शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
3
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
4
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
5
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
6
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
7
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
8
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
9
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
10
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
11
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
12
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
13
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
14
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
15
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
16
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
17
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
18
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
19
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
20
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यमार्गावरील नालीचे बांधकाम अपूर्णच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:35 IST

विशाल रणदिवे अड्याळ : कारधा ते निलज फाटापर्यंत या राज्य महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अड्याळ गावातून गेलेल्या या ...

विशाल रणदिवे

अड्याळ : कारधा ते निलज फाटापर्यंत या राज्य महामार्गाचे विस्तारीकरणाचे काम सुरू आहे. अड्याळ गावातून गेलेल्या या रस्त्याच्या विस्तारीकरणाचेही घोडे विविध कारणांनी रखडले आहेत. आता तर नालीच्या बांधकामावरून नागरिकांच्या आरोग्यास धोका उत्पन्न झाला आहे. नालीचे अर्धवट व अपूर्ण बांधकाम आता नागरिकांच्या जीवावर बेतणार काय, असा सवालही उपस्थित होत आहे.

पवनी तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून अड्याळ या गावाचा नावलौकिक आहे. येथे कित्येक महिन्यांपासून राज्य महामार्गाचे बांधकाम संथगतीने सुरु आहे. कधी हे बांधकाम पूर्ण होते असे आता अडयाळवासीयांना वाटू लागले आहे. तिथे दिवसभर धूळ व खड्ड्यातून प्रवास करावा अशी स्थिती आहे. नालीच्या बांधकामावरून ग्रामस्थ चांगलेच तापले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला नाल्यांची लांबी जर वाढविण्यात आली नाही तर कदाचित पुढील काळात ग्रामवासीयांना मोठा त्रास तसेच आरोग्याचा प्रश्नही निर्माण होऊ शकतो. यासंदर्भात सरपंच जयश्री कुंभलकर यांनीही राष्ट्रीय महामार्ग विभाग भंडारा यांच्याशी संबंधित विषयावर चर्चाही केली. मात्र यासंबंधी कुठला निर्णय होतो याकडे ही सरपंचांसह ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. अड्याळ येथील राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेल्या नाल्यांचे बांधकाम पूर्णपणे अजूनही झालेले नाही. पावसाळ्यापर्यंत ही कामे पूर्ण झाली नाहीत. तर गावात पाणी साचून आरोग्याचे प्रश्न निर्माण होईल, यात शंका नाही. पाण्याचा निचरा होणार नसल्याने समस्या वाढतील किंबहुना त्या आरोग्यासाठी मारक ठरतील, अशी बाबही चर्चेवेळी व्यक्त करण्यात आली.

या संदर्भात संबंधित ग्रामपंचायत प्रशासन कंत्राटदार व राष्ट्रीय महामार्ग उपविभाग कार्यालय अंतर्गत चर्चा करीत लेखी मागणी की देण्यात आली. ही सर्व कामे पावसाळापूर्वी पूर्ण होणे महत्त्वाचे आहे. तसेच नाल्यांचे बांधकाम होत असल्याने वाहतूकीला मोठी अडचण निर्माण झाली आहे.

बॉक्स

अंतर्गत नाल्यांची समस्याही ऐरणीवर

राज्य महामार्गाच्या दुतर्फा नाल्यांचे बांधकाम होत असताना गावातून येणाऱ्या अंतर्गत नाल्या या राज्यमार्गावरील नाल्यांना मिळणार आहेत. मात्र उंचीच्या फरकामुळे तांत्रिक अडचणी उपस्थित होत आहेत. लहान नाल्या कुठे जुळतील किंवा नाहीत ही एक मोठी समस्या निर्माण होण्याची दाट शक्यता ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. यावरही वारंवार सांगून सुद्धा वेळेच्या आधीच याकडे दुर्लक्ष केले तर ही मोठी समस्या उग्र रूप धारण करू शकते. नाल्यांच्या बाजूला पाणीपुरवठा करणारी जलवाहिनी सुद्धा घालण्यात येणार आहे. आता त्या कामालाही ब्रेक लागला आहे. परिणामी ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी चर्चा आता गावात ऐकावयास मिळत आहे. याकडे गांभीर्याने विचार करून निर्णय घेण्याची गरज निर्माण झाली आहे.