शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

धरणाचा जलस्तर वाढला - बाधित गावे बुडण्याची भीती

By admin | Updated: September 18, 2014 23:29 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे .दि. १५ पासून २३९.२०० मिटर वर जलस्तर वाढविण्यास सुरुवात झाली असून तीन

गोसीखुर्द धरण : जलस्तर २३९.५०० मीटरवर पोहोचलागोसे बु. : विदर्भातील सर्वात मोठ्या महत्वाकांक्षी राष्ट्रीय गोसीखुर्द धरणातील जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे .दि. १५ पासून २३९.२०० मिटर वर जलस्तर वाढविण्यास सुरुवात झाली असून तीन दिवसानंतर आज ३० सेंटीमिटरने धरणातील पाणायाची पातळी वाढून जलस्तर २३९.५०० मिटरवर पोहचला आहे. त्यामुळे येणाऱ्या दिवसात बुडीत क्षेत्रातील अनेक गावे रिकामी करावी लागणार आहेत.मागील वर्षी धरणातील पाण्याची पातळी वाढविण्यास सुरुवात झाल्यानंतर २३० मिटर म्हणजेच १० टीएमसी जलस्तर साठवणुकीचे उद्दीष्ट नोव्हेंबर महिन्यातच पुर्ण करण्यात आले होते. जलस्तर वाढविण्याचे काम सुुर ुहोते. जलस्तर २३९.२०० मिटरवर जाताच पाथरी मधील अनेक घरात पाणी शिरले होते. सावरगावच्या चारही बाजूने पाणी होवून या गावाला जाणारा एकमात्र रस्ताही बुडण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे गोसीखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीने आंदोलन करून जलस्तर वाढविण्याला विरोध करून जो पर्यंत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्या सुटणार नाही व प्रकल्पग्रस्तांना १२०० कोटी रुपयाचे पुनर्वसन पॅकेज मिळणार तो पर्यंत गाव सोडणार नसल्याचा इशारा दिला होता. प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन तीव्र होवून पाथरी मध्ये पोलिसांनी प्रकल्पग्रस्तांवर लाठीचार्ज झाला होता. त्यात अनेक महिला, पुरुष जखमी झाले होते. याचे पडसाद नागपूर हिवाळीअ धिवेशनात उमटले होते. त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेऊन धरणातील पाण्याचा जलस्तर २३९.१२५ मिटरवर स् थीर ठेवून जलस्तर वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते. प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर गोसीखुर्दचा जलस्तर वाढविण्याचे काम १५ सप्टेंबर पासून सुरु करण्यात आले आहे. रोज १० से.मी. ने जलस्तर वाढत आहे. त्यामुळे नागपूर जिह्यातील ७ तर भंडारा जिल्ह्यातील ४ अशा एकूण ११ गावांना स्थानांतरीत करणे गरजेचे आहे. यामध्ये जिल्ह्यातील पाथरी व सावरगावचा समावेश आहे. जामगावचे स्थानांतरण झाले आहे. प्रशासन पुनर्वसन विभाग सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहे. कोणत्याही स्थितीशी निपटण्याची तयारी करून ठेवली आहे. (वार्ताहर)