शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

वाघिणीच्या हल्ल्यात बिबट्याचा मृत्यू !

By admin | Updated: February 2, 2015 22:59 IST

खंदाड राखीव जंगलातील बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाचे अधिकारी अशासकीय संस्था सदस्यांचा निर्वाळा देवून बिबट्याच्या मृत्यूवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. १० दिवस

तुमसर : खंदाड राखीव जंगलातील बिबट मृत्यूप्रकरणी वनविभागाचे अधिकारी अशासकीय संस्था सदस्यांचा निर्वाळा देवून बिबट्याच्या मृत्यूवर पडदा टाकण्याचा प्रयत्न करीत आहे. १० दिवस बिबट्या मृतावस्थेत पडून होता. शेवटी तो कुजलेल्या स्थितीत आल्यावरही त्याची माहिती वनविभागाला नव्हती. वाघीण व बिबट्यची झुंज झाली व त्यात बिबट्याचा मृत्यू झाल्याचा जावई शोध वनविभागाने लावला आहे. मात्र झुंजीच्या खुणा घटनास्थळावर दिसून आल्या नाहीत. तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत खंदाड ते धनेगावपर्यंत राखीव जंगल आहे. खंदाड गावाजवळ कक्ष क्रमांक ७० मध्ये शनिवारी बिबट मृतावस्थेत पडून असल्याची माहिती मिळाली होती. १० दिवसापेक्षा जास्त दिवस झाल्याने तो कुजलेल्या स्थितीत आला होता. बिबट मृत्यू झालेल्या स्थळापासून ११ केव्हीची उच्च दाबाची वीज वाहिणी गोबरवाही ते सोदेपुरपर्यंत गेली आहे. घटनास्थळाजवळ लाकडी खुंट्या आढळल्या. जंगलात त्या खुंट्या कुठून आल्या असा प्रश्न उपस्थित होतो. गोबरवाही-सितासावंगी रस्त्यावरील हेटी या गावाजवळ रविवारी सकाळी एका महिलेला व तीन युवकांना वाघिण व त्याचे दोन पिल्ले दिसले. खंदाड व सितासावंगीचे अंतर १० ते १२ कि़मी. आहे. वाघीण व बिबट्याच्या झुंजीत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती उपवनसंरक्षक विनय ठाकरे यांनी दिली. तसा अहवाल तयार करण्यात आल्याचे त्यांनी लोकमतला सांगितले.वाघीण व तिचे पिल्ले फिरताना बिबट आपल्या पिल्ल्यांना ईजा पोहचवेल म्हणून त्यांच्यात झुंज झाली व यात बिबट्याच्या मानेचे हाड मोडले, असा कयास वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी लावला आहे. एक महिन्यानंतर फॉरेन्सीक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यावर बिबट मृत्यू प्रकरणातील तथ्य समोर येणार आहे. बिबट्याचा व्हीसेरा वाळल्याने पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याचा पायाचा पंजा व मिशीचे केस फॉरेन्सीक लॅबला पाठविले. नाकाडोंगरी व तुमसर वनपरिक्षेत्राच्या सीमा फिडल्या आहेत. या जंगलात दोन नर व दोन माद्या व त्यांचे पिल्ले असल्याची माहिती उपवनसंरक्षक ठाकरे यांनी दिली. वाघीण व बिबट यांच्यात झुंज झाली, असे वनविभागाचे अधिकारी म्हणत असले तरी बिबट्याच्या शरीरावर किंवा घटनास्थळावर झुंजीच्या खुणा आढळून आल्या नाहीत. सुमारे २० कि़मी. चा परिसर राखीव वनात मोडतो. वन्यपशू येथे असुरक्षित आहेत. (तालुका प्रतिनिधी)