शहरं
Join us  
Trending Stories
1
KL राहुलच्या 'सेल्फिश सेंच्युरी'सह पंतची चूक नडली? शुबमन गिल म्हणाला, मॅच तिथंच फिरली; पण...
2
भारत-इंग्लंड मालिकेतून 'हा' स्टार खेळाडू बाहेर ! हाताला गंभीर दुखापत, लवकरच शस्त्रक्रिया होणार
3
ठाण्यात पाच विद्यार्थिनींचा एकाच तरुणाकडून विनयभंग; पालकांमध्ये संताप; फरार आरोपीच्या अटकेची मागणी
4
IND vs ENG : या चौघांपैकी एकानं बुमराह-सिराजसारखा 'दम' दाखवला असता तर मॅच सहज जिंकता आली असती
5
जड्डूची लढवय्या इनिंग व्यर्थ! बुमराहनंही बॅटिंग वेळी धैर्य दाखवलं, सिराजची अनलकी विकेट अन् इंग्लंडनं मारली बाजी
6
मुंबईतील दोन तरुणांचा पाण्याच्या डोहात बुडून मृत्यू; नायगांवच्या चिंचोटीमधील दुर्दैवी घटना
7
हातातोंडाशी आलेला विजयाचा घास हिरावला... टीम इंडिया कुठे चुकली? वाचा, पराभवाची ५ कारणे
8
अमृतसरचं सुवर्ण मंदिर RDX नं उडवण्याची धमकी, ईमेलनंतर एकच खळबळ
9
लैंगिक समानतेसाठी ३५ वर्षांचा संघर्ष, हिंगणघाटच्या वर्षा देशपांडे यांचा आंतरराष्ट्रीय गौरव
10
"रशिया पुढील ५० दिवसांत युक्रेन युद्ध थांबवण्यास तयार झाला नाही, तर...!" डोनाल्ड ट्रम्प यांची रशियाला थेट धमकी
11
चेनस्नॅचिंग करणाऱ्या दिल्लीतील टोळीला नागपुरात अटक, विविध १० गुन्ह्यांची उकल
12
सातारा: प्रारुप रचना जाहीर ! जिल्ह्यात गट अन् गणात मोडतोड; नावे बदलली, गावांचीही अदलाबदल
13
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
14
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
15
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
16
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
17
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
18
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
19
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग
20
नितीन गडकरींनी दुसऱ्या सर्वात लांब केबल ब्रिजचं केलं उद्घाटन, CM सिद्धरामय्या मात्र नाराज

दुग्ध उत्पादक संकटात

By admin | Updated: September 29, 2015 02:09 IST

बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार बदलत शेतीला पूरक व्यवसाय न समजता शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. संपूर्ण कुटुंब

मुखरु बागडे ल्ल पालांदूरबदलत्या अर्थव्यवस्थेनुसार बदलत शेतीला पूरक व्यवसाय न समजता शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. संपूर्ण कुटुंब पशुपालनात गुंतून दुधाचे उत्पादन वाढविले. मात्र दुग्ध उत्पादक संघाच्या धोरणामुळे मागील ६० दिवसाचे दुधाचे चुकारे शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांना नियमित चुकारे मिळत होते. अधिकाधिक नफा कसा मिळेल याकरिता प्रयत्न करीत दुग्ध संघाने प्रयत्न केले. मात्र अलिकडे दूध संघाने अधिक नफ्याकरिता दूध खासगी संस्थांना विकत आहे. परिणामी सामान्य दूध डेअरीला ५-६ हप्ते चुकारे मिळत नाही. संचालकांच्या डेअरींचे चुकारे दर हप्त्याला दिले जात आहे. संघांचे संकलीत दूध खासगीत जात असल्याने दर व नफ्याच्या प्रमाणात तुट येत आहे. दुधाचे दर दररोज कमी होत असताना खावटीचे दर मात्र वाढत आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला असून काहींनी दूध उत्पादन बंद करून दुभत्या गाई, म्हशी विकून टाकल्या आहेत. हे वास्तव जिल्हाभर सुरु असून संचालक मंडळाला वास्तव स्थितीचा अभ्यास असतानाही ते अन्यायाविरुद्ध आवाज उचलत नाही. तत्कालीन अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या कार्यकाळात दूध संघाला मालकीची इमारत मिळाली. त्यावेळी शेतकऱ्यांचे चुकारे अडले नव्हते. त्यावेळी दुधाला योग्य दर व नियमित चुकाऱ्यांमुळे दुग्ध व्यवसायिक सुस्थितीत होता. मात्र दुध संघाने दूध भुकटी पावडर कारखाना सुरू केला. यात मोठी रक्कम गुंतल्यामुळे त्याचा थेट फटका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे दुधाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी दूध उत्पादन बंद करण्याच्या मार्गावर आहे. दुध उत्पादकांना चुकारे न देता आता दूध संघाने पशुखाद्य निर्मिती कारखाना सुरू करण्याची योजना आखली आहे. खासगी व्यापाऱ्यांकडे संघापेक्षा दीड दोन रुपये अधिक दर देऊन बाराव्या दिवशी चुकारे दिले जात आहे. त्यामुळे संघाच्या दूध डेअरी संचालकांनी दूध खासगीत विकणे सुरु केले आहे.दूध संघाने शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधी याविरुद्ध बोलत नाहीत. हे आमचे दुर्भाग्य आहे. दररोज दूध संकलन कमी होत असल्यामुळे भविष्यात डेअरी व संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे.- पांडुरंग खंडाईतअध्यक्ष, जय लहरी दुग्ध संस्था, कवलेवाडा.देशभरात दुधाचे दर घसरले आहेत. भंडारा दुग्ध संघाने भुकटी पावडर कारखाना लावून उत्पादन सुरु केले आहे. दुग्धजन्य पदार्थांना अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे देण्याकरिता विलंब होत आहे.-करण रामटेकेकार्यकारी संचालक, दुग्ध संघ भंडारा.