भंडारा
यावेळी
जिया
जिया
पटेल हे नागपुरात राहून भंडार्याच्या कारभार पाहत असल्याचा आरोप करुन ते म्हणाले, जिल्हा काँग्रेस पक्षात कोणताही ताळमेळ राहिलेला नाही. संघटनात्मक निवडणुकीत निवडून आलेल्या शहर अध्यक्षांना हटवून नवीन शहर अध्यक्ष नेमण्यात आले. आजघडीला जिल्हा परिषद, पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात नाहीत. याला एककल्ली कार्यक्रम जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री रणजित कांबळे यांच्याशी प्रभारी जिल्हाध्यक्षांचा संवाद नाही. त्यामुळे पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत. आमचा पालकमंत्र्यांना विरोध नाही. आमचा विरोध जिल्हाध्यक्षांना असून पुर्णवेळ जिल्हाध्यक्ष नेमण्यात यावा, यासाठी आम्ही जिल्ह्यातील काँग्रेसच्या वरीष्ठ पदाधिकार्यांकडे आग्रह धरणार असल्याचे पदाधिकार्यांचे म्हणने आहे. पत्रपरिषदेला काँग्रेसचे शहर सचिव प्रमोद मानापुरे, शहर उपाध्यक्ष प्रकाश डोणेकर, नगरसेवक पृथ्वीराज तांडेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) पटेल हे एकीकडे प्रदेश कमिटीत सदस्य आहेत. असे असताना प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांना जिल्हाध्यक्षपदाचा प्रभार दिला. त्यानंतर त्यांच्या कार्यशैलीमुळे आम्ही कायमस्वरुपी जिल्हाध्यक्ष देण्यात यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना निवेदने देऊन केली. परंतु ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी, पक्ष प्रभारी मोहन प्रकाश यांना भेटून जिल्ह्यातील पक्षाची स्थिती शिष्टमंडळांसह सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, १९९९ मध्ये काँग्रेस पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा झाला. या जिल्ह्यात काँग्रेसची पाळेमुळे रुजलेली आहेत. कालांतराने काँग्रेस पक्ष विखुरला गेला. त्यानंतर पक्षाने कायमस्वरुपी जिल्हाध्यक्ष नेमले होते. परंतु मागील तीन वर्षांंपासून या जबाबदारीचा प्रभार जीया पटेल यांच्यावर सोपविण्यात आला. त्यांच्या नियुक्तीला आमचा विरोध नाही. परंतु पक्ष संघटन वाढविताना ते सर्वांना सोबत घेतील, अशी आमची अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. त्यांच्या एककल्ली कारभारामुळे काँग्रेस पक्ष लिमीटेड लोकांचा पक्ष झाला. परिणामी काँग्रेस कार्यकर्त्यांंमध्ये निरुत्साह पसरला. : प्रदेश काँग्रेस कमिटीने पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नियुक्त करुन भंडारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्याची गरज होती. परंतु मागील तीन वर्षांपासून भंडारा जिल्ह्यात काँग्रेसची धुरा प्रभारी जिल्हाध्यक्षांवर सोपविण्यात आली. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संपुष्टात आला, असा आरोप काँग्रेसचे जिल्हा महासचिव अँड. शशीर वंजारी, प्रशांत देशकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनोद भोयर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.