शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon Update : आनंदाची बातमी! या राज्यांमध्ये मान्सूनचे दमदार आगमन; मुसळधार पावसाचा इशारा, महाराष्ट्रात कधी येणार?
2
रशियाने युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला केला, ३६७ ड्रोन, क्षेपणास्त्रे डागली
3
Tejashwi Yadav : “मला हे आवडत नाही आणि मी ते सहनही करू शकत नाही”; तेजस्वी यादव यांनी स्पष्टच सांगितलं
4
मोदींच्या नेतृत्वात एनडीएचे जोरदार शक्तीप्रदर्शन; २० मुख्यमंत्री, १७ उपमुख्यमंत्री बैठकीला हजर...
5
'आमच्या 24 कोटी लोकांचे जीवन...', पाकिस्तानची सिंधू पाणी करारासाठी UN मध्ये धाव
6
सोन्याच्या तेजीचा फायदा घ्यायचाय? दागिन्यांऐवजी नाणे खरेदी करा; 'हे' आहेत ८ मोठे फायदे
7
'जोपर्यंत हिंदू स्वतः मजबूत होत नाही, तोपर्यंत...', RSS प्रमुख मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती
8
...ती पोस्ट नडली, तेजप्रताप यादव यांची RJDमधून हकालपट्टी, वडील लालूप्रसाद यादव यांनी केली कारवाई
9
Harsha Richhariya : “महाकुंभमुळे माझं आयुष्य पूर्णपणे बदललं, कधी कल्पनाही...”; असं का म्हणाली हर्षा रिछारिया?
10
भयावह! शेकडो ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला, १३ जणांचा मृत्यू
11
महिलांसाठी खुशखबर! पोस्ट ऑफिसच्या 'या' ५ योजनांमध्ये करा गुंतवणूक, बँकांपेक्षाही जास्त व्याज आणि सुरक्षित भविष्य!
12
एअरटेलच्या वारसदाराने युके सोडले! श्रीमंतावर कर लादला म्हणून? अरबांच्या देशात शिफ्ट झाले...
13
"१० वर्षांपूर्वी माझा घटस्फोट झाला, त्यानंतर...", Divorce बद्दल अपूर्वा नेमळेकरचं भाष्य, म्हणाली- "मी अजूनही सिंगल..."
14
पाकिस्तानच्या २ गद्दारांना अमेरिकेतून अटक, बनावट कंपनीच्या नावाखाली सरकारलाही फसवत होते!
15
वरमाला घालतेवेळी नवऱ्याचे हात पाहून नवरीला आला संशय! संतापत लग्न करण्यास दिला नकार
16
फक्त हॉटेल्सच नाही, आता तुमचं घरही 'ओयो' भाड्याने देणार! कंपनीचा 'हा' प्लॅन ठरणार गेम चेंजर?
17
हुंड्यासाठी तगादा, चारचाकी गाडीची मागणी..! त्रासलेल्या विवाहितेचा टोकाचा निर्णय
18
अतिक्रमण हटवण्यासाठी गेलेल्या पथकावर साधूने त्रिशूळाने केला हल्ला, एक पोलीस अधिकारी जखमी   
19
शनैश्चर जयंती: ३ राशींची साडेसाती, शनिला प्रसन्न करण्याची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा उपासना

जनतेत आपलेपणाची भावना निर्माण करा

By admin | Updated: April 11, 2016 00:31 IST

एखाद्या शासकीय कार्यालयात गेल्यावर हे कार्यालय आपले आहे अशी भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे.

जगन्नाथ भौर यांचे प्रतिपादन : समता सप्ताहाचे उदघाटनभंडारा : एखाद्या शासकीय कार्यालयात गेल्यावर हे कार्यालय आपले आहे अशी भावना सामान्य माणसाच्या मनात निर्माण झाली पाहिजे. हे शासन, प्रशासन आपल्यासाठी काम करते याची जाणीव झाली तरच जनता शासकीय कार्यालयात जाऊन आपले प्रश्न सोडवू  शकतील.  जनतेमध्ये ही आपलेपणाची भावना निर्माण करण्याचे काम  शासन, प्रशासनात काम करणाऱ््यांनी केले पाहिजे, असा अर्थ  डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत  होता, असे  प्रतिपादन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांनी केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित समता सप्ताहाच्या उदघाटन कार्यक्रमप्रसंगी ते बोलत होते.  यावेळी जिल्हा कोषागार अधिकारी अमित मेश्राम, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, सहाय्यक आयुक्त देवसुदन धारगावे उपस्थित होते. भोर म्हणाले, समता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न बाबासाहेबांनी केला. मात्र, त्यांना अपेक्षित असलेली समता आपण अजूनही प्रस्थापित करू शकलो नाही. श्रीमंती- गरीबीची दरी वाढत आहे. महिलांना अजूनही सामान न्याय मिळालेला नाही. समता सप्ताहाच्या निमित्ताने सर्व समाजात समता प्रस्थापित करू याचा निर्धार करुया, असेही ते यावेळी म्हणाले.यावेळी अमित मेश्राम म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी  शिक्षणापासून ते सिंचनापर्यंत सर्व क्षेत्रात काम केले. दामोदर व्हॅली सारखे धरण बांधण्याची योजना त्यांची होती. देशातल्या सर्व भागातनैसर्गिक साधन सामुग्रीचा समान  वाटा सवार्ना मिळाला पाहिजे हे त्यांची न्याय बुद्धी होती. बाबासाहेबांचे असे  अनेक कार्य आहेत जे अद्यापही लोकांना माहिती नाही. इतके अफाट काम एका आयुष्यात या महामानवाने जिथे पुढारलेल्या देशांनीही महिलांना मतदानाचा हक्क देण्यास टाळाटाळ केली तिथे स्वतंत्र  भारतातील महिलांना लगेच मतदानाचा हक्क केवळ बाबासाहेबांमुळे मिळू शकला. स्त्रियांना प्रसूती रजा देण्याचा अधिकार असो की, संपत्ती मधे समान वाटा, बाबासाहेबांनी महिलांना पुरुषांच्या बरोबरीत समानता दिली. मात्र स्वातंत्र्याच्या ६९ वषार्नंतर सुद्धा आजही महिलांना मंदिरात प्रवेश बंदी केली जाते.  शिक्षण, नोकरी, राजकारण कुठेही महिलांना समान संधी अजूनही मिळाल्या नाहीत. आजही  त्यांना ३३ टक्के आरक्षणाच्या  बेडीत अड़कवून ठेवले आहे.  म्हणजेच बाबासाहेबांना जी समता अभिप्रेत होती ती आपण अजूनही प्रस्थापित करू शकलो नाही असे मत मनीषा सावळे यांनी व्यक्त केले. समाज कल्याण सहाय्यक आयुक्त धारगावे यांनी प्रस्ताविक करताना बाबासाहेबांच्या १२५ व्या जयंती वर्षा निमित्त करण्यात आलेल्या विविध कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच समता सप्ताहांत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहितीही यावेळी सांगितली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, ज्योतिबा फुले आणि छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला दलित मित्र,  सामाजिक कार्यकर्ते, महाविद्यालयीन विद्यार्थी नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. (प्रतिनिधी)