शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
3
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
4
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
5
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
6
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
7
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
8
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
9
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
10
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
11
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
12
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
13
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
14
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
15
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
16
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
17
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
18
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
19
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
20
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना

उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:29 IST

भंडारा : गावाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील वातावरण आता तापायला लागले आहे. १४८ ग्रामपंचायतीच्या १०५२ सदस्यांसाठी ...

भंडारा : गावाच्या अस्मितेचे प्रतीक असलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भागातील वातावरण आता तापायला लागले आहे. १४८ ग्रामपंचायतीच्या १०५२ सदस्यांसाठी निवडणूक हाेत असून छाननीनंतर ३११८ नामांकन कायम राहिलेत. ४ जानेवारी ही उमेदवारी मागे घेण्याची अंतिम तारीख असून उमेदवारी मागे घेण्यासाठी गावागावांत आता मनधरणी सुरू असल्याचे चित्र आहे. काही ग्रामपंचायतीनी अविराेधसाठी प्रयत्न चालविले आहेत. या निवडणुकीचे खरे चित्र नामांकन मागे घेण्याच्या दिवसानंतरच स्पष्ट हाेणार आहे.

नवीन वर्षात आलेली ही पहिली निवडणूक आहे. संक्रांतीच्या दुसऱ्या दिवशी मतदान हाेत आहे. राजकीय वातावरण तापत असून गावपुढाऱ्यांनी आपले पॅनल तयार केले आहे. मात्र अद्यापही या निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट झाले नाही. अनेक डावपेच आखणे सुरू असून त्यातील एक डावपेच म्हणजे प्रतिस्पर्धी गटातील उमेदवाराला मागे घ्यायला लावणे, यासाठी विविध आमिषे दिली जात आहेत. दबावतंत्राचा वापरही केला जात आहे. जिल्हास्तरावरील राजकीय नेत्यांकडूनही यासाठी मनधरणी केली जात आहे. गटातटाच्या राजकारणात गावखेडे अडकले असून प्रत्येकाला या निवडणुकीत आपली अस्मिता दाखवायची संधी असते. त्यामुळेच ही निवडणूक प्रतिष्ठेची झाली आहे.

सर्वाधिक ग्रामपंचायतींची निवडणुक भंडारा तालुक्यातील असून ३५ ग्रामपंचायतींच्या १११ सदस्यांसाठी ही निवडणूक हाेत आहे. ७५८ उमेदवारांनी नामांकन दाखल केले हाेते. त्यापैकी ४ नामांकन छाननीत बाद झाले. आता ७५४ नामांकन कायम आहेत. साकाेली तालुक्यातील २० ग्रामपंचायतीच्या १६० जागांसाठी ३३४ नामांकन, तमसर तालुक्यातील १८ ग्रामपंचायतींच्या १६० सदस्यांसाठी ४२५ नामांकन, लाखांदूर तालुक्यातील ११ ग्रामपंचायतीच्या ९९ सदस्यांसाठी २४४ नामांकन, माेहाडी तालुक्यातील १७ ग्रामपंचायतींच्या १४१ सदस्यांसाठी ३९८ नामांकन, पवनी तालुक्यातील २७ ग्रामपंचायतींच्या २१६ जागांसाठी ५३९ आणि लाखनी तालुक्यातील २० ग्रामपंचायतींच्या १५६ जागांसाठी ४२४ नामांकन कायम आहेत. आता ४ जानेवारी राेजी या निवडणुकीचे चित्र स्पष्ट हाेणार आहे.

बाॅक्स

कुठे थेट तर कुठे तिहेरी लढतीची शक्यता

नामांकन मागे घेण्यासाठी कुणी कितीही मनधरणी केली तरीही ही निवडणूक गावाच्या आणि गटाच्या अस्मितेची असते. त्यामुळे कुणी माघार घेईल याची शक्यता तशी कमीच असते. त्यामुळे जिल्ह्यातील बहुताश ग्रामपंचायतीत थेट लढत तर काही ठिकाणी तिहेरी लढतीची शक्यता आहे. या निवडणुकीने गावात थेट दाेन गट निर्माण झाले असून अस्मितेची ही लढत संक्रांतीपर्यंत सुरू राहणार आहे.