शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
5
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
6
Food : हिमालयीन चव आणि मुंबईचा थाट! आशियातील सर्वोत्तम ५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची 'दोन' रत्न; एक तर आहे मुंबईतच!
7
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
8
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
9
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
10
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
11
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
12
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
13
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
14
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
15
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
16
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
17
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
18
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
19
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
20
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST

भंडारा : गावाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील वातावरण आता तापायला लागले आहे. १४८ ग्रामपंचायतीच्या १०५२ सदस्यांसाठी ...

भंडारा : गावाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील वातावरण आता तापायला लागले आहे. १४८ ग्रामपंचायतीच्या १०५२ सदस्यांसाठी निवडणूक हाेत असून छाननीनंतर ३११८ नामांकन कायम राहिलेत. ४ जानेवारी ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख असून उमेदवारी मागे घेण्यासाठी गावागावांत आता मनधरणी सुरू असल्याचे चित्र आहे. काही ग्रामपंचायतीनी अविराेधसाठी प्रयत्न चालविले आहेत. या निवडणुकीचे खरे चित्र नामांकन मागे घेण्याच्या दिवसानंतरच स्पष्ट हाेणार आहे.

नवीन वर्षात आलेली ही पहिली निवडणूक आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मतदान हाेत आहे. राजकीय वातावरण तापत असून गावपुढाऱ्यांनी आपले पॅनल तयार केले आहे. मात्र अद्यापही या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले नाही. अनेक डावपेच आखणे सुरू असून त्यातील एक डावपेच म्हणजे प्रतिस्पर्धी गटातील उमेदवाराला मागे घ्यायला लावणे, यासाठी विविध आमिषे दिली जात आहेत. दबावतंत्राचा वापरही केला जात आहे. जिल्हास्तरावरील राजकीय नेत्यांकडूनही यासाठी मनधरणी केली जात आहे. गटातटाच्या राजकारणात गावखेडे अडकले असून प्रत्येकाला या निवडणुकीत आपली अस्मिता दाखवायची संधी असते. त्यामुळेच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

सर्वाधिक ग्रामपंचायतींची निवडणुक भंडारा तालुक्यातील असून ३५ ग्रामपंचायतींच्या १११ सदस्यांसाठी ही निवडणूक हाेत आहे. ७५८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते. त्यापैकी ४ नामांकन छाननीत बाद झाले. आता ७५४ नामांकन कायम आहेत. साकाेली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या १६० जागांसाठी ३३४ नामांकन, तमसर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या १६० सदस्यांसाठी ४२५ नामांकन, लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ९९ सदस्यांसाठी २४४ नामांकन, माेहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या १४१ सदस्यांसाठी ३९८ नामांकन, पवनी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २१६ जागांसाठी ५३९ आणि लाखनी तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या १५६ जागांसाठी ४२४ नामांकन कायम आहेत. आता ४ जानेवारी राेजी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे.

बाॅक्स

कुठे थेट तर कुठे तिहेरी लढतीची शक्यता

नामांकन मागे घेण्यासाठी कुणी कितीही मनधरणी केली तरीही ही निवडणूक गावाच्या आणि गटाच्या अस्मितेची असते. त्यामुळे कुणी माघार घेईल याची शक्यता तशी कमीच असते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुताश ग्रामपंचायतीत थेट लढत तर काही ठिकाणी तिहेरी लढतीची शक्यता आहे. या निवडणुकीने गावात थेट दाेन गट निर्माण झाले असून अस्मितेची ही लढत संक्रांतीपर्यंत सुरू राहणार आहे.