शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
4
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
5
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
6
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
7
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
8
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
9
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
10
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
11
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
12
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
13
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
14
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
15
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
16
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
17
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
18
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
19
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
20
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’

करडी येथे आम्रवृक्षाची खुलेआम होत आहे कत्तल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 22:25 IST

करडी येथे लाकूड कंत्राटदाराकडून कटाईची परवानगी न घेता अवैधरित्या फळझाडे तोडण्याचे काम सुरु आहे. आंबे लागलेल्या झाडांची खुलेआम कत्तल होत असतांना तुमसर वनविभागाचे ठेकेदारांच्या गैरप्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे.

ठळक मुद्देठेकेदाराचा प्रताप : तुमसर वनविभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : करडी येथे लाकूड कंत्राटदाराकडून कटाईची परवानगी न घेता अवैधरित्या फळझाडे तोडण्याचे काम सुरु आहे. आंबे लागलेल्या झाडांची खुलेआम कत्तल होत असतांना तुमसर वनविभागाचे ठेकेदारांच्या गैरप्रकारांकडे सर्रास दुर्लक्ष होत आहे. करडी गोटाळी मैदानाजवळ विनापरवानगी आंब्याच्या झाडांची कत्तल करण्यात आली असून प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.फळांचे झाडे पशुपक्षी व मानवांसाठी मौल्यवान आहेत. त्यामुळे फळांचे झाड तोडण्यापुर्वी त्यांची रितसर वनविभागाकडून परवानगी घेण्याचे शासनाचे आदेश आहेत. परंतू करडी परिसरात मोठ्या प्रमाणात लाकूड ठेकेदारांनी नियमांना बगल देत मनमर्जीने फळझाडांच्या कत्तली सुरु केल्या आहेत. शेतकरीही पर्यावरणाच्या ºहासाचा विचार न करता दुर्लक्ष करुन ठेकेदारांकडून घरपोच पैसे मिळत असल्याने सातबारा व अन्य कागदपत्रे सुपूर्द करीत आहेत. अधिकारी सुध्दा ठेकेदारांकडून मिळणाऱ्या लालसेपोटी खसºयाच्या ठिकाणी जातांना दिसत नाही. कार्यालयातूनच सर्व सोपस्कर पार पाडीत ठेकेदारांना गैरप्रकार करण्याची परवानगी देत आहेत.लाकूड कटाईच्या नियमानुसार झाडे कापण्यापूर्वी रितसर वनधिकाऱ्यांकडून परवानगी घेणे गरजेचे असते. तसेच कापलेल्या झाडांच्या ठिकाणीच अन्य सोपस्कर पार पाडल्यानंतर वाहतुकीची परवानगी दिली जाते. तोपर्यंत ठेकेदारांना शेतातून लाकडे बाहेर काढण्यास मनाई आहे. परंतू करडी परिसरात बेकायदेशिरपणे झाडांच्या अवैध कत्तली व वाहतूक केल्या जात आहेत. आता तर आंबे लागलेल्या फळझाडांना सुध्दा ठेकेदारांनी सोडलेले नाही. करडी गोटाळी मैदानाजवळील आंब्याचे मोठे झाड ठेकेदाराने कोणत्याही परवानगी न घेता कटाई केली असल्याने प्रकरणी चौकशी व कारवाईची मागणी होत आहे.करडी परिसर ठेकेदारांसाठी नंदनवनकरडी परसर सध्या लाकूड ठेकेदारांचे नंदनवन ठरतांना दिसत आहे. या भागात बाहेरुन आलेले ठेकेदार कार्यरत आहेत. तुमसर वनविभागाच्या आशिर्वादाने सागवन व आडजातीचे झाडे परवानग्या न घेता तोडल्या जावून वाहतूक व साठवणूक गावाशेजारी केली जात आहे.परिसरात खडकी, पालोरा, बोरगाव, करडी, पांजरा, नवेगाव, मोहगाव, निलज आदी गावात मोठ्या प्रमाणात लाकूड ठेकेदारांनी वाहतुकीची परवानगी न घेता लाकडांची साठवणूक केली आहेत. याकडे वनविभागाने लक्ष देण्याची गरज आहे.

टॅग्स :forest departmentवनविभाग