शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

दुग्ध उत्पादक संकटात

By admin | Updated: September 29, 2015 02:09 IST

बदलत्या अर्थव्यवस्थेनुसार बदलत शेतीला पूरक व्यवसाय न समजता शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. संपूर्ण कुटुंब

मुखरु बागडे ल्ल पालांदूरबदलत्या अर्थव्यवस्थेनुसार बदलत शेतीला पूरक व्यवसाय न समजता शेतकऱ्यांनी दुग्ध व्यवसाय सुरू केला. संपूर्ण कुटुंब पशुपालनात गुंतून दुधाचे उत्पादन वाढविले. मात्र दुग्ध उत्पादक संघाच्या धोरणामुळे मागील ६० दिवसाचे दुधाचे चुकारे शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे.यापूर्वीच्या काळात शेतकऱ्यांना नियमित चुकारे मिळत होते. अधिकाधिक नफा कसा मिळेल याकरिता प्रयत्न करीत दुग्ध संघाने प्रयत्न केले. मात्र अलिकडे दूध संघाने अधिक नफ्याकरिता दूध खासगी संस्थांना विकत आहे. परिणामी सामान्य दूध डेअरीला ५-६ हप्ते चुकारे मिळत नाही. संचालकांच्या डेअरींचे चुकारे दर हप्त्याला दिले जात आहे. संघांचे संकलीत दूध खासगीत जात असल्याने दर व नफ्याच्या प्रमाणात तुट येत आहे. दुधाचे दर दररोज कमी होत असताना खावटीचे दर मात्र वाढत आहेत. त्यामुळे दुग्ध व्यवसाय संकटात सापडला असून काहींनी दूध उत्पादन बंद करून दुभत्या गाई, म्हशी विकून टाकल्या आहेत. हे वास्तव जिल्हाभर सुरु असून संचालक मंडळाला वास्तव स्थितीचा अभ्यास असतानाही ते अन्यायाविरुद्ध आवाज उचलत नाही. तत्कालीन अध्यक्ष रामलाल चौधरी यांच्या कार्यकाळात दूध संघाला मालकीची इमारत मिळाली. त्यावेळी शेतकऱ्यांचे चुकारे अडले नव्हते. त्यावेळी दुधाला योग्य दर व नियमित चुकाऱ्यांमुळे दुग्ध व्यवसायिक सुस्थितीत होता. मात्र दुध संघाने दूध भुकटी पावडर कारखाना सुरू केला. यात मोठी रक्कम गुंतल्यामुळे त्याचा थेट फटका दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे. एकीकडे दुधाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी दूध उत्पादन बंद करण्याच्या मार्गावर आहे. दुध उत्पादकांना चुकारे न देता आता दूध संघाने पशुखाद्य निर्मिती कारखाना सुरू करण्याची योजना आखली आहे. खासगी व्यापाऱ्यांकडे संघापेक्षा दीड दोन रुपये अधिक दर देऊन बाराव्या दिवशी चुकारे दिले जात आहे. त्यामुळे संघाच्या दूध डेअरी संचालकांनी दूध खासगीत विकणे सुरु केले आहे.दूध संघाने शेतकऱ्यांच्या हिताकडे दुर्लक्ष केले आहे. लोकप्रतिनिधी याविरुद्ध बोलत नाहीत. हे आमचे दुर्भाग्य आहे. दररोज दूध संकलन कमी होत असल्यामुळे भविष्यात डेअरी व संघ अडचणीत येण्याची शक्यता आहे.- पांडुरंग खंडाईतअध्यक्ष, जय लहरी दुग्ध संस्था, कवलेवाडा.देशभरात दुधाचे दर घसरले आहेत. भंडारा दुग्ध संघाने भुकटी पावडर कारखाना लावून उत्पादन सुरु केले आहे. दुग्धजन्य पदार्थांना अपेक्षित दर मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांचे चुकारे देण्याकरिता विलंब होत आहे.-करण रामटेकेकार्यकारी संचालक, दुग्ध संघ भंडारा.