शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतरिम दिलासा हवा असेल तर मजबूत युक्तिवाद सादर करा; वक्फ सुनावणीत सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
2
'आतापर्यंतचे पेपर चांगले गेले, उद्या गावाकडे येणार...'; गायत्रीने सकाळी केला आईला शेवटचा काॅल..!
3
आजचे राशीभविष्य २१ मे २०२५ : अचानक धनलाभ पण मित्रांंसाठी खर्च कराल...
4
गावालाच जवानांचा वेढा, ५ जहाल माओवादी ताब्यात; तीन महिलांचा समावेश, ३६ लाख रुपयांचे होते बक्षीस
5
कल्याणमध्ये स्लॅब कोसळून सहा ठार; सहा जखमी; मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाखांचे अर्थसहाय्य
6
आंदोलनाची धार कमी झाल्यानंतर भुजबळांना मिळाली मंत्रिपदाची संधी; धनंजय मुंडेंचे दोर कापले
7
राज्यात पाच वर्षांत ३५ लाख घरे; झोपडपट्टीमुक्त शहरांचा संकल्प 
8
Pune Rains: पुण्यात पावसाचा हैदोस! अनेक ठिकाणी रस्ते पाण्याखाली, घरात शिरले पाणी
9
वैभव सूर्यंवशीनं धरले MS धोनीचे पाय; मग रंगली स्फोटक बॅटरमध्ये दडलेल्या संस्कारी मुलाची चर्चा
10
मुंबईसह उपनगराला पावसाने झोडपले! गोरेगाव, मालाडमध्ये तुफान पाऊस, अंधेरी भुयारी मार्ग बंद
11
RR vs CSK : धोनीसमोर संजू ठरला भारी! विजयासह राजस्थाननं शेवट केला गोड
12
कामात दिरंगाई झाली तर अधिकाऱ्यांवर कारवाई; पालकमंत्री बावनकुळे यांचा इशारा
13
कहानी पुरी फिल्मी है : चिमुकले गाडीत, आई फलाटावर पाणी भरत राहिली अन् ट्रेन मुंबईच्या दिशेने निघाली
14
Kalyan Building Collapses: कल्याण दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारची मोठी घोषणा
15
पाकिस्तानने असीम मुनीरचे केले प्रमोशन, लष्करात फील्ड मार्शल रँक किती महत्त्वाची?
16
गुड न्यूज! नागपूर -बिलासपूर मार्गावरील वंदे भारत एक्सप्रेसला आणखी आठ डब्बे जोडणार
17
IPL 2025 : १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीची 'परिपक्व' खेळी; सिक्सर मारत साजरी केली फिफ्टी!
18
'मीर जाफर vs एक बिर्याणी देशावर भारी'; भाजप-काँग्रेसमध्ये पोस्टर वॉर! का वाढला वाद?
19
आयुष म्हात्रेनं २०० च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या धावा; माफाकानं बेस्ट कॅचसह साधला विकेटचा डाव
20
सातारा: जेवणाचा डब्बाच डोक्यात मारला, प्रेमसंबंधास अडथळा ठरत असल्याने तरुणाचा खून

अकाली पावसाने रब्बी पिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.): या परिसरात गत ४-५ दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या अकाली पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विरली (बु.): या परिसरात गत ४-५ दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या अकाली पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांच्या कडपा आणि जमा केलेल्या ढिगांमध्ये पाणी घुसले असून रब्बी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने रिपरिप लावून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळ्याचा अनुभव दिला. सद्यस्थितीत या परिसरात हरभरा , गहू आदी रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम जोमात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सदर पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत तर काही शेतकऱ्यांनी या पिकांचे ढीग जमा करून ठेवले होते. मात्र, गत ४-५ दिवसांपासून बरसणाऱ्या या पावसाने रब्बी पिकांची अतोनात हानी केली असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

पावसाचे पाणी रब्बी पिकांच्या कडपा आणि ढिगांमध्ये घुसल्याने ही पिके अंकुरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शेतात उभे असलेले काढणी योग्य पिकेही धोक्यात आली आहेत. दरम्यान, शेतकरी जमा केलेल्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन वगैरे झाकून आपले पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. खरीप हंगामात विविध रोग किडींचे आक्रमण, अतिवृष्टी आदी संकटामुळे धान पीक हातचे गेले. आता रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची मदार असतांना निसर्गाने यावरही आपली वक्रदृष्टी फिरविली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे.