शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
3
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
4
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
5
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
6
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
7
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
8
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
9
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
10
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
11
'घरी बसणाऱ्यांना मतदारांनी नाकारले' ; नगरपरिषद निवडणुकांवर एकनाथ शिंदेंची पहिली प्रतिक्रिया
12
वर्षाखेरीस IPO बाजारात 'धुमधडाका'! या आठवड्यात ११ नवीन कंपन्यांचे आगमन; गुंतवणुकीची मोठी संधी
13
चांदेकरवाडीत पाणंद रस्त्यावर लिंबू आणि बाहुली, अंधश्रद्धेचा प्रकार, ग्रामस्थांत भीतीची सावली
14
"मला मारताहेत, जबरदस्तीने काहीतरी खायला..."; विवाहितेचा ढसाढसा रडत आईला शेवटचा कॉल
15
दोन पराभवांनंतर अखेर संजयकाका पाटलांनी मैदान मारले, आर. आर. आबांचा रोहित पाटील पराभूत
16
Siddhi Vastre: अवघ्या २२ वर्षांची तरुणी भाजपवर पडली भारी; मोहोळमध्ये इतिहास घडवणारी सिद्धी वस्त्रे आहे तरी कोण?
17
"दरवाजे उघडून बाहेरच्यांना प्रवेश दिल्याचा हा परिणाम"; चंद्रपूरातील पराभवानंतर मुनगंटीवारांचा घरचा आहेर
18
Maharashtra Local Body Election Results 2025 : अख्खं मंत्रिमंडळ ईश्वरपुरात, तरीही जयंत पाटलांनी महायुतीला दिला धक्का; सांगली जिल्ह्यातील नगराध्यक्षांची यादी एका क्लिकवर
19
विमा घेताय? केवळ जाहिरातींवर जाऊ नका; 'या' ४ तांत्रिक गोष्टी तपासा, अन्यथा क्लेमवेळी होईल पश्चात्ताप!
20
उद्धवसेना-मनसे युतीची बोलणी संपली, संजय राऊतांनी दिली महत्त्वाची माहिती; "अजूनही ७२ तास..."
Daily Top 2Weekly Top 5

एटीएम धारकांच्या रोज डझनभर तक्रारी

By admin | Updated: May 7, 2015 00:21 IST

बँक ग्राहकांना मानवी हस्तक्षेपाशिवाय आर्थिक व्यवहार करता यावा याकरीता धनयंत्राची अर्थात 'एटीएम'ची सोय ...

१०० च्या नोटांची टंचाई कायमच : पैसे बाहेर न येताच मोबाईलवर डेबिटचा एसएमएसभंडारा : बँक ग्राहकांना मानवी हस्तक्षेपाशिवाय आर्थिक व्यवहार करता यावा याकरीता धनयंत्राची अर्थात 'एटीएम'ची सोय करण्यात आली. पैसे काढणे आणि ते भरण्यासाठीही या यंत्राचा वापर केला जावू लागला. त्यामुळे माणूस प्रगतीकडे चालला, असे दिसत असतानाच आता यंत्रावर विसंभून राहिल्यानंतर त्याचे दुष्परिणाम समोर येवू लागले आहेत. पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेल्यावर त्यात पैसेच नाही अथवा शंभराच्या नोटाच नाहीत, अशा सूचना वारंवार मिळत असतात. एटीएममध्ये कार्ड अडकणे, पैसे बाहेर न येताच अकांऊंटवर डेबिटचा एसएमएस येणे अशा एक ना अनेक तक्रारी बँकाकडे रोज येत असतात. (नगर प्रतिनिधी)रिझर्व्ह बँकेच्या सूचना कागदावरच तंत्रज्ञानामुळे शक्य झालेल्या या सर्व बदलात एटीएममध्ये पैसा आणि ग्राहकांच्या सुरक्षेततेसाठी डोअर सेफ्टी कॅमेरे व सुरक्षा रक्षक असतात. मात्र ते बसविणाऱ्यांवर लक्ष ठेवणार कोण? हाही प्रश्न आता निर्माण होवू ला२गला आहे. भारतात एटीएमची सुरवात बरीच वर्ष उलटलीत मात्र आजही या यंत्रणेला परदेशातील एटीएमसारखी सर येवू शकलेली नाही. एटीएममधून पैसे काढण्यासाठी कार्डचा वापर केल्यावर पैसे मशिनमधून बाहेर न येताच अकाऊंडला डेबिट पडल्याच्या अनेक तक्रारी आजही येतात. या तक्रारीच्या पार्श्वभूमिवर रिझर्व्ह बँकेने कठोर पावले उचलली होती. अर्थात नियम भाराभर असले तरीही प्रत्येक्षात त्यावर कार्यवाही झाली नसल्याचे चित्र बघावयास मिळत आहे.सारे गणितच विस्कळीत होतेसकाळच्या लगबगीमध्ये ग्राहक खात्यावरचे पैसे काढण्यासाठी घाईघाईत एटीएमवर जातो. तेवढ्याच तत्परतेने तो एटीएमच्या स्क्रीनवर दिसणारे सर्व आॅपशन आॅपरेट करतो. स्क्रीनवर सर्व व्यवहार पूर्ण झाल्याच्या सूचना दिल्या जातात. एटीएममधून नोटा मोजण्याचा आवाजही ऐकू येतो. एवढेच काय तर पैसे काढले गेल्याचा मॅसेज मोबाईलवर काही सेकंदातच धळकतो. प्रत्येक्षात मात्र हाती रूपयाही पडत नाही. त्यामुळे ग्राहकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतो. त्यातच ईमरजन्सी सर्व्हिसेससाठी पेमेंट करायचे असेल तर विचारायला नको. अशावेळी तंत्रज्ञानाच्या अधिन राहून बेफिकीर बनू पाहणाऱ्या बँकांवर वचक ठेवण्याची वेळ आली आहे. एटीएममधून पैसे बाहेर न निघताच डेबिटचा एसएमएस धडकल्यानंतर ग्राहक हे बँकेत जावून याबाबतची तक्रार करतात. मात्र बँकेत गेल्यानंतरही ग्राहकाच्या पदरी निराशाच पडते. त्यामुळे ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. एटीएमचा फलक कायम टांगलेला राष्ट्रीयकृत बँकेची शाखा असलेल्या अनेक बँकांचे एटीएम अनेकदा बंद अवस्थेत असतात. अनेकवेळा पैसे काढण्यासाठी गेल्यावर यंत्रात पैसेच नाहीत, अशी सूचना स्क्रीनवर धडकते. याशिवाय पैसे असले तरी शंभर आणि ५०० च्या नोटा शिल्लक नाहीत अशीही सूचना येते. त्यामुळेच १०० रूपयाच्या पटीत पैसे काढण्यासाठी आलेल्या ग्राहकांना दुसऱ्या एटीएमचा वापर करावा लागतो.बॅकअप नाही, एसी बिघडला एटीएम मशीन इंटरबँक नेटवर्कशी कनेक्टेड असते. बहुतांश एटीएमचे कार्य सॅटेलाईटच्या माध्यमातून सुरू असते. त्यामुळे कधी कधी ही लिंक मध्येच खंडित होण्यामुळेही व्यवहार अपुर्ण राहू शकतो. बॅकअप नसणे, एसीतला बिघाड अथवा एटीएम हँग होणे आदी कारणांमुळे व्यवहार पुर्ण होत नाही. त्यातही आता अनेक एटीएमचे सिक्युरिटी लॉकिंग सिस्टीमचे तीन तेरा वाजलेले दिसत असतात.