शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
2
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
3
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
4
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
5
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
6
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
7
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
8
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
9
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
10
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
11
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
12
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
13
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
14
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
15
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
16
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
17
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
18
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
19
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ

मृत लाभार्थ्यांचे अनुदान उचलले

By admin | Updated: November 30, 2015 00:44 IST

केंद्र शासन व राज्य शासनाच्या अनुदानातून तहसील कार्यालयामार्फत इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विकलांग योजना, ...

लाखनीतील प्रकार : श्रावणबाळ योजनेतील शासकीय पैशाचा अपहार चंदन मोटघरे लाखनीकेंद्र शासन व राज्य शासनाच्या अनुदानातून तहसील कार्यालयामार्फत इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, विकलांग योजना, श्रावणबाळ व संजय गांधी निराधार योजनाद्वारे गरीब लाभार्थ्यांना आर्थिक मदत दिल्या जाते. मात्र तालुक्यात लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतरही मृतकाच्या नावावर आलेले अनुदानाचा अपहार होत असल्याचे समोर आले आहे.तालुक्यात संजय गांधी निराधार योजनेचे ३०७१, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजनेची ५४६६, श्रावणबाळ सेवा योजनांची ८९५६, विकलांक योजना ३५, विधवा योजनेचे २५ लाभार्थी आहेत. सदर लाभार्थ्यांना देण्यासाठी कोट्यवधी रुपयाचे शासनाकडून देण्यात येते. वृद्धापकाळ योजनेतील लाभार्थ्यांचे निधन झाल्यानंतर शासकीय रेकॉर्डवरून नाव न रद्द केल्यामुळे अनुदान बँक खात्यावर जमा होत असते. मृतक लाभार्थ्यांचे अनुदान वारसदाराकडून शासनाची फसवणूक करून पैसे काढले जातात. श्रावणबाळ योजनेचे अनुदानाचे लाभार्थी भागरथा गोविंदा पेटकर यांचा दि. ४.१०.२०१५ ला मृत्यू झाला. तरी तिचे २३ आॅक्टोबर २०१५ ला अनुदान उचलण्यात आले आहे. कवलेवाडा येथील ८, मेंगापूर ६, मऱ्हेगाव ८, ढिवरखेडा १, वाकल १९, पाथरी ११ याप्रमाणे पालांदूर (चौ.) परिसरात लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावाचे अनुदान बँकेतून लाटणारे सक्रीय दलाल तालुक्यात आहेत. लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तलाठ्यांनी लाभार्थ्यांचे नाव यादीतून कमी करायला पाहिजे. परंतु तलाठ्यांच्या निष्काळजीपणा व दुर्लक्षीतपणामुळे मृतक लाभार्थ्यांचे नावावरील अनुदानाची राजरोसपणे उचल केली जाते.दरवर्षी तहसील कार्यालयात मार्च महिन्यात लाभार्थी जिवंत असल्याचा दाखला देत असतात. तरीही दर महिन्याला अनुदान स्वीकारताना ग्रामपंचायतच्या जिवंत असल्याचा दाखला दाखविणे सक्तीचे केल्यास अनुदानाचा गैरवापर होणार नाही.शासनाने वृद्धापकाळ योजनेद्वारे वंचित व निराधार वृद्धांना आर्थिक सहकार्य करीत असते. अनेक लाभार्थ्यांचे कुटुंबातील सदस्य शासकीय नोकरी करीत असतात. अशा लाभार्थ्यांना अनुदानपात्र ठरविले जात आहे. आर्थिकदृष्ट्या सक्षम लाभार्थी व मृतक लाभार्थ्यांचे नाव यादीतून कमी केल्यास शासकीय अनुदानाची बचत होईल व खऱ्या पात्र लाभार्थ्यांना अनुदान देता येईल.श्रावणबाळ सेवा योजना, संजय गांधी निराधार व वृद्धापकाळ योजनेच्या मृतक लाभार्थ्यांची नावे यादीतून कमी केले आहे व तलाठ्यांना सूचना दिलेल्या आहेत. लाभार्थ्यांचा मृत्यू झाल्यानंतर तात्काळ नाव कमी करून अनुदान रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.- डी.सी. बोंबर्डे, तहसीलदार, लाखनी.निराधार योजना व श्रावणबाळ योजनेच्या मृतक लाभार्थ्यांच्या नावावर जमा झालेली रक्कम बँक खात्यातून समाजकंटक लाटत आहे. मृतक लाभार्थ्यांची यादी तहसीलदारांना दाखविली आहे. पालांदूर परिसरातील मृत्यू पावलेल्या लाभार्थ्यांच्या नावावरील अनुदान उचलणारी टोळी सक्रीय आहे. यावर पायबंद घातला पाहिजे.- दिलवर रामटेके, माजी सभापती, लाखनी.