शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

कोरोनामुळे लग्नसमारंभातील बडेजावपणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधूंनी लग्न उरकून घेतले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमध्ये लग्नसोहळ्यासाठी २५ वऱ्हाड्यांची ...

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधूंनी लग्न उरकून घेतले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमध्ये लग्नसोहळ्यासाठी २५ वऱ्हाड्यांची उपस्थिती आणि २ तास वेळ असे निर्बंध घातल्यामुळे काही वर-वधूंनी आपले नियोजित लग्न पुढे ढकलले आहे. मात्र, बहुतांश वर-वधू आलिया भोगासी असावे सादर या उक्तीप्रमाणे आता आपले मन मोडून लग्न उरकून घेत आहेत. लग्नसोहळ्यात बहुतांश आई-वडिलांकडून बडेजावपणाचे दर्शन घडते. समाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढून लग्नसोहळ्यात पैशाची उधळपट्टी केली जाते. या खटाटोपात अनेक मध्यमवर्गीयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. मात्र, कोरोनामुळे या सर्व बडेजावपणाला ब्रेक लागला असून गरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या मुला-मुलींचे लग्न अगदी साधेपणाने पार पडत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. अगदी कमी खर्चात लग्नसोहळा आटोपत असल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय आई-वडिलांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कोरोनामुळे किमान लग्नसोहळ्यातील गरीब-़श्रीमंतांमधील दरी तरी नाहीशी झाली असून कोरोनाने सध्या सर्वांना एकाच पंक्तीत आणून बसविले आहे.

बॉक्स

कमी खर्चातील बचतीची कोरोनाने दिली शिकवण

लग्नसोहळ्यातील खर्चाच्या बचतीसाठी राज्यात सर्वत्र सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ जोमाने राबविण्यात येत होती. मात्र, कोरोनाने या सर्वांना फाटा देऊन वैयक्तिक लग्नसोहळाही कमी खर्चात पार पाडता येतो, अशी शिकवण दिली आहे. अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले. लग्नसमारंभावरील या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय, बँडपथक, कॅटरर्स, डेकोरेशन, सुगम संगीत पथक आदी अनेक व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.