शहरं
Join us  
Trending Stories
1
अंकारा हादरलं! लिबियाच्या मिलिट्री चीफना घेऊन जाणारं विमान कोसळलं, एअरपोर्ट तडकाफडकी बंद
2
बांगलादेश भारताकडून ५०,००० टन तांदूळ खरेदी करणार; दोन्ही देशांचे संबंध सुधारण्यासाठी युनूस सरकारचे प्रयत्न
3
३० वर्षांचा संसार, क्षणाचा राग अन् होत्याचं नव्हतं झालं; संशयी पतीने पत्नीला क्रूरपणे संपवलं
4
मोठा गेम प्लॅन! भाजपने शिंदेसेनेचे ठाण्यामध्येच दाबले नाक; मुंबईत अधिक जागा मागू नये म्हणून...
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २४ डिसेंबर २०२५: धनलाभ होईल, नवे काम हाती घ्याल!
6
कोर्टात कराड प्रथमच बोलला; पण न्यायाधीशांनी थांबवले; संतोष देशमुख हत्या प्रकरणी दोषारोप निश्चित
7
संपादकीय: त्रिशंकूंची त्रेधातिरपीट! एचवन-बी व्हिसाधारक आज अक्षरशः लटकले आहेत...
8
महापालिका निवडणूक : मुंबईत भाऊबंध प्रयोगाचा आज आरंभ; पुण्यात पवार काका पुतण्यांचे मनाेमिलन होणार
9
बेहिशेबी मालमत्ता प्रकरणी उद्धव ठाकरेंना काेर्टाचा दिलासा; मुलीनंतर पित्याची याचिका फेटाळली
10
बांधकाम मजुरांना किमान मास्क तरी द्या! तुम्हाला गरिबांची काळजी नाही; हायकोर्टाचे फटकारे   
11
पाच लाखांची लाच घेताना जीएसटी अधीक्षकाला अटक; अधिकाऱ्याकडे सापडले घबाड, सीबीआयची कारवाई
12
सरकारला मजुरांच्या घामाची किंमत आहे का? मनरेगा बदलण्यावर विस्तृत लेख...
13
प्रदूषणकारी मेट्रो-२ बीच्या आरएमसी प्लांटचे काम थांबवा; ‘एमएमआरडीए’च्या कंत्राटदाराला नोटीस 
14
निश्चित नसलेल्या जागी कुत्र्यांना अन्न देण्यापासून रोखणे गुन्हा ठरत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वपूर्ण निर्वाळा  
15
म्हाडा अधिकारी राजकीय दबावाला बळी का पडतात? पुनर्विकास थांबविल्याने उच्च न्यायालयाचा सवाल
16
गृहप्रकल्पात गोदरेजची ११० कोटींची फसवणूक; अहमदाबादच्या सिद्धी ग्रुपविरुद्ध गुन्हा दाखल 
17
जयंत नारळीकर यांना मरणोत्तर विज्ञान रत्न पुरस्कार; मराठी शास्त्रज्ञांचाही राष्ट्रपतींकडून गौरव
18
बांगलादेशात हिंदूची हत्या; दिल्ली, कोलकाता पेटले   
19
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
20
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे लग्नसमारंभातील बडेजावपणाला ब्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2021 04:26 IST

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधूंनी लग्न उरकून घेतले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमध्ये लग्नसोहळ्यासाठी २५ वऱ्हाड्यांची ...

एप्रिलच्या पहिल्या आठवड्यापर्यंत काही वर-वधूंनी लग्न उरकून घेतले. मात्र, त्यानंतर राज्य सरकारने लागू केलेल्या संचारबंदीमध्ये लग्नसोहळ्यासाठी २५ वऱ्हाड्यांची उपस्थिती आणि २ तास वेळ असे निर्बंध घातल्यामुळे काही वर-वधूंनी आपले नियोजित लग्न पुढे ढकलले आहे. मात्र, बहुतांश वर-वधू आलिया भोगासी असावे सादर या उक्तीप्रमाणे आता आपले मन मोडून लग्न उरकून घेत आहेत. लग्नसोहळ्यात बहुतांश आई-वडिलांकडून बडेजावपणाचे दर्शन घडते. समाजातील आपली प्रतिष्ठा जपण्यासाठी वेळप्रसंगी कर्ज काढून लग्नसोहळ्यात पैशाची उधळपट्टी केली जाते. या खटाटोपात अनेक मध्यमवर्गीयांवर कर्जबाजारी होण्याची वेळ येते. मात्र, कोरोनामुळे या सर्व बडेजावपणाला ब्रेक लागला असून गरीब असो वा श्रीमंत सर्वांच्या मुला-मुलींचे लग्न अगदी साधेपणाने पार पडत आहे, ही आनंदाची गोष्ट आहे. अगदी कमी खर्चात लग्नसोहळा आटोपत असल्यामुळे अनेक गरीब व मध्यमवर्गीय आई-वडिलांनी मात्र सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. कोरोनामुळे किमान लग्नसोहळ्यातील गरीब-़श्रीमंतांमधील दरी तरी नाहीशी झाली असून कोरोनाने सध्या सर्वांना एकाच पंक्तीत आणून बसविले आहे.

बॉक्स

कमी खर्चातील बचतीची कोरोनाने दिली शिकवण

लग्नसोहळ्यातील खर्चाच्या बचतीसाठी राज्यात सर्वत्र सामूहिक विवाह सोहळ्याची चळवळ जोमाने राबविण्यात येत होती. मात्र, कोरोनाने या सर्वांना फाटा देऊन वैयक्तिक लग्नसोहळाही कमी खर्चात पार पाडता येतो, अशी शिकवण दिली आहे. अनेकांवर बेरोजगारीचे संकट आले. लग्नसमारंभावरील या निर्बंधांमुळे मंगल कार्यालय, बँडपथक, कॅटरर्स, डेकोरेशन, सुगम संगीत पथक आदी अनेक व्यवसायिकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे.