शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

कोरोनामुळे अकाली मृत्यू वाढले; मृत्यूपत्र करणाऱ्यांची संख्याही वाढली !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST

भंडारा : कोरोनामुळे जीवनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी ज्येष्ठ नागरिकांसह तरुण दाम्पत्य मृत्युपत्र तयार करण्यासाठी वकिलांशी संपर्क साधत ...

भंडारा : कोरोनामुळे जीवनाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. परिणामी ज्येष्ठ नागरिकांसह तरुण दाम्पत्य मृत्युपत्र तयार करण्यासाठी वकिलांशी संपर्क साधत आहेत. पूर्वी अतिश्रीमंतांमध्ये होणारे मृत्युपत्र आता सर्वसामान्यांमध्येही दिसून येत आहे. मृत्युपत्र कौटुंबिक स्वास्थ्यासाठी चांगले असले तरी या महामारीमुळे लोकांच्या मनात मृत्यूचे भय वाढत असल्याची जाणीव होत आहे.

जिल्ह्यात ५८ हजारांच्यावर कोरोना रुग्णांची संख्या पोहोचली आहे, तर १०५४ च्यावर बाधितांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये बहुतांश कुटुंबातील प्रमुख व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे. अकाली मृत्यूमुळे मालमत्ता हस्तांतरासह इतर अनेक प्रश्न निर्माण होत आहेत. त्यामुळे आपल्या पश्चात कुटुंबाला या समस्या भेडसावू नयेत, या उद्देशाने अनेकजण मृत्युपत्राचा आधार घेत आहेत. यामध्ये वकिलांमार्फत केल्या जाणाऱ्या रजिस्टर मृत्युपत्रासह स्वत: पेपरवर मृत्युपत्र लिहित आहेत.

जमा केलेले मृत्युपत्र करण्यावर भर

बऱ्याचदा मृत्युपत्रातील मजकुराची माहिती घरातील सदस्यांना मृत्यूपर्वी होऊ द्यायची नसते. तेव्हा नोंदणी करणारा नोंदणीकृत केलेले मृत्युपत्र पाकिटात सील करून दुय्यम निबंधकाकडे जमा करतो. याला जमा केलेले मृत्युपत्र असे म्हणणात. जिल्ह्यात काही प्रमाणात असे मृत्युपत्र होत असताना दिसून येत आहे.

३० टक्क्यांनी वाढ

संसर्गजन्य आजारांमुळे या नाशिवंत शरीराचा काही भरोसा नाही. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असताना वकिलांकडे मृत्युपत्राबाबत चौकशी करणाऱ्यांची संख्या ३० ते ४० टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वी वयोवृद्धांकडून मृत्युपत्राबाबत विचारपूस व्हायची आता नवविवाहित देखील मृत्युपत्र करीत आहेत.

आवश्यक कागदपत्रे

केवळ बौद्धिक आणि मानसिकदृष्ट्या सक्षम व्यक्ती मृत्युपत्र तयार करू शकताे. मृत्युपत्र करताना डॉक्टरांचे आरोग्याच्या स्थितीबाबतचे प्रमाणपत्र, दोन साक्षीदारांच्या सह्या आवश्यक आहेत.

नाममात्र शुल्कात नोंदणी

स्वमेहनतीने कमावलेल्या मालमत्तेचे मृत्युपत्र न करता एखादी व्यक्ती मरण पावली तर त्यांच्या कायदेशीर वारसांना त्यांचे नाव त्या संपत्तीत नोंदविण्यासाठी वारसाने हक्क प्रमाणपत्र न्यायालयातून मिळवावे लागते. त्यासाठी संपत्तीच्या मूल्यांकनानुसार साधारण ७५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मृत्युपत्र मात्र कितीही मालमत्ता असली तरी नाममात्र नोंदणी शुल्क भरून करता येते. साधारण वकिलाचा खर्च पकडून नोंदणीकृत मृत्युपत्र दोन ते तीन हजार रुपयात तयार होते. तसा नोंदणी खर्च तर फक्त शंभर रुपये आहे.

कोरोनामुळे जीवनाची अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्यातच कोरोनामुळे वेगवेेगळ्या ठिकाणी असणारे कुटुंबीय एकत्र आले आहेत. त्यामुळे आपसूकच संपत्तीच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. त्यामुळे अनेकजण वकिलांकडून मृत्युपत्र तयार करताना दिसून येत आहे. नोंदणी कायद्यानुसार मृत्युपत्राची नोंदणी ऐच्छिक आहे. इच्छा असल्यास मृत्युपत्राची नोंदणी करता येऊ शकते. वाद निर्माण झाल्यास अनोंदणीकृत मृत्युपत्राच्या तुलनेत नोंदणीकृत मृत्युपत्र सिद्ध करणे सोपे असते. म्हणून नोंदणी करणे केव्हाही श्रेयस्कर ठरते. स्वत:च्या मेहनतीने कमावलेल्या मालमत्तेची व्यवस्था न केल्यामुळे आपल्या मृत्युनंतर कौटुंबिक कलह निर्माण होतात. हे घरगुती वाद टाळण्यासाठी मृत्युपत्राचा दस्त महत्त्वाचा ठरतो.

-ॲड. प्रशांत गजभिये, लाखनी.