शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

देव्हाडी उड्डाणपुलाला पडले मोठे भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:59 IST

देव्हाडी येथील उड्डाणपूलाला पुन्हा मोठे भगदाड पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूल पोचमार्गावर रविवारी भगदाड पडल्याचे उघडकीस आले. संततधार पावसात मोठ्या प्रमाणात भरावातील राख येथे वाहून गेली.

ठळक मुद्देकंत्राटदाराची सारवासारव : शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपूलाला पुन्हा मोठे भगदाड पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूल पोचमार्गावर रविवारी भगदाड पडल्याचे उघडकीस आले. संततधार पावसात मोठ्या प्रमाणात भरावातील राख येथे वाहून गेली. त्यानंतर तिथे भगदाड पडले. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास येथील कंत्राटदाराने वायब्रेटर मशीनने ते भगदाड बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. वारंवार उड्डाणपूलाला भगदाड पडत असल्याने पूल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हा प्रशासन तथा राज्य शासन येथे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर जागतिक बँक प्रकल्पाकडून देव्हाडी येथे रेल्वे फाटकावर उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. तुमसर- रामटेक उड्डाणपूल पोचमार्गावर पुन्हा मोठे भगदाड पडल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. काही तरुण उड्डाणपूल पोचमार्गावर फिरायला गेले तेव्हा त्यांना मोठे भगदाड पडल्याचे दिसले. त्यांनी सदर भगदाडाचे चित्रीकरण करुन सोशल मिडीयावर शेअर केले. त्यामुळे एकच खळबळ माजली.सोमवारी सकाळदरम्यान कंत्राटदाराने वायब्रेटर मशीनने मलबा घालून भगदाड बुजविला. सदर उड्डाणपूलावर वारंवार मोठे भगदाड पडणे सुरुच आहे. उड्डाणपूलावरुन वाहतूक सुरु झाल्यानंतर पूलावरुन वाहतूक करणे येथे धोक्याचे ठरणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने येथे गंभीर दखल घेऊन तज्ज्ञांमार्फत संपूर्ण पुलाची तपासणी करण्याची गरज आहे.संबंधित विभागाचे अधिकारी येथे दहा दिवसापूर्वी आले होते. त्यांनी पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. वायब्रेटरने राखेवर दाब देऊन ती भरण्यात येईल असे स्थानिकांना संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता बांधवकर यांनी सांगितले. पुन्हा दहा दिवसानंतर पूर्वी पडलेल्या स्थळपासून अवघ्या २० फुटावर पुन्हा मोठे भगदाड पडले. त्यामुळे सदर उड्डाणपूलावरुन वाहतुक करणे धोक्याचे ठरण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही.संपूर्ण पूलात राखेचा भराव करण्यात आला आहे. पावसात पाण्यासह ती राख वाहून जात आहे. त्यामुळे पुल पोकळ होत आहे. विना वाहतुकीने मोठे भगदाड येथे सातत्याने पडत आहेत. तांत्रिक बिघाड या पूलात निर्माण झाल्याची शक्यता अधिक आहे. परंतु त्याची दखल येथे प्रशसन का घेत नाही हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी किमान गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता खुशाल नागपूरे, स्टेशनटोलीचे माजी सरपंच श्याम नागपूरे, प्रदीप बोंदरे यांनी केली आहे.