शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

रस्त्यावरील अतिक्रमण हटवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:24 IST

गोरेगाव : वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी ...

गोरेगाव : वहिवाटीच्या रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यात यावे, तसेच शेतकऱ्यांना शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात यावा, या मागणीसाठी जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयाला वारंवार पत्र दिले; पण त्याची अद्यापही दखल घेण्यात आलेली नाही. जमिनीची मोजणी करूनसुद्धा अतिक्रमण हटविण्यात आले नाही; त्यामुळे त्रस्त झालेल्या शेतकऱ्याने सोमवारपासून (दि.२१) आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे.

प्राप्त माहितीनुसार पुरणलाल आसाराम पारधी यांची तालुक्यातील कलपाथरी येथील भू. क्र. १७ (सरकार)वर लगतच्या शेतकऱ्यांनी वहिवाटी रस्त्यावर केलेले अतिक्रमण, महसूल विभागाने अद्यापही हटविलेले नाही. पुरणलालने अनेक वेळा प्रशासकीय अधिकाऱ्यांची वारंवार भेट घेऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी करूनसुद्धा गैरअर्जदाराचे अतिक्रमण काढण्यात आले नाही. या संदर्भात अर्जदाराला १५ जूनला तोंडी तारीख देण्यात आली होती; परंतु अजूनपर्यंत कोणतीच नोटीस दोन्ही पक्षांना मिळालेली नाही. सध्या शेतीचा हंगाम सुरू झालेला आहे. अर्जदाराला शेतात पिकाची पेरणी करण्यासाठी ये-जा करण्यासाठी त्रास सहन करावा लागत आहे. पुरणलाल पारधी यांनी १६ जूृनला तहसीलदारांच्या आदेशावर भूमिलेख मंडळ अधिकारी मेश्राम व तलाठी पंचबुद्ये यांनी मोका पंचनामा केला; परंतु अद्यापही अतिक्रमण काढण्यात आले नाही. गैरअर्जदाराने रोवलेल्या खुंट्या काढून फेकल्या व शासकीय नियमाचे उल्लंघन केल्याने गुन्हा दाखल करण्यात यावा. जोपर्यंत आपल्या शेतात जाण्यासाठी रस्ता मोकळा करून देण्यात येत नाही; तोपर्यंत आमरण उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा पारधी यांनी दिला आहे.