शहरं
Join us  
Trending Stories
1
MHT CET Exam Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये २२ जण अव्वल!
2
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
3
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
4
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
5
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
6
क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं, सलग तीन वेळा टाय झाला टी-२० सामना, अखेर असा लागला निकाल
7
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
8
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
9
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
10
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 
11
तुमच्या नोकरीवर टांगती तलवार? मे महिन्यात बेरोजगारीचा दर वाढला, 'या' लोकांना सर्वाधिक फटका
12
विकीने दुसऱ्याच अभिनेत्रीचा पकडला हात, अंकिताचा रागराग; Video व्हायरल
13
"ट्रम्प यांचं वर्तन अनिश्चित, ट्रेड तेव्हाच जेव्हा टॅरिफबाबत..," भारतानं अमेरिकेसमोर ठेवली मोठी अट
14
Sheetal Chaudhary: बॉयफ्रेंडनेच केली शीतलची हत्या! अपघाताचा बनाव, पण सुनील अडकला; हत्येचे कारण अखेर समोर   
15
Israel-Iran War: संरक्षणावर किती खर्च करतात इराण आणि इस्रायल? कोणत्या सैन्याची ताकद आहे जास्त
16
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
17
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
18
'सगळे या..सगळे या...', मराठीत बोलून के-पॉप स्टार जॅक्सन वांगनं सर्वांना केलं थक्क, व्हिडीओ होतोय व्हायरल
19
"थोडी माणुसकी दाखवा"; अपघातानंतर रडत व्यथा मांडणाऱ्या डॉक्टरचा नवा व्हिडीओ समोर; म्हणाला, "मी खूप बोलून गेलो..."
20
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'

उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST

भंडारा : गावाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील वातावरण आता तापायला लागले आहे. १४८ ग्रामपंचायतीच्या १०५२ सदस्यांसाठी ...

भंडारा : गावाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील वातावरण आता तापायला लागले आहे. १४८ ग्रामपंचायतीच्या १०५२ सदस्यांसाठी निवडणूक हाेत असून छाननीनंतर ३११८ नामांकन कायम राहिलेत. ४ जानेवारी ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख असून उमेदवारी मागे घेण्यासाठी गावागावांत आता मनधरणी सुरू असल्याचे चित्र आहे. काही ग्रामपंचायतीनी अविराेधसाठी प्रयत्न चालविले आहेत. या निवडणुकीचे खरे चित्र नामांकन मागे घेण्याच्या दिवसानंतरच स्पष्ट हाेणार आहे.

नवीन वर्षात आलेली ही पहिली निवडणूक आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मतदान हाेत आहे. राजकीय वातावरण तापत असून गावपुढाऱ्यांनी आपले पॅनल तयार केले आहे. मात्र अद्यापही या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले नाही. अनेक डावपेच आखणे सुरू असून त्यातील एक डावपेच म्हणजे प्रतिस्पर्धी गटातील उमेदवाराला मागे घ्यायला लावणे, यासाठी विविध आमिषे दिली जात आहेत. दबावतंत्राचा वापरही केला जात आहे. जिल्हास्तरावरील राजकीय नेत्यांकडूनही यासाठी मनधरणी केली जात आहे. गटातटाच्या राजकारणात गावखेडे अडकले असून प्रत्येकाला या निवडणुकीत आपली अस्मिता दाखवायची संधी असते. त्यामुळेच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

सर्वाधिक ग्रामपंचायतींची निवडणुक भंडारा तालुक्यातील असून ३५ ग्रामपंचायतींच्या १११ सदस्यांसाठी ही निवडणूक हाेत आहे. ७५८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते. त्यापैकी ४ नामांकन छाननीत बाद झाले. आता ७५४ नामांकन कायम आहेत. साकाेली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या १६० जागांसाठी ३३४ नामांकन, तमसर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या १६० सदस्यांसाठी ४२५ नामांकन, लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ९९ सदस्यांसाठी २४४ नामांकन, माेहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या १४१ सदस्यांसाठी ३९८ नामांकन, पवनी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २१६ जागांसाठी ५३९ आणि लाखनी तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या १५६ जागांसाठी ४२४ नामांकन कायम आहेत. आता ४ जानेवारी राेजी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे.

बाॅक्स

कुठे थेट तर कुठे तिहेरी लढतीची शक्यता

नामांकन मागे घेण्यासाठी कुणी कितीही मनधरणी केली तरीही ही निवडणूक गावाच्या आणि गटाच्या अस्मितेची असते. त्यामुळे कुणी माघार घेईल याची शक्यता तशी कमीच असते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुताश ग्रामपंचायतीत थेट लढत तर काही ठिकाणी तिहेरी लढतीची शक्यता आहे. या निवडणुकीने गावात थेट दाेन गट निर्माण झाले असून अस्मितेची ही लढत संक्रांतीपर्यंत सुरू राहणार आहे.