शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
2
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
3
"वडिलांच्या नवीन मर्सिडीजवर विपिनची नजर, ६० लाखांची मागणी", निक्कीच्या भावाने मांडली व्यथा
4
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
5
पहिल्यांदाच मिझोरममध्ये पोहोचली रेल्वे; १४२ पूल अन् ४८ बोगद्यांद्वारे तयार झाला मार्ग...
6
निवृत्तीनंतर चेतेश्वर पुजाराला BCCI किती पेन्शन देणार? निवृत्त वेतनासाठी कोणतं सूत्र वापरतात?
7
खुशखबर...! पुढच्याच महिन्यात मारुती नवी धाकड SUV आणणार; क्रेटा, सेल्टोसला थेट टक्कर देणार, किंमतही असणार या सर्वांपेक्षा कमी!
8
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही रशियाचे युक्रेनवरील हल्ले सुरूच, दोन गावांवरही कब्जा!
9
नेतन्याहू यांचा 'कंट्रोल गाझा' प्लॅन सुरू! इस्रायली हल्ल्यात ६३ जणांचा मृत्यू; पुढे काय होणार?
10
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
11
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
12
३० वर्षीय पत्नीने प्रियकरासोबत रचला कट, ६० वर्षीय पतीला जंगलात नेऊन आवळला गळा
13
घसा खूपच खवखवतोय अन् खोकलाही जाता जाईना... 'या' ६ गोष्टी आहेत रामबाण उपाय
14
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
15
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
16
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
17
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
18
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
19
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
20
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन

देव्हाडी उड्डाणपुलाला पडले मोठे भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2019 00:59 IST

देव्हाडी येथील उड्डाणपूलाला पुन्हा मोठे भगदाड पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूल पोचमार्गावर रविवारी भगदाड पडल्याचे उघडकीस आले. संततधार पावसात मोठ्या प्रमाणात भरावातील राख येथे वाहून गेली.

ठळक मुद्देकंत्राटदाराची सारवासारव : शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : देव्हाडी येथील उड्डाणपूलाला पुन्हा मोठे भगदाड पडल्याचे प्रकरण समोर आले आहे. रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या उड्डाणपूल पोचमार्गावर रविवारी भगदाड पडल्याचे उघडकीस आले. संततधार पावसात मोठ्या प्रमाणात भरावातील राख येथे वाहून गेली. त्यानंतर तिथे भगदाड पडले. सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारास येथील कंत्राटदाराने वायब्रेटर मशीनने ते भगदाड बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. वारंवार उड्डाणपूलाला भगदाड पडत असल्याने पूल बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. जिल्हा प्रशासन तथा राज्य शासन येथे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी उपस्थित केला आहे.तुमसर- गोंदिया राष्ट्रीय महामार्गावर जागतिक बँक प्रकल्पाकडून देव्हाडी येथे रेल्वे फाटकावर उड्डाणपूलाचे काम सुरु आहे. तुमसर- रामटेक उड्डाणपूल पोचमार्गावर पुन्हा मोठे भगदाड पडल्याची घटना रविवारी सायंकाळी उघडकीस आली. काही तरुण उड्डाणपूल पोचमार्गावर फिरायला गेले तेव्हा त्यांना मोठे भगदाड पडल्याचे दिसले. त्यांनी सदर भगदाडाचे चित्रीकरण करुन सोशल मिडीयावर शेअर केले. त्यामुळे एकच खळबळ माजली.सोमवारी सकाळदरम्यान कंत्राटदाराने वायब्रेटर मशीनने मलबा घालून भगदाड बुजविला. सदर उड्डाणपूलावर वारंवार मोठे भगदाड पडणे सुरुच आहे. उड्डाणपूलावरुन वाहतूक सुरु झाल्यानंतर पूलावरुन वाहतूक करणे येथे धोक्याचे ठरणार तर नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा प्रशासनाने येथे गंभीर दखल घेऊन तज्ज्ञांमार्फत संपूर्ण पुलाची तपासणी करण्याची गरज आहे.संबंधित विभागाचे अधिकारी येथे दहा दिवसापूर्वी आले होते. त्यांनी पाहणी करुन जिल्हाधिकाऱ्यांना अहवाल सादर केला. वायब्रेटरने राखेवर दाब देऊन ती भरण्यात येईल असे स्थानिकांना संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता बांधवकर यांनी सांगितले. पुन्हा दहा दिवसानंतर पूर्वी पडलेल्या स्थळपासून अवघ्या २० फुटावर पुन्हा मोठे भगदाड पडले. त्यामुळे सदर उड्डाणपूलावरुन वाहतुक करणे धोक्याचे ठरण्याची शक्यता येथे नाकारता येत नाही.संपूर्ण पूलात राखेचा भराव करण्यात आला आहे. पावसात पाण्यासह ती राख वाहून जात आहे. त्यामुळे पुल पोकळ होत आहे. विना वाहतुकीने मोठे भगदाड येथे सातत्याने पडत आहेत. तांत्रिक बिघाड या पूलात निर्माण झाल्याची शक्यता अधिक आहे. परंतु त्याची दखल येथे प्रशसन का घेत नाही हा संशोधनाचा विषय आहे. जिल्हाधिकारी डॉ. नरेश गिते यांनी किमान गंभीर दखल घ्यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता खुशाल नागपूरे, स्टेशनटोलीचे माजी सरपंच श्याम नागपूरे, प्रदीप बोंदरे यांनी केली आहे.