शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
2
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
3
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
4
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
5
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
6
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
7
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
8
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
9
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
10
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
11
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
12
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
13
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
14
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
15
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
16
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
17
तेजस्वींच्या राजदला भाजपपेक्षा २ टक्के मते जास्त पण...; महाआघाडीच्या पराभवाचे प्रमुख कारण काय...
18
मुंबईच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दिवसभर बैठकांचा सपाटा सुरू
19
"४ लाख पगार तरी तो खूश नव्हता..."; सहारनपूरमधून डॉक्टर आदिलबद्दल आणखी एक मोठा खुलासा!
20
बिहारचे सिंघम शिवदीप लांडे यांना निवडणुकीत किती मत मिळाली? जेडीयूच्या उमेदवाराने घेतली निर्णायक आघाडी
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळी धान खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:32 IST

चुल्हाड ( सिहोरा ) : उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी शासनाने ऑनलाईन सात-बारा नोंद करण्यासाठी मुदतवाढ दिली असली, तरी धानाच्या ...

चुल्हाड ( सिहोरा ) : उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी शासनाने ऑनलाईन सात-बारा नोंद करण्यासाठी मुदतवाढ दिली असली, तरी धानाच्या खरेदी प्रक्रियेवरून शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. धान खरेदी शासनावर बंधनकारक नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आल्याने गेल्या वर्षातील खरीप हंगामातील लॉलीपॉपचे चित्र शेतकऱ्यांचे डोळ्यासमोर आले आहे. यामुळे शेतकरी थेट दलालांच्या दारात पोहोचले आहेत. शासनाच्या या पत्राने शेतकऱ्यांचे डोके चक्रावले आहे.

राज्य शासनाने उन्हाळी धानाची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी ऑनलाईन सात-बारा नोंदणीला एप्रिल महिन्यात मंजुरी दिली आहे. १ एप्रिल ते ३० एप्रिल असा हा कालावधी होता. या कालावधीत हुशार शेतकरी व राजकीय पुढाऱ्यांनी मजल मारली. ऑनलाईन सात-बारा नोंदणीचा कालावधी प्रसिद्ध करण्यात आला नाही. यामुळे शेतकरी अनभिज्ञ होते. कोरोना पादुर्भावाचे कारण पुढे करण्यात आले. घराबाहेर पडू नका, असे सांगण्यात आले. सामान्य व अशिक्षित शेतकऱ्यांना नियमाचे डोस देण्यात आले. तब्बल एप्रिल महिन्यात कर्मचारी ते सामान्य नागरिक घरात दडून बसले. यामुळे सात-बारा दस्तऐवज शेतकऱ्यांना मिळाले नाही. नंतर उन्हाळी धान कापणीचा हंगाम सुरू झाला असता, शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्र सुरू करण्याची ओरड सुरू केली. विरोधकांनी आंदोलनाची भूमिका घेतली.

राज्य शासनाने ३१ मेपर्यंत ऑनलाईन सातबारा नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. १९ मे ला या आशयाचे पत्र निघाले आहे. तलाठी कार्यलयात कोरोना पादुर्भाव रोखण्याचे सारेच रेकॉर्ड गर्दीने मोडले आहेत. सिहोरा परिसरात ४-५ दिवस सात-बारा मिळत नाहीत. शासनाच्या पत्रात सात-बारा ऑनलाइ;न नोंदणीनंतर धान खरेदीची प्रक्रिया बंधनकारक राहणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे गेल्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे डोके चक्रावून सोडणारे प्रकार ताजे झाले आहेत.

बाॅक्स

ऑनलाईन नोंदणीची मुदत जूनपर्यंत द्या

सिलेगाव केंद्रावर ऑनलाईन सात-बारा नोदणी झालेल्या शेतकऱ्यांचे धान मार्चअखेर संपल्याने खरेदी करण्यात आले नाही. पत्रातील ओळीने उन्हाळी धान खरेदीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. एकट्या चुल्हाड परिसरात ४ ते ६ हजार हेक्टर आर शेतीत उन्हाळी धान पीक आहे. शेतकऱ्यांना सात-बारा ऑनलाई करण्यासाठी १२ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सात-बारा मिळत नाही. अवकाळी पावसाच्या भीतीने त्यांचे कुटुंब शेतात धान कापणी करीत आहे. पत्रातील आदेशाने शेतकऱ्यांचे डोके चक्रावले असून, जून अखेरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी किशोर राहगडाले, योगराज टेभरे यांनी केली आहे.