शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

कोरोनाच्या ऊद्रेकाने शाळांतील कर्मचारी धास्तावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:31 IST

लोकमत न्यूज नेटवर्क भंडारा : दररोज कोरोनाबाधितांची संख्या शहर व ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे काही काळ सुरू ...

लोकमत न्यूज नेटवर्क

भंडारा : दररोज कोरोनाबाधितांची संख्या शहर व ग्रामीण भागात वाढत आहे. त्यामुळे काही काळ सुरू असलेले पाचवी ते नववी तसेच अकरावीचे वर्ग बंद करण्यात यावेत, अशी मागणी करणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे. जिल्ह्यात कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे.

ग्रामीण भागात तर कोरोनाने पहिल्यांदाच अधिक संख्येने हातपाय पसरले आहेत. जिल्हाभर यामुळे भीतीदायक स्थिती निर्माण झाली आहे. इतकी गंभीर परिस्थिती असतानाही जिल्ह्यातील पाचवी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. शाळेत होणारी विद्यार्थ्यांची गर्दी व कोरोनाचा कहर यामुळे पालक, विद्यार्थी यांच्यासह शिक्षक, कर्मचारीही धास्तावले आहेत. विविध गावातून विद्यार्थी शाळेत येत असतात. तसेच गावात कोणाच्या घरी कोविड रुग्ण आहे, याचा पत्ता लागत नाही. शाळेत तापमान तपासणी व दररोज विद्यार्थ्यांचे हात निर्जंतूक केले जात असले तरी मोठा संभाव्य धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे यावर वेळीच निर्बंध घातले जावेत. यासाठी किमान पाचवी ते नववी व अकरावीचे वर्ग तूर्त बंद करण्यात यावेत, अशी मागणी जिल्हा मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राजू बालपांडे, सचिव राजू बांते, रेखा भेंडारकर, प्रमोद धार्मिक, प्रदीप मुटकुरे, सुनील गोल्लर, अर्चना बावणे, राधेश्याम धोटे, विष्णूदास जगनाडे आदींनी केली आहे.

बॉक्स

अधिकाऱ्यांमध्ये कमालीची भीती

भंडारा जिल्हा मुख्याध्यापक संघाचे केवळ पाच पदाधिकारी निवेदन देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले, तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांची बैठक सुरू होती. त्यामुळे निवेदन निवासी जिल्हाधिकाऱ्यांना द्या, असे सांगण्यात आले. मात्र, मुख्याध्यापक संघाच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन द्यायचे असल्याचा निरोप देऊनही त्यांना बोलावण्यात आले नाही. सुमारे अर्धा तास संघाचे पदाधिकारी बोलावण्याची प्रतीक्षा करत होते. यावेळी निवासी जिल्हाधिकारी बाहेर पडले. त्यांनी मुख्याध्यापक संघाचे निवेदन घेतले नाही म्हणून अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना निवेदन द्या, असे एका कर्मचाऱ्याने संगितले. मात्र, त्यांनीही निवेदन घेण्यास नकार दिला. तसेच तेथील अधीक्षक यांना निवेदन देऊ शकता, असे सांगण्यात आले. एका अधिकाऱ्यांनी तर कोविड -१९ प्रादुर्भाव आहे कळत नाही का, असे म्हणत तिथून हाकलून लावले. डिस्पॅचमध्ये निवेदन द्या, असेही सांगण्यात आले. एक तास फिरवाफिरवी झाल्यानंतर मुख्याध्यापक संघाने अखेर डिस्पॅचला निवेदन दिले.