शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ऍझोला पाणवनस्पतीचे संगोपन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2021 10:47 IST

भंडारा तालुक्यात दहा टक्के रासायनिक खत बचत मोहीम

 लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा :  ऍझोला पाणवनस्पती ही बहुगुणकारी वनस्पती असून शेतकऱ्यांनी आपल्या घराशेजारी सावलीमध्ये या पानवनस्पतीचे संगोपन करावे. ही वनस्पती हिरवळीचे खत म्हणून उपयोगात आणता येते. या पाणवनस्पतीच्या पेशीत नत्र स्थिर करणारी ऍनाबीना ऍझोली नावाची नील-हरित शेवाळ वर्गातील वनस्पती वाढत असल्याने शेतकऱ्यांना दुहेरी फायदेशीर ठरत असल्याचे प्रतिपादन भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी केले.

भंडारा तालुका कृषी विभागातर्फे कृषी सप्ताहानिमित्त दहा टक्के रासायनिक खत बचत मोहिमेअंतर्गत तालुक्यातील शेतकऱ्यांशी ते बोलत होते. भंडारा तालुका कृषी विभागाच्या वतीने तालुक्यातील पलाडी, भिलेवाडा, सिरसी, जाख, शहापूर, खरबी,माटोरा येथे आयोजित उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांना दहा टक्के खत बचत मोहीम तसेच  ऍझोला पानवनस्पतीचे प्रात्यक्षिकातून मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी पहेलाचे मंडळ कृषी अधिकारी होमराज धांडे, भंडारा मंडळ अधिकारी दीपक आहेर, पर्यवेक्षक विजय हुमणे, कृषी अधिकारी कळाम, कृषी सहाय्यक गिरीश रणदिवे, कृषीसेवक भाग्यश्री पडोळे, देवा जवंजाळ यांच्यासह शेतकरी उपस्थित होते. कोटांगले यांनी शेतकऱ्यांना  ऍझोला ऍझोला कल्चर बनविताना तीन फूट रुंद, दहा फूट लांब, अर्धा फूट खोल टाकी तयार करून त्यामध्ये शेण, माती, सिंगल सुपर फॉस्फेट मिक्स करुन त्या टाक्यामध्ये पाणी भरून  ऍझोला कल्चर कसे सोडायचे हे प्रात्यक्षिकातून दाखविले. दर चौरस मीटरला ३०० ग्रॅम  ऍझोला ऍझोला धानाच्या बांधीत टाकल्यास दहा ते पंधरा दिवसात त्याची भरघोस वाढ होऊन प्रतिहेक्‍टरी पाच ते दहा टन  ऍझोला तयार होऊन पिकास उपलब्ध होतो. यामुळे युरिया खताची गरज भासत नाही. त्यामुळे अझोला कल्चर हे शेतकऱ्यांना अतिशय फायदेशीर ठरते. मंडळ अधिकारी होमराज धांडे यांनी  ऍझोला कल्चर दूध उत्पादक शेतकऱ्यांना कसे फायदेशीर ठरते व त्याचा शेतीसाठी कसा उपयोग होतो हे सांगितले. कृषी सहायक गिरीश रणदिवे यांनी  ऍझोलाचे प्रात्यक्षिक दाखवले. संचालन कृषी सहायक गिरीश रणदिवे यांनी केले तर आभार देवा जवंजाळ यांनी मानले.

हवेतील मुक्त नत्र स्थिर करून ३० ते ४० किलो नत्र प्रति हेक्‍टरी मिळत असते. यामुळे युरिया खताची बचत होऊन उत्पादन खर्च कमी होतो. वनस्पतीमध्ये वाढ वर्धक पदार्थ जमीन तयार करून सोडल्यामुळे पिकाची वाढ जोमाने होते. प्रतिहेक्‍टरी उत्पादन २० ते ३० टक्‍क्‍यांनी वाढ होते. हरितद्रव्य मुक्त हिरवी पानवनस्पती असल्याने हवेत प्राणवायू सोडते व हवा शुद्ध ठेवण्यास मदत करते. दुभत्या जनावरांना दररोज खाद्यान्नामध्ये दिल्यास दुधात फॅटचे प्रमाण वाढते. यामुळे जनावरांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. भंडारा तालुक्यात कृषी सप्ताहात  ऍझोला वनस्पतीचे प्रात्यक्षिके दाखवण्यात येत आहेत.

टॅग्स :agricultureशेती