शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
2
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
3
भारत आणि चीनचं टेन्शन वाढवणार युरोपियन युनियन! अमेरिकेच्या समोर झुकलं का EU?
4
निष्पाप लेकरावर दयाही आली नाही! ७ वर्षांच्या मुलीला तिसऱ्या मजल्यावरून फेकलं, सावत्र आईचा गुन्हा 'असा' झाला उघड
5
6G क्षेत्रात भारताची मोठी झेप, IIT हैदराबादने विकसित केले प्रोटोटाइप; 2030 पर्यंत लॉन्च होणार
6
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
7
ITR भरण्यासाठी उरले शेवटचे काही तास! आयकर विभागाकडून करदात्यांसाठी ६ टिप्स
8
Pitru Paksha 2025: काही लोक जिवंतपणी स्वत:चे श्राद्ध करवून घेतात; पण का आणि कुठे? वाचा!
9
बाबांसाठी घड्याळ, आईला कानातले पण ते...; अधिकाऱ्याच्या लेकाची काळजात चर्र करणारी गोष्ट
10
'भारत तर टॅरिफचा महाराजा, त्यांच्यामुळे अमेरिकेच्या कामगारांचे...'; डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचा आरोप
11
भारतीय नवराच हवा! न्यूयॉर्कमधील प्रसिद्ध टाइम्स स्क्वेअरवर फलक घेऊन उभी राहिली तरुणी
12
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
13
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
14
टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुपरफास्ट ३००० धावा; विराट दुसऱ्या क्रमांकावर, पहिला कोण?
15
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
16
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
17
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
18
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
19
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
20
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव

वैनगंगा नदीचे झाले तलावात रुपांतर

By admin | Updated: May 20, 2016 00:45 IST

जीवनदायीनी बारमाही वाहणारी वैनगंगा नदीचे माडगी येथे एका लहान तलावात रुपांतर झाले आहे.

माडगी येथील प्रकार : जीवन प्राधिकरणाच्या पाच योजना बंदच, पाणीपुरवठा योजना ठप्प पडण्याची शक्यतातुमसर : जीवनदायीनी बारमाही वाहणारी वैनगंगा नदीचे माडगी येथे एका लहान तलावात रुपांतर झाले आहे. नदीची धार बंद झाली आहे. तुमसर शहर व परिसरातील पाणीपुरवठा योजना यामुळे ठप्प पडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बावनथडी धरणातून पाणी सोडल्यावरही ते पाणी वैनगंगेपर्यंत पोहचले नाही. केवळ नाकाडोंगरी तथा बपेरा पर्यंतच पाणी पोहोचले हे विशेष.तुमसर तालुक्यात बारमाही वाहणारी वैनगंगेचा प्रवास किमान १०० कि.मी. चा आहे. उन्हाचा प्रकोप व रेकॉर्ड उष्णतामानात वैनगंगा नदी कोरडी पडली. प्रचंड पाण्याचा उपसा तथा रेती उत्खनन यामुळे नदी पात्रात रेती ऐवजी माती दिसत आहे. वाहणी - मांडवी येथे बॅरेज तयार करण्यात आले. अदानी वीज समूह व धापेवाडा सिंचन प्रकल्पाचा हा संयुक्त उपक्रम आहे. पाणी अडविल्याने पुढे पाणी वाहने उन्हाळ्यात बंदच झाले. केवळ भंडारा शहर व परिसरातील नदीत पाणी उपलब्ध आहे. रेंगेपार ते रोहा - बेटाळा पर्यंत वैनगंगा नदी कोरडी पडली आहे.तुमसर तालुक्यातील माडगी येथे नदीचे पात्र विस्तीर्ण आहे. मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नृसिंह - विरसिंह मंदिर परिसरात मोठे डोह आहे. केवळ या डोहात पाणी शिल्लक आहे. येथे वैनगंगेचे तलावात रुपांतर झाल्याचे दिसून येते. मंदिराच्या सभोवताल पाणी आहे. पाण्याचा येवा (धार) बंद झाल्याने पाणी तिथेच थांबले आहे. वैनगंगेचा पुढील प्रवास येथे थांबला आहे. तुमसर शहर व परिसरातील पाणीपुरवठा योजनेच्या विहिरी येथे आहेत. पाण्याचा येवा बंद झाल्याने पुढे पाणीपुरवठा नियमीत होण्याची शक्यता फारच कमी आहे. पाणीपुरवठा योजना नियमित कशा सुरु राहतील याकरिता प्रशासनो येथे नियोजनाची गरज आहे. पाणी वाचवा हा मूलमंत्र केवळ कागदोपत्री नागरिकांना सांगण्यात बरा वाटतो. परंतु शासन व प्रशासनाने सर्वसामान्य नागरिकांना पाणी मुबलक कसे मिळेल याचे नियोजन करण्याची खरी गरज आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कशातरी नागरिकांना पाणीपुरवठा करीत आहेत. तुमसर तालुक् यात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या एकही पाणीपुरवठा योजना सुरु नाहीत. हस्तांतरणाच्या वादात या योजना मागील ६ ते ८ वर्षापासून रखडल्या आहेत. या योजनेवर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले. उपकरणे, साहित्य भंगारात जाण्याची वेळ आली. परंतु पाण्याचा एक थेंबही सर्वसामान्य नागरिकांना मिळाला नाही. केवळ येरली पाणीपुरवठा योजना दोन ते अडीच वर्ष लोकसहभागातून चालविण्यात आली. तीही आता बंद पडली आहे. आ.चरण वाघमारे व खा.नाना पटोले यांनी हा प्रश्न मुख्यमंत्र्यापुढे मांडण्याची गरज आहे. अजून किती वर्षापर्यंत या योजना हस्तांतरणाकरिता पांढरा हत्ती ठरणार आहे. (तालुका प्रतिनिधी)