शहरं
Join us  
Trending Stories
1
Rajnath Singh : "ऑपरेशन सिंदूर अजून संपलेलं नाही; हा फक्त ट्रेलर, योग्य वेळ आल्यावर पूर्ण चित्रपट दाखवू"
2
हापूस आंब्याचा सीझन संपला! कोकणचा राजा पुढचा आठवडाभरच मिळणार; एपीएमसीत काय स्थिती...
3
Maharashtra Politics : "मी लिहिलेल्या घटना सत्य, आणखी लिहिले असते तर हाहाकार माजला असता"; संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
कॉईनबेस एक्सचेंज झालं हॅक, Bitcoin मध्ये मागितली खंडणी; युजर्सचा डेटा लीक करण्याची धमकी
5
ऑपरेशन सिंदूर थांबताच काश्मीरमध्ये लागोपाठ २ ऑपरेशन; ४८ तासांत सहा दहशतवाद्यांचा खात्मा
6
जमिनीवरून हल्लाबोल, हवेतच केले उद्ध्वस्त; भारताने पाकिस्तानवर डागली होती 'इतकी' ब्रह्मोस क्षेपणास्त्रे!
7
'पाकिस्तानने दहशतवाद्यांचे ते अड्डे पुन्हा उभारण्यासाठी १४ कोटी दिले'; राजनाथ सिंहांचा दावा
8
आईच्या मृत्यूनंतर चांदीच्या बांगडीसाठी मुलाने अंत्यविधी रोखून धरला; स्मशानभूमीत गोंधळ घातला...
9
भारताच्या मदतीशिवाय तुर्कीमध्ये बिर्याणी शिजूच शकत नाही! 'हे' आहे मोठे कारण
10
‘एखाद्याला खासदार करायचं म्हंटल्यावर करतो अन् पाडायचं म्हंटलं तर पाडतोच’ अजित पवारांची टोलेबाजी
11
गेम कुठे फिरला? भारताने पाकिस्तानात डमी फायटर जेट घुसविली, अन् लष्कराला जे पाहिजे होते तेच झाले...
12
Adani समूहावर म्युच्युअल फंड्सचा भरवसा नाय का? ८ कंपन्यांतून काढले ११६० कोटी; 'ही' आहेत कारणं
13
Anushka Tiwari : अनुष्काचा खोटारडेपणा उघड; MBBSची डिग्री नाही, डर्मेटोलॉजिस्ट असल्याचं सांगून करायची सर्जरी
14
AC लोकलमधून रेल्वेच्या फुकट्या कर्मचाऱ्याचा प्रवास; जाब विचारता टीसीची मग्रुरी, VIDEO व्हायरल
15
ग्रावापेक्षा शहरातच जास्त बेरोजगार! नोकरीसाठी करतायत भटकंती; पहिल्यांदाच मासिक आकडा जारी
16
"छोट्या गाडीतून आले म्हणून मला फिल्मफेअर सोहळ्यात अडवलं"; प्रसिद्ध अभिनेत्रीने केली बॉलिवूडची पोलखोल
17
ना दीपिका, ना कतरिना अन् नाही आलिया, सर्वात आधी या प्रसिद्ध क्रिकेटरच्या पत्नीच्या प्रेमात होता रणबीर
18
जुळ्या बहिणींचे जुळे गुण! दहावीमध्ये मिळवले सेम टू सेम ९६ टक्के, अनुष्का-तनुष्काचे दैदिप्यमान यश
19
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीचा उपास सोडताना 'या' चुका टाळा नाहीतर उपासना जाईल वाया!
20
सतत धमकी देणाऱ्या पाकिस्तानची अण्वस्त्रे जप्त होऊ शकतात? राजनाथ सिंह यांच्या 'त्या' विधानाने उपस्थित केला प्रश्न

राज्यमार्गावरील नालीचे बांधकाम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST

विशाल रणदिवे अड्याळ : कारधा ते निलज फाटापर्यंत या राज्य महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अड्याळ गावातून गेलेल्या या ...

विशाल रणदिवे

अड्याळ : कारधा ते निलज फाटापर्यंत या राज्य महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अड्याळ गावातून गेलेल्या या रस्त्याच्या विस्तारीकरणाचेही घोडे विविध कारणांनी रखडले आहेत. आता तर नालीच्या बांधकामावरून नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न झाला आहे. नालीचे अर्धवट व अपूर्ण बांधकाम आता नागरिकांच्या जीवावर बेतणार काय, असा सवालही उपस्थित होत आहे.

पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अड्याळ या गावाचा नावलौकिक आहे. येथे कित्येक महिन्यांपासून राज्य महामार्गाचे बांधकाम संथगतीने सुरु आहे. कधी हे बांधकाम पूर्ण होते असे आता अडयाळवासीयांना वाटू लागले आहे. तिथे दिवसभर धूळ व खड्ड्यातून प्रवास करावा अशी स्थिती आहे. नालीच्या बांधकामावरून ग्रामस्थ चांगलेच तापले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांची लांबी जर वाढविण्यात आली नाही तर कदाचित पुढील काळात ग्रामवासीयांना मोठा त्रास तसेच आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात सरपंच जयश्री कुंभलकर यांनीही राष्ट्रीय महामार्ग विभाग भंडारा यांच्याशी संबंधित विषयावर चर्चाही केली. मात्र यासंबंधी कुठला निर्णय होतो याकडे ही सरपंचांसह ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. अड्याळ येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांचे बांधकाम पूर्णपणे अजूनही झालेले नाही. पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण झाली नाहीत. तर गावात पाणी साचून आरोग्याचे प्रश्न निर्माण होईल, यात शंका नाही. पाण्याचा निचरा होणार नसल्याने समस्या वाढतील किंबहुना त्या आरोग्यासाठी मारक ठरतील, अशी बाबही चर्चेवेळी व्यक्त करण्यात आली.

या संदर्भात संबंधित ग्रामपंचायत प्रशासन कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालय अंतर्गत चर्चा करीत लेखी मागणी की देण्यात आली. ही सर्व कामे पावसाळापूर्वी पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. तसेच नाल्यांचे बांधकाम होत असल्याने वाहतूकीला मोठी अडचण निर्माण झाली आहे.

बॉक्स

अंतर्गत नाल्यांची समस्याही ऐरणीवर

राज्य महामार्गाच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम होत असताना गावातून येणाऱ्या अंतर्गत नाल्या या राज्यमार्गावरील नाल्यांना मिळणार आहेत. मात्र उंचीच्या फरकामुळे तांत्रिक अडचणी उपस्थित होत आहेत. लहान नाल्या कुठे जुळतील किंवा नाहीत ही एक मोठी समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावरही वारंवार सांगून सुद्धा वेळेच्या आधीच याकडे दुर्लक्ष केले तर ही मोठी समस्या उग्र रूप धारण करू शकते. नाल्यांच्या बाजूला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सुद्धा घालण्यात येणार आहे. आता त्या कामालाही ब्रेक लागला आहे. परिणामी ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी चर्चा आता गावात ऐकावयास मिळत आहे. याकडे गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.