शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूरवेळी पाकिस्तानचा प्रत्येक वार ज्यानं हाणून पाडला, आता ते शस्त्र खरेदीसाठी हा मोठा देशही आतूरलेला, करणार 'बिग डील'!
2
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
3
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
4
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
5
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
6
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
7
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
8
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
9
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
10
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
11
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
12
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
13
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
14
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
15
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
16
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
17
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
18
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
19
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
20
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!

काँग्रेसच्या अकार्यक्षम प्रभारी जिल्हाध्यक्षांना पदावरुन हटवा

By admin | Updated: June 2, 2014 00:26 IST

प्रदेश काँग्रेस कमिटीने पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नियुक्त करुन भंडारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष

भंडारा

यावेळी

जिया

जिया

पटेल हे नागपुरात राहून भंडार्‍याच्या कारभार पाहत असल्याचा आरोप करुन ते म्हणाले, जिल्हा काँग्रेस पक्षात कोणताही ताळमेळ राहिलेला नाही. संघटनात्मक निवडणुकीत निवडून आलेल्या शहर अध्यक्षांना हटवून नवीन शहर अध्यक्ष नेमण्यात आले. आजघडीला जिल्हा परिषद, पंचायत समिती काँग्रेसच्या ताब्यात नाहीत. याला एककल्ली कार्यक्रम जबाबदार असल्याचा आरोप त्यांनी केला. पालकमंत्री रणजित कांबळे यांच्याशी प्रभारी जिल्हाध्यक्षांचा संवाद नाही. त्यामुळे पालकमंत्री जिल्ह्यात येत नाहीत. आमचा पालकमंत्र्यांना विरोध नाही. आमचा विरोध जिल्हाध्यक्षांना असून पुर्णवेळ जिल्हाध्यक्ष नेमण्यात यावा, यासाठी आम्ही जिल्ह्यातील काँग्रेसच्या वरीष्ठ पदाधिकार्‍यांकडे आग्रह धरणार असल्याचे पदाधिकार्‍यांचे म्हणने आहे. पत्रपरिषदेला काँग्रेसचे शहर सचिव प्रमोद मानापुरे, शहर उपाध्यक्ष प्रकाश डोणेकर, नगरसेवक पृथ्वीराज तांडेकर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी) पटेल हे एकीकडे प्रदेश कमिटीत सदस्य आहेत. असे असताना प्रदेश काँग्रेस कमिटीने त्यांना जिल्हाध्यक्षपदाचा प्रभार दिला. त्यानंतर त्यांच्या कार्यशैलीमुळे आम्ही कायमस्वरुपी जिल्हाध्यक्ष देण्यात यावा, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना निवेदने देऊन केली. परंतु ठाकरे यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे काँग्रेस उपाध्यक्ष राहूल गांधी, पक्ष प्रभारी मोहन प्रकाश यांना भेटून जिल्ह्यातील पक्षाची स्थिती शिष्टमंडळांसह सांगणार असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, १९९९ मध्ये काँग्रेस पक्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा वेगळा झाला. या जिल्ह्यात काँग्रेसची पाळेमुळे रुजलेली आहेत. कालांतराने काँग्रेस पक्ष विखुरला गेला. त्यानंतर पक्षाने कायमस्वरुपी जिल्हाध्यक्ष नेमले होते. परंतु मागील तीन वर्षांंपासून या जबाबदारीचा प्रभार जीया पटेल यांच्यावर सोपविण्यात आला. त्यांच्या नियुक्तीला आमचा विरोध नाही. परंतु पक्ष संघटन वाढविताना ते सर्वांना सोबत घेतील, अशी आमची अपेक्षा होती. परंतु तसे झाले नाही. त्यांच्या एककल्ली कारभारामुळे काँग्रेस पक्ष लिमीटेड लोकांचा पक्ष झाला. परिणामी काँग्रेस कार्यकर्त्यांंमध्ये निरुत्साह पसरला. : प्रदेश काँग्रेस कमिटीने पूर्णवेळ जिल्हाध्यक्ष नियुक्त करुन भंडारा जिल्ह्यात काँग्रेस पक्ष बळकट करण्याची गरज होती. परंतु मागील तीन वर्षांपासून भंडारा जिल्ह्यात काँग्रेसची धुरा प्रभारी जिल्हाध्यक्षांवर सोपविण्यात आली. त्यांच्या अकार्यक्षमतेमुळे जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष संपुष्टात आला, असा आरोप काँग्रेसचे जिल्हा महासचिव अँड. शशीर वंजारी, प्रशांत देशकर, डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉ.विनोद भोयर यांनी आयोजित पत्रपरिषदेत केला.