शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसाने रब्बी पिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.): या परिसरात गत ४-५ दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या अकाली पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विरली (बु.): या परिसरात गत ४-५ दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या अकाली पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांच्या कडपा आणि जमा केलेल्या ढिगांमध्ये पाणी घुसले असून रब्बी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने रिपरिप लावून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळ्याचा अनुभव दिला. सद्यस्थितीत या परिसरात हरभरा , गहू आदी रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम जोमात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सदर पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत तर काही शेतकऱ्यांनी या पिकांचे ढीग जमा करून ठेवले होते. मात्र, गत ४-५ दिवसांपासून बरसणाऱ्या या पावसाने रब्बी पिकांची अतोनात हानी केली असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

पावसाचे पाणी रब्बी पिकांच्या कडपा आणि ढिगांमध्ये घुसल्याने ही पिके अंकुरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शेतात उभे असलेले काढणी योग्य पिकेही धोक्यात आली आहेत. दरम्यान, शेतकरी जमा केलेल्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन वगैरे झाकून आपले पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. खरीप हंगामात विविध रोग किडींचे आक्रमण, अतिवृष्टी आदी संकटामुळे धान पीक हातचे गेले. आता रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची मदार असतांना निसर्गाने यावरही आपली वक्रदृष्टी फिरविली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे.