शहरं
Join us  
Trending Stories
1
अफगाणिस्तानचे मंत्री भारतात येताच काबुल भीषण स्फोटांनी हादरले; हवाई हल्ले केल्याचा दावा
2
आजचे राशीभविष्य- १० ऑक्टोबर २०२५: अचानक धन प्राप्ती होईल, अविवाहितांचे विवाह ठरू शकतील
3
₹१३०० ची गुंतवणूक आणि आयुष्यभर मिळेल पेन्शन? जबरदस्त आहे LIC हा प्लान, आयुष्यभर राहाल टेन्शन फ्री
4
ब्रिटनच्या ९ विद्यापीठांचे कॅम्पस भारतात; पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांची घोषणा 
5
वीज कामगारांचा एल्गार; खासगीकरणाविरोधात कामगार एकवटला, मेस्मा कायदा लावला तरी ७० टक्के कर्मचारी सहभागी
6
बँका देणार ग्राहकांना झटका; १ नोव्हेंबरपासून ऑनलाइन सेवांसाठी शुल्क वाढवण्याची तयारी सुरू
7
२०० वर्षांनी सूर्य-चंद्राचा दुर्मिळ योग: ५ राशींना चौफेर लाभ, सुख-भरपूर पैसा; शुभ-वरदान काळ!
8
संपादकीय: मुंबईला नवी ‘गती’; गुजरात सीमेवरील जिल्ह्यात चौथी मुंबई...
9
चिराग यांच्यामुळे रालोआ अस्वस्थ; ‘रुसून’ बसल्याने जागावाटप रेंगाळले   
10
अजितदादा हल्ली इतके कसे बदलले? सरकारमधील निर्णय त्यांच्या मनाप्रमाणे होत नाहीत, तरीही...
11
नव्या युद्धासाठी रशियाचं चीनला गुप्त ट्रेनिंग; तैवानवर हल्ला करणार?
12
६७,१९४ जणांचा जीव घेतल्यानंतर अखेर युद्ध थांबले, ट्रम्प योजनेवर पॅलेस्टाइन- इस्रायल झाले तयार
13
आयपीएस अधिकाऱ्याला वरिष्ठांनी छळले, वडिलांचे अंत्यदर्शनही घेऊ दिले नाही
14
राज्यातील रस्ते, वस्त्यांची जातिवाचक नावे बदलणार
15
राज्य सरकारच्या जीआरमुळे ओबीसी समाज अस्वस्थ; आज काढणार मोर्चा
16
अँटिलिया स्फोटकेप्रकरणी एनआयए न्यायालयाने सचिन वाझेचा खटला रद्द करण्याचा अर्ज फेटाळला
17
दिवाळी पर्यटनात यंदा विक्रमी वाढ; सणांची सुट्ट्या आणि धार्मिक प्रवासाशी सांगड 
18
मुंबईकर खूश... तासाभराचा प्रवास अवघ्या १५ मिनिटांवर; विधानभवन मेट्रो स्थानकाचे प्रवेशद्वार बंद करण्याची वेळ
19
६० दिवसांचे भाडे भरा, ९० दिवस आरामदायक प्रवास करा; एसटीच्या ई-बससाठीही आता त्रैमासिक पास
20
सलीम डोलासह छोटा शकीलचा भाऊ अन्वर शेखचा शोध सुरू

भूसंपादन अध्यादेश रद्द करण्याची मागणी

By admin | Updated: March 2, 2015 00:59 IST

आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया (एपीआय) जिल्हा शाखा-भंडाराच्यावतीने भूसंपादन अध्यादेश २०१४ रद्द करण्यासाठी प्रधानमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.

भंडारा : आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडिया (एपीआय) जिल्हा शाखा-भंडाराच्यावतीने भूसंपादन अध्यादेश २०१४ रद्द करण्यासाठी प्रधानमंत्री यांना जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन देण्यात आले.भूसंपादन अध्यादेश २०१४ नुसार सरकारने भूसंपादन अधिनियम २०१३ मध्ये काही बदल केला असून सदरचा अध्यादेश हा शेतकरी व भूमिहीन लोकांच्या विरुध्द आहे. हा अध्यादेश संसदेमध्ये पारित न करता महामहीम राष्ट्रपतींद्वारे लागू करण्यात आला आहे. हे कृत्य संविधानातील स्वातंत्र्य, समता, बंधूत्व व न्याय या मूलभूत सिध्दांताना तिलांजली देण्याचे काम दिसून येत आहे. भूसंपादन अध्यादेश २०१४ मधील तरतूदी शेतकरी व भूमीहीन शेतकऱ्यांच्या विरुध्द असून यानुसार फक्त मोठ्या उद्योगपतींचे हित जोपासण्यात आले आहे.या अध्यादेशाविरुध्द आंबेडकराईट पार्टी आॅफ इंडियाने संविधानिक मार्गाने समस्त देशवासींच्या हितासाठी एकाच वेळेस ३०० जिल्हयांमध्ये जनआंदोलन करण्यात आले होते. हा भूसंपादन अध्यादेश परत घेवून भूसंपादन अधिनियम २०१३ पुन्हा लागू करावा अशी मागणी निवेदनामार्फत प्रधानमंत्री यांना पाठविण्यात आली आहे. शिष्टमंडळात भंडारा जिल्हा संयोजक प्रमोद सुखदेवे, श्याम डोंगरे, सुरेश भोवते, अरुण भौतिक, परमानंद मेश्राम, चंदनलाल घरडे, नंदागवळी व आशा भोंगाडे व इतर हजर होते. (नगर प्रतिनिधी)