शहरं
Join us  
Trending Stories
1
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
2
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
3
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
4
लव्ह जिहादवरील 'पुस्तका'द्वारे लोकांना भडकवायचा छांगूर बाबा, आणखी ४ सहकाऱ्यांचाही खुलासा; या जिल्ह्यांत सुरू होता धर्मांतराचा खेळ
5
ट्रम्प सरकारची नोकरदारांवरच कुऱ्हाड! १३०० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार, लवकरच पाठवणार नोटीस
6
"पैशांची एखादी बॅग देऊ...आजकल हमारा नाम बहुत चल रहा है"; शिरसाटांची मिश्कील टिप्पणी
7
राज ठाकरेंचा मुद्दा, आशिष शेलारांनी दिले उत्तर; आभार मानत म्हणाले, 'त्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्याबद्दल...'
8
“महायुतीच्या अपयशावर बोट ठेवणार, पक्षाची प्रतिष्ठा वाढवणार”; शशिकांत शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
9
IPO पूर्वी Flipkart चं मोठं गिफ्ट, ७५०० पेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना होणार फायदा
10
स्वीडिश अभिनेत्रीच्या प्रेमात पडला आशिष चंचलानी? मराठी सिनेमातही दिसली; डेटिंगच्या चर्चा
11
छांगूर बाबाने मालमत्तेत भरपूर पैसे गुंतवले; पण स्वत:च्या नावावर एकही जमीन ठेवली नाही
12
सकाळ, दुपार, रात्र... दिवसातून ३ वेळा पराठा खाल्ला तर काय होईल, आरोग्यावर कसा होतो परिणाम?
13
'माझा व्हिडीओ मॉर्फ करून बनवला,अब्रुनुकसानीची नोटीस पाठवणार'; संजय शिरसाटांचा इशारा
14
८ व्या वेतन आयोगाच्या शिफारसी केव्हापर्यंत लागू होणार, केंद्रीय कर्मचाऱ्यांना माहीत करुन घेणं गरजेचं
15
भलं करायच्या नादात, ट्रम्प कापताहेत आपल्याच लोकांचे खिसे; आकडेवारी पाहून डोक्यावर हात माराल
16
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
17
Astrology: जोडीदार 'क्लिक' होत नाही अशी तरुणांची सबब; हा ग्रहांचा परिणाम समजावा का?
18
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
19
IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराजनं सांगितलं त्याच्या आगळ्यावेगळ्या सेलिब्रेशनमागचं कारण!
20
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 

बावनथडी प्रकल्पाच्या अतिरिक्त पाण्याने शेतीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:33 IST

करडी(पालोरा):- इंदूरखा कालव्याला बावनथडी प्रकल्पाचे पाणी अतिरिक्त सोडण्यात आल्याने महसुल साझा क्रमांक २६ मधील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान ...

करडी(पालोरा):- इंदूरखा कालव्याला बावनथडी प्रकल्पाचे पाणी अतिरिक्त सोडण्यात आल्याने महसुल साझा क्रमांक २६ मधील शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. बेटाळा परिसरातील या नुकसानीस बावनथडी प्रकल्प कार्यालय जबाबदार असून प्रकरणी सखोल चौकशी व न्याय देण्याच्या मागणीसाठी जिल्हा परिषद माजी सदस्य सरिता चौरागडे यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी उपोषणावर बसण्याचा इशारा दिला आहे.

बेटाळा परिसरातील शेतशिवारात मोठया प्रमाणात इंदूरखा कालव्याचे पाणी सोडण्यात आल्याने शेतशिवार जलमय झाले आहेत. शेतातील उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. सन २००१ पासून इंदूरखा कालव्याचे काम बावथडी प्रकल्प कार्यालयाकडून पूर्ण करण्यात आलेले नाही. कालव्याच्या अपुर्णत्वास विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत.

कालव्याच्या अपूर्ण कामामुळे बेटाळा परिसरातील खरीप व रब्बीचे पीक वारंवार नुकसानग्रस्त होत असल्याने शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आहे. शेतकऱ्यांच्या समृद्धीसाठी तयार करण्यात आलेला बावनथडी प्रकल्प अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे कर्दनकाळ ठरू पाहत आहे. अतिरिक्त पाणी सोडण्यात आल्याने झालेल्या नुकसानीची तात्काळ चौकशी करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी माजी जि.प. सदस्य सरीता चौरागडे व बेटाळा परिसरातील शेतकऱ्यांनी गिरोला येथील जलसंपदाविभागाचे अधिक्षक अभियंता सोनटक्के यांना निवेदनातून केली आहे. या प्रकरणी निवेदनाच्या प्रतिलिपी सर्व संबंधितांना देण्यात आल्या आहेत.

आंदोलक शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या

कृषी विभाग व महसुल विभागाचे वतीने शेतकऱ्यांच्या शेतीचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. इंदूरखा कालव्याचे बांधकाम पूर्ण करण्यात यावे. जनावरांसाठी चाऱ्याची सोय करण्यात यावी, बेजबाबदारपणास कारणीभुत कार्यकारी अभियंता उजवा कालवा क्रमांक ५ व कार्यकारी अभियंता बावनथडी प्रकल्प श्रेणी १ बघेडा यांच्यावर व कर्मचाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात यावा.