शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: अमृतसरमध्ये वीज पुरवठा पूर्ववत; अद्यापही रेड अलर्ट कायम
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

धरणाचा जलस्तर वाढला - बाधित गावे बुडण्याची भीती

By admin | Updated: September 18, 2014 23:29 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे .दि. १५ पासून २३९.२०० मिटर वर जलस्तर वाढविण्यास सुरुवात झाली असून तीन

गोसीखुर्द धरण : जलस्तर २३९.५०० मीटरवर पोहोचलागोसे बु. : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे .दि. १५ पासून २३९.२०० मिटर वर जलस्तर वाढविण्यास सुरुवात झाली असून तीन दिवसानंतर आज ३० सेंटीमिटरने धरणातील पाणायाची पातळी वाढून जलस्तर २३९.५०० मिटरवर पोहचला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात बुडीत क्षेत्रातील अनेक गावे रिकामी करावी लागणार आहेत.मागील वर्षी धरणातील पाण्याची पातळी वाढविण्यास सुरुवात झाल्यानंतर २३० मिटर म्हणजेच १० टीएमसी जलस्तर साठवणुकीचे उद्दीष्ट नोव्हेंबर महिन्यातच पुर्ण करण्यात आले होते. जलस्तर वाढविण्याचे काम सुुर ुहोते. जलस्तर २३९.२०० मिटरवर जाताच पाथरी मधील अनेक घरात पाणी शिरले होते. सावरगावच्या चारही बाजूने पाणी होवून या गावाला जाणारा एकमात्र रस्ताही बुडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने आंदोलन करून जलस्तर वाढविण्याला विरोध करून जो पर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सुटणार नाही व प्रकल्पग्रस्तांना १२०० कोटी रुपयाचे पुनर्वसन पॅकेज मिळणार तो पर्यंत गाव सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तीव्र होवून पाथरी मध्ये पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांवर लाठीचार्ज झाला होता. त्यात अनेक महिला, पुरुष जखमी झाले होते. याचे पडसाद नागपूर हिवाळीअ धिवेशनात उमटले होते. त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेऊन धरणातील पाण्याचा जलस्तर २३९.१२५ मिटरवर स् थीर ठेवून जलस्तर वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर गोसीखुर्दचा जलस्तर वाढविण्याचे काम १५ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. रोज १० से.मी. ने जलस्तर वाढत आहे. त्यामुळे नागपूर जिह्यातील ७ तर भंडारा जिल्ह्यातील ४ अशा एकूण ११ गावांना स्थानांतरीत करणे गरजेचे आहे. यामध्ये जिल्ह्यातील पाथरी व सावरगावचा समावेश आहे. जामगावचे स्थानांतरण झाले आहे. प्रशासन पुनर्वसन विभाग सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोणत्याही स्थितीशी निपटण्याची तयारी करून ठेवली आहे. (वार्ताहर)