शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
3
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
4
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
5
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
6
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
7
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
8
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
9
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
10
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
11
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
12
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
13
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
14
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
15
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
16
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
17
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
18
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोरोना संकटाने अंतरबाह्य बदलला माणूस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2020 04:26 IST

कोरोनाने जिल्ह्यातील अनेक परंपरा रोखण्याचाही प्रयत्न केला. यात्रा, उत्सव रद्द झाली. धार्मिक स्थळेही कुलूपबंद होती. परंतु माणसांनी आस्था सोडली ...

कोरोनाने जिल्ह्यातील अनेक परंपरा रोखण्याचाही प्रयत्न केला. यात्रा, उत्सव रद्द झाली. धार्मिक स्थळेही कुलूपबंद होती. परंतु माणसांनी आस्था सोडली नाही. आपल्या आराध्य दैवतावरचा विश्वास ढळू दिला नाही. लग्न सोहळ्यावर अनेक जण लाखोंचा खर्च करतात. त्यातून बडेजाव करण्याचा प्रयत्न होतो. मात्र कोरोना संकटात कितीही श्रीमंत असला तरी त्याला साधेपणातच लग्न करावे लागले. या सोहळ्यावर होणारी वारेमाप उधळपट्टीही थांबली. मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत लग्न सोहळा होवू शकतो, हे या शरत्या वर्षाने सर्वांना शिकविले. मरणदारी आणि तोरणदारी गेलेच पाहिजे, अशी परंपरा आहे. परंतु मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या घरापर्यंत पोहचेनेही कोरोनाने कठीण झाले होते. अगदी जवळच्या २० आप्तसोकीयांच्या उपस्थितीतच अंत्यसंस्कार करण्याची वेळ कोरोना वर्षात आली. एकंदरीत सरत्या वर्षाने माणूस अंतरबाह्य बदलला असून या संकटातून धडा घेत तो आता मार्गक्रमण करणार आहे.

बॉक्स

कोरोनाने दिले नवीन शब्द

कोरोना संकटाने अनेक नवीन शब्द सर्वसामान्यांना माहित झाले. लॉकडाऊन हा शब्द तर प्रत्येकाच्या तोंडी दिसून येतो. लहानांपासून मोठ्यांपर्यंत लॉकडाऊन म्हणजे काय, याचा अनुभव घेतला. कंटेन्टमेंट, आरटीपीसीआर, ॲन्टीजेन, स्वॅब असे शब्द आता सर्वांच्या अंगवळणी पडले आहे.

बॉक्स

परतीच्या मजुरांना मदतीचा हात

कोरोना संकटामुळे महानगरातील हजारो मजूर पायदळ आपल्या गावाकडे निघाले होते. मध्यप्रदेश, छत्तीसगढ राज्यातील शेकडो मजूर दररोज भंडारा शहरातून पायदळ जात होते. आबालवृद्ध आपले गाठोडे घेवून मोठ्या कष्टाने मजल दरमजल करीत होते. अनेकांजवळ तर पैसेही नव्हते. भूकेने व्याकूळ झालेल्या अनेकांना भंडारा शहराने आधार दिला. ठिकठिकाणी या काळात अन्नछत्र उघडून त्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यात आली. शासनानेही सेल्टरहोम उघडून तेथे निवासाची व्यवस्था केली. झाडू विक्रीचा व्यवसाय करणारे २५ कुटुंब भंडारात अडकले हाेते. त्यांना प्रशासनाने मदतीचा हात देत महिनाभर सेल्टरहोममध्ये ठेवले. त्यानंतर खास वाहनाने त्यांना गावी पाठविले. अनेकांना या कोरोनाने संकटाच्या खाईत लोटले असेल तरी माणसातील देव या संकटात धावून आल्याचा प्रत्येय आला.