शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीचा श्रीगणेशा! उद्धव ठाकरे सहकुटुंब राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपतीचं घेतले दर्शन
2
भारतावर 50% टॅरिफ लावून ट्रम्प यांनी स्वतःच्याच पायावर कुऱ्हाड मारली, आता लागणार अमेरिकेची 'लंका'! आला असा अहवाल
3
पंजाबमध्ये पुरामुळे कहर, नवोदय विद्यालयात ४०० मुले आणि शाळेतील कर्मचारी अडकले; पालक प्रशासनावर संतापले
4
अर्चनानंतर आता श्रद्धा तिवारी गायब...; कुटुंबानं मुलीचा उलटा फोटो दरवाजाच्या चौकटीला लावला
5
खळबळजनक! कॉन्स्टेबलने कुटुंबीयांच्या मदतीने पत्नीला जिवंत जाळलं, प्रकृती गंभीर
6
ChatGPT ने मुलाला आयुष्य संपवण्याचे ट्यूशन दिले, पालकांनी न्यायालयात सगळीच माहिती सांगितली
7
मुंबईच्या दिशेने मराठा मोर्चा: "शांततेचं आंदोलन कुणीच रोखू शकत नाही," मनोज जरांगेंचा निर्धार
8
"लोक ओरडत होते, मी दगड पडताना पाहिले, मला..."; वैष्णोदेवी मार्गावर नेमकं काय घडलं?
9
३६ दिवस डिजिटल अरेस्ट; सायबर ठगांनी निवृत्त एअरफोर्स अधिकाऱ्याकडून ३.२२ कोटी लुटले...
10
बाप्पाला आणताना, नेताना, पूजा करताना मूर्तीचा भाग 'दुभंगला' तर अशुभ? धर्मशास्त्र सांगते... 
11
गणेशोत्सवानिमित्त सांस्कृतिक कार्य विभागाच्या वतीने रील स्पर्धेचे आयोजन, प्रथम क्रमांकाला एक लाखांचे बक्षीस
12
बिहारमध्ये मंत्री श्रवण कुमार यांच्यावर जीवघेणा हल्ला; अनेक किलोमीटर पाठलाग, बॉडीगार्ड जखमी
13
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
14
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
15
Ganesh Chaturthi 2025: फक्त गणेश चतुर्थीला बाप्पाला दुर्वा नाही तर तुळस वाहतात; असे का? ते जाणून घ्या
16
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
17
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' क्षेत्रांना कमी तर 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
18
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
19
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
20
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!

वितरिकेचे बांधकाम रखडले

By admin | Updated: March 24, 2015 00:14 IST

आंतराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाच्या वितरिकेचे बांधकाम रखडल्याने तुमसर - सिवनी रस्त्याशेजारी नाल्याजवळ पाण्याचा हौद तयार झाला आहे.

तुमसर : आंतराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाच्या वितरिकेचे बांधकाम रखडल्याने तुमसर - सिवनी रस्त्याशेजारी नाल्याजवळ पाण्याचा हौद तयार झाला आहे. नाल्यापलीकडील शेतकऱ्यांना जीव धोक्यात घालून शेतीवर जावे लागते. अनेक शेतकरी शेतावर जाऊ शकत नाही. संबंधित विभागाचे येथे दुर्लक्ष दिसत आहे.बावनथडी आंतराज्यीय प्रकल्प पूर्णत्वास येवून एक वर्ष पूर्ण झाले. तुमसर, खापा, बाम्हणी, सिवनी, माडगी, चारगाव, ढोरवाडा, सुकळी, कोष्टी, बोरीसह परिसरातील अनेक गावात वितरिकेचे बांधकाम अर्धवट आहे. शेत तथा गावाला जाणाऱ्या रस्त्यावर लहान मोठे पुल संबंधित विभागाने तयार केले. पुलाखाली पाणी साचले राहते. पलीकडे शेतावर जाण्यास रस्ता नाही. कच्चे रस्ते संबंधित विभागाने उध्वस्त केले.तुमसर शहराबाहेरील शहर मोहल्ला परिसरातून सिवनी कडे रस्त्यावर बावनथडी प्रकल्प विभागाने एक सिमेंटचा पुल तयार केला. पुलाजवळ पूर्वीच मुरुमाची अवैध उत्खनन केले होते. उत्खननामुळे पुलाजवळ विहिरीसारखे मोठे खड्डे पडले होते. या खड्यात पाणी भरले आहे. खड्यापलीकडे अनेक शेतकऱ्यांच्या शेती आहे. या शेतावर शेतकऱ्यांना जाताच येत नाही. पूर्वी वितरिकेजवळ कच्चा पांधन रस्ता होता. या संदर्भात शेतकऱ्यांनी संबंधित प्रकल्प विभागाला तक्रारी केल् या. परंतु त्यांच्या तक्रारींना केराची टोपली दाखविली आहे. नियोजनाच्या अभावी येथे अनेक वितरिकेची कामे रखडली आहेत. परिसरातील गावात शेतकऱ्यांत असंतोषाचे वातावरण आहे. (तालुका प्रतिनिधी)मोबदला केव्हा मिळणार?तुमसर, देव्हाडी तथा परिसरातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील गावातील शेतकऱ्यांच्या शेतातून लहान मोठ्या वितरिका तयार करण्यात आल्या. त्या शेतकऱ्यांना अजूनपर्यंत शासनाने मोबदला दिला नाही. चारगाव, शिवारातील काही शेतकऱ्यांना मोबदला देणे सध्या सुरु आहे. येथे काही शेतकऱ्यांना जास्त तर काही शेतकऱ्यांना अल्प मोबदला शासनातर्फे देण्यात येत आहे. या परिसरातील वितिरका नियमानुसार तयार करण्यात आल्या नाहीत. येथेही अर्धवट कामे वितरिकेची झाली आहेत. वितरिकेचे बांधकाम कासवगतीने सुरु असल्याने पुढील चार ते पाच वर्षे पुन्हा शेतात पाणी सिंचनाकरिता मिळणार नाही असे चित्र आहे. शासनाने येथे वितरिकेच्या बांधकामास एकमुश्त निधी देण्याची गरज आहे. लोकप्रतिनिधींना तसा शासनाकडे पाठपुरावा करण्याची गरज आहे.