शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

अकाली पावसाने रब्बी पिकांची हानी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:33 IST

लोकमत न्यूज नेटवर्क विरली (बु.): या परिसरात गत ४-५ दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या अकाली पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

विरली (बु.): या परिसरात गत ४-५ दिवसांपासून दररोज हजेरी लावणाऱ्या अकाली पावसामुळे शेतात असलेल्या रब्बी पिकांच्या कडपा आणि जमा केलेल्या ढिगांमध्ये पाणी घुसले असून रब्बी पिकांचे अतोनात नुकसान होत आहे. मंगळवारी दिवसभर पावसाने रिपरिप लावून उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये पावसाळ्याचा अनुभव दिला. सद्यस्थितीत या परिसरात हरभरा , गहू आदी रब्बी पिकांच्या काढणीचा हंगाम जोमात सुरू आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात सदर पिकांच्या कडपा पसरलेल्या आहेत तर काही शेतकऱ्यांनी या पिकांचे ढीग जमा करून ठेवले होते. मात्र, गत ४-५ दिवसांपासून बरसणाऱ्या या पावसाने रब्बी पिकांची अतोनात हानी केली असून शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळविले आहे.

पावसाचे पाणी रब्बी पिकांच्या कडपा आणि ढिगांमध्ये घुसल्याने ही पिके अंकुरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे शेतात उभे असलेले काढणी योग्य पिकेही धोक्यात आली आहेत. दरम्यान, शेतकरी जमा केलेल्या ढिगांवर ताडपत्री, पॉलिथीन वगैरे झाकून आपले पीक वाचविण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत आहे. खरीप हंगामात विविध रोग किडींचे आक्रमण, अतिवृष्टी आदी संकटामुळे धान पीक हातचे गेले. आता रब्बी पिकांवर शेतकऱ्यांची मदार असतांना निसर्गाने यावरही आपली वक्रदृष्टी फिरविली आहे. परिणामी शेतकऱ्यांवर कपाळावर हात मारण्याची वेळ आली आहे.