाशी संबंधित काम करणारे बारा बलुतेदार हे कोरोनामुळे आर्थिक संकटात सापडले आहेत. दररोज कामे करून उदरनिर्वाह करणारे बारा बलुतेदार यांच्यावर आज संचारबंदीमुळे उपासमारीची वेळ आली आहे. शासनाने त्यांना आर्थिक मदत देऊन शासकीय मदत देण्याची मागणी होत आहे.

कोरोना संसर्ग वाढत असल्याने राज्यात सर्वत्र संचारबंदी लागू आहे. त्यामुळे बारा बलुतेदारातील लोहार, चांभार, धोबी, न्हावी, सुतार, कुंभार, सोनार, गवळी, गुरव, चांभार, बेलदार, मातंग यांच्यावर रोजगाराचे मोठे संकट उभे झाले आहे. अठरा अलुतेदार असलेले कासार, गोंधळी, कोरव, गोसावी, घडसी, ठाकर, डवऱ्या, तराळ, तांबोळी, तेली, माळी, जोशी, भाट, जंगम, शिंपी, सनगर, साळी, वाजंत्री आणि मुस्लीम समाजातील बारा बलुतेदार आत्तार, कुरेशी, छप्परबंद, तांबोळी, पिंजारी, फकीर, बागवान, मदारी, मन्यार, मोमीन, मिसगर आणि घोड्याची नाल बनविणारे शिकलगार यांच्यावरही उपासमारीची वेळ आली आहे. पूर्वी या बलुतेदार व अलुतेदारांकडे वतने होती. आता ती नष्ट झाल्याने काम केल्याशिवाय यांच्या घरी चुली पेटत नाहीत. यातही अनेकजण भटके जीवन जगतात तर काही जातीचे लोक रस्त्याच्या कडेला आपली दुकाने मांडून कामे करीत आहेत. औद्योगिक प्रगती झाल्याने अनेकांचे कामधंदे बंद पडले. सध्या हया सर्व जाती अनुसूचित जाती, अनुसुचित जमाती, विमुक्त व भटक्या जाती, जमाती आणि इतर मागासवर्गीय जातीत त्यांचा समावेश आहे. सद्य परिस्थितीत बलुतेदारांचे धंदे बंद पडले आहेत. मागील वर्षीच्या लाॅकडाऊनमध्ये देखील यांना मोठ्या कठीण प्रसंगाला तोंड द्यावे लागले होते. परंतु सरकारने एक रुपयाही मदत केली नाही. यावेळी देखील १५ एप्रिलला संचारबंदी लागू केल्याने अनेकांची रोजीरोटी बुडाली आहे. बलुतेदार मधील अनेक जातीची गंभीर परिस्थिती आहे.

लोहार, चांभार, न्हावी, धोबी, कुंभार ,मातंग समाजाची सध्या पूर्ण धंदे बंद पडल्याने उपासमार सुरू झाली आहे. १८ अलुतेदार असलेल्या व भटके जीवन जगणारे गोंधळी, गोसावी, भाट, वाजंत्री, भोई (धिवर) यांची देखील जगणे मुश्किल झाले आहे. तसेच मुस्लिम समाजातील शिकलगार, छप्परबंद, पिंजारी, फकीर, मदारी यांची अवस्थाही बिकट झाली आहे. तेव्हा महाविकास आघाडी सरकारने अनेक व्यावसायीकांना संचारबंदीच्या काळात मदतीचा हात दिला तसाच बलुतेदार व अलुतेदारांनाही आर्थिक मदतीची मागणी जिल्हा मच्छीमार संघाचे अध्यक्ष प्रकाश पचारे, जिल्हा लोहार समाज संघटनेचे अध्यक्ष प्रा. चरणदास बावने व बेलदार संघटनेचे राजेश यलशेट्टीवार यांनी शासनाकडे केली आहे.