शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम म्हणजे सुटका नाही! पाकवर दबाव कायम; भारताचे ‘ते’ ६ मोठे निर्णय अद्यापही लागू
2
“आमचे काम लक्ष्य साधणे, किती जण मारले गेले याची मोजदाद ठेवणे नाही”; एके भारतींचा थेट प्रहार
3
Operation Sindoor : "ऑपरेशन सिंदूरमध्ये IC-814 प्लेन हायजॅक आणि पुलवामा हल्ल्यातील मास्टरमाइंडचा खात्मा"
4
एनआयएची मोठी कारवाई, खलिस्तानी दहशतवादी बलबीर सिंगच्या मुसक्या आवळल्या
5
छत्रपती शिवरायांच्या कर्तृत्वाला साजेसा पुतळा; राजकोट किल्ल्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं पूजन
6
Vikram Misri: भारत- पाकिस्तान युद्धविरामानंतर परराष्ट्र सचिव मिस्री ट्रोल, मुलीबद्दल आक्षेपार्ह कमेंट
7
'भारतीय सैन्याने 35-40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
8
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
9
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
10
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
11
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
12
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
13
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
14
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
15
Operation Sindoor Live Updates: दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारत कोणत्याही थराला जाऊ शकतो
16
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
17
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
18
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
19
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
20
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश

लसीकरणाने मृत्यू, निपुत्रिक होण्याची अफवाच; जनजागृतीसाठी कसरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2021 04:26 IST

भंडारा : कोरोना महामारीवर लसीकरण हा एकमेव रामबाण उपाय आहे. मात्र, लसीकरणाने मृत्यू किंवा निपुत्रिक होण्याची अफवा ग्रामीण भागात ...

भंडारा : कोरोना महामारीवर लसीकरण हा एकमेव रामबाण उपाय आहे. मात्र, लसीकरणाने मृत्यू किंवा निपुत्रिक होण्याची अफवा ग्रामीण भागात सर्वाधिक ऐकावयास मिळाली ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी यावर कुठलाही विश्वास ठेवू नये, अशी सकारात्मक जनजागृती शासन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. परंतु ही जनजागृती करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले. त्यातच मास्क सोशल डिस्टंसिंग व स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर व जनजागृती नेहमीच करण्यात आली. आता लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जीवाचा आटापिटा करावा लागला.

ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली. त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने आव्हान पेलले. निरंतर जनजागृतीमुळे ग्रामीण भागात ह्या सर्व बाबी अफवा आहेत हे पटवून देण्यात यश मिळविले असून शासनाने कठोर पावले उचलली आहेत.इंद्रपाल कटकवार

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : कोरोना महामारीवर लसीकरण हे एकमेव रामबाण उपाय आहे. मात्र, लसीकरणाने मृत्यू किंवा निपुत्रिक होण्याची अफवा ग्रामीण भागात सर्वाधिक ऐकावयास मिळाली ही निव्वळ अफवा असून नागरिकांनी यावर कुठलाही विश्वास ठेवू नये, अशी सकारात्मक जनजागृती शासन प्रशासनामार्फत करण्यात येत आहे. परंतू ही जनजागृती करण्यासाठी अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.

कोरोना महामारीने सर्वांनाच त्रस्त करून सोडले. त्यातच मास्क सोशल डिस्टंसिंग व स्वच्छता या त्रिसूत्रीचा वापर व जनजागृती नेहमीच करण्यात आली. आता लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली. लसीकरणाच्या सुरुवातीच्या सत्रात ग्रामीण भागात लसीकरणासाठी प्रशासनाला जीवाचा आटापिटा करावा लागला.

ग्रामीण भागात लसीकरणाने मृत्यू होतो, निपुत्रिकपणा होतो, अशी अफवाच पसरविण्यात आली. त्याचा परिणाम लसीकरणावरही पडला. मात्र प्रशासनाने आव्हान पेलले. निरंतर जनजागृतीमुळे ग्रामीण भागात ह्या सर्व बाबी अफवा आहेत हे पटवून देण्यात यश मिळविले असून शासनाने कठोर पावले उचलली आहेत.

लसीकरणानंतर मृत्यू होतो

ग्रामीण भागात कुठे कुठे लसीकरणामुळे मृत्यू झाल्याची अफवा पसरविण्यात आली. त्यामुळे अनेक नागरिक भीतीपोटी लसीकरणासाठी केंद्रांवर गेलेच नाही. हळूहळू जनजागृतीनंतर तरुणांनीच पुढकार घेतला. अफवांवर पटकन विश्वास ठेवणारे लाेकांना ही चूक लक्षात येतय ही महत्वाची बाब ठरली.

निपुत्रिक होण्याची शक्यता

लसीकरणानंतर निपुत्रिक होण्याची दाट शक्यता असते याची अफवाच ग्रामीण भागात पसरविण्यात आली. त्यामुळे अनेक स्त्रियाही लसीकरणासाठी गेल्या नाहीत. अशी बाब नंतर उघडकीला आली. मात्र हळूहळू प्रशासनाने ही सर्व अफवा असल्याचे स्पष्ट केले. लसीकरणाला वैद्यकीय आधार आहे, हे महत्वाचे आहे.

लसीकरणानंतर घरघर वाटते

कुठलीही लस घेतली तरी मानवी शरीराचे तापमान वाढत असते. ही एक सहज व सोपी प्रक्रिया आहे. असाच प्रकार कोरोना लसीकरणानंतरही झाला. लसीकरणानंतर घरघर वाटणे, ताप येतो ही साधारण बाब तिखट मिर्च लावून अफवेच्या रुपात सांगण्यात आली. त्यामुळे अनेकांनी लसीकरणाला नकार दिला.

सुरुवातीला कोरोना लसीकरण करून घ्यायचे ठरवले होते. मात्र अफवांमुळे आम्हाला भीती वाटली. आम्ही संभ्रमात सापडलो होतो. परंतू लसीकरणानंतर कुठलीही गंभीर बाब उजेडात आली नाही तसेच शरीरावरही कुठलाही विपरीत परिणाम होत नाही.

- एक ग्रामस्थ, अड्याळ

कुठलीही मोहीम येण्यापूर्वी त्याची अफवा पहिले असते त्यामुळे लोकांच्या लवकर विश्वास बसतो. तसेच कोरोना लसीकरणबाबतही झाले आहे. आम्हाला पूर्वी भीती वाटायची, मात्र आता ही भीती दूर झाली आहे.

- एक ग्रामस्थ, पालगाव

जिल्ह्यात लसीकरण मोहीम राज्य शासनाच्या दिशा निर्देशानुसार सुरू आहे. सुरूवातीच्या काळात ग्रामीण क्षेत्रात काही ना काही अफवा ऐकायला मिळाल्यात. त्याबाबत आम्ही सातत्याने जनजागृतीवर भर दिला. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, वेळेतच प्रत्येक नागरिकाने आपापल्या परीने लसीकरण करून घ्यावे.

- डॉ. प्रशांत उईके, जिल्हा आरोग्य अधिकारी, भंडारा