शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
3
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
4
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
5
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
6
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
7
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
8
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
9
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
10
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
11
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
12
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
13
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
14
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
15
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
16
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
17
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
18
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
19
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
20
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत

पवनी तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST

यावर्षी धानाचा उतारा अतिशय कमी प्रमाणात आहे. धानावर अनेक जातीच्या किडयांनी मारा केल्याने बहुतांश शेतकऱ्यांना अत्यल्प धानाचे पीक झाले. ...

यावर्षी धानाचा उतारा अतिशय कमी प्रमाणात आहे. धानावर अनेक जातीच्या किडयांनी मारा केल्याने बहुतांश शेतकऱ्यांना अत्यल्प धानाचे पीक झाले. तसेच अवकाळी पाऊस दोन - तीनदा आल्याने यावेळी शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले. अनेकांना धानाचे पीक शेती जेवढी तेवढे पोते धान झाले, त्यामुळे खर्च निघणे मुश्किल झाल्याने जीवन जगणे कठीण झाले आहे. या बिकट अवस्थेमुळे अनेक शेतकरी यावर्षी बँका, सहकारी संस्था यांचे कर्ज फेडू शकत नाहीत. त्यामुळे अशावेळी शेतकऱ्यांना पीक विमा योजनेचा लाभ मिळणे आवश्यक आहे. महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी पवनी तालुक्यातील ८९ गावांची आणेवारी ५० पैसेपेक्षा कमी असल्याचे जाहीर केले आहे. ५२ गावांची आणेवारी ५० पैसेपेक्षा अधिक प्रमाणात आहे. तेव्हा ८९ गावे दुष्काळाच्या छायेत असल्याने संपूर्ण तालुका दुष्काळी जाहीर करणे आवश्यक आहे. कमी आणेवारी असलेल्या गावात अनेक सवलती मिळत असतात. ज्यात जमीन महसूल यात सूट, शेतकरी पाल्यांना परीक्षा शुल्क माफ, नरेगा कामे प्राधान्याने करणे, शेतकरी लोकांना अनेक सवलती दिल्या जातात. यावर्षी दुष्काळी परिस्थिती असल्याने संपूर्ण पवनी तालुका दुष्काळी जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.