शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

वाघिणीच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू !

By admin | Updated: February 2, 2015 22:59 IST

खंदाड राखीव जंगलातील बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाचे अधिकारी अशासकीय संस्था सदस्यांचा निर्वाळा देवून बिबट्याच्या मृत्यूवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. १० दिवस

तुमसर : खंदाड राखीव जंगलातील बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाचे अधिकारी अशासकीय संस्था सदस्यांचा निर्वाळा देवून बिबट्याच्या मृत्यूवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. १० दिवस बिबट्या मृतावस्थेत पडून होता. शेवटी तो कुजलेल्या स्थितीत आल्यावरही त्याची माहिती वनविभागाला नव्हती. वाघीण व बिबट्यची झुंज झाली व त्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा जावई शोध वनविभागाने लावला आहे. मात्र झुंजीच्या खुणा घटनास्थळावर दिसून आल्या नाहीत. तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत खंदाड ते धनेगावपर्यंत राखीव जंगल आहे. खंदाड गावाजवळ कक्ष क्रमांक ७० मध्ये शनिवारी बिबट मृतावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली होती. १० दिवसापेक्षा जास्त दिवस झाल्याने तो कुजलेल्या स्थितीत आला होता. बिबट मृत्यू झालेल्या स्थळापासून ११ केव्हीची उच्च दाबाची वीज वाहिणी गोबरवाही ते सोदेपुरपर्यंत गेली आहे. घटनास्थळाजवळ लाकडी खुंट्या आढळल्या. जंगलात त्या खुंट्या कुठून आल्या असा प्रश्न उपस्थित होतो. गोबरवाही-सितासावंगी रस्त्यावरील हेटी या गावाजवळ रविवारी सकाळी एका महिलेला व तीन युवकांना वाघिण व त्याचे दोन पिल्ले दिसले. खंदाड व सितासावंगीचे अंतर १० ते १२ कि़मी. आहे. वाघीण व बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांनी दिली. तसा अहवाल तयार करण्यात आल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.वाघीण व तिचे पिल्ले फिरताना बिबट आपल्या पिल्ल्यांना ईजा पोहचवेल म्हणून त्यांच्यात झुंज झाली व यात बिबट्याच्या मानेचे हाड मोडले, असा कयास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. एक महिन्यानंतर फॉरेन्सीक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यावर बिबट मृत्यू प्रकरणातील तथ्य समोर येणार आहे. बिबट्याचा व्हीसेरा वाळल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा पायाचा पंजा व मिशीचे केस फॉरेन्सीक लॅबला पाठविले. नाकाडोंगरी व तुमसर वनपरिक्षेत्राच्या सीमा फिडल्या आहेत. या जंगलात दोन नर व दोन माद्या व त्यांचे पिल्ले असल्याची माहिती उपवनसंरक्षक ठाकरे यांनी दिली. वाघीण व बिबट यांच्यात झुंज झाली, असे वनविभागाचे अधिकारी म्हणत असले तरी बिबट्याच्या शरीरावर किंवा घटनास्थळावर झुंजीच्या खुणा आढळून आल्या नाहीत. सुमारे २० कि़मी. चा परिसर राखीव वनात मोडतो. वन्यपशू येथे असुरक्षित आहेत. (तालुका प्रतिनिधी)