शहरं
Join us  
Trending Stories
1
काय सांगता..! २,६५२ लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी, शासन करणार वसुली
2
आजचे राशीभविष्य: शुक्रवार 30 मे 2025; शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, नोकरी-व्यवसायात उत्साहित होऊन कामे कराल
3
पाक करणार होता हल्ला; पण भारताच्या ब्रह्मोसमुळे फसला, पंतप्रधान शाहबाज शरीफ यांची कबुली
4
महापालिकेच्या निवडणुका सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये, महायुती म्हणून एकत्र लढणार : चंद्रशेखर बावनकुळे
5
पाकिस्तानी हेराचा हनी ट्रॅप; अभियंत्याला ठाण्यात अटक, डॉकयार्डमध्ये होता अभियंता
6
थकला-भागला 'विक्रम'; हमीभाव ठरविण्याची एकूण प्रक्रियाच संशयाच्या भोवऱ्यात
7
जोर ओसरतोय, पेरणीची घाई नको, ५ ते ६ दिवस पावसाची तीव्रता कमी असेल
8
IPL 2025 : रजतच्या नेतृत्वाखाली RCB संघाला 'सुवर्ण' संधी! पंजाबला शह देत थेट फायनलमध्ये एन्ट्री
9
ईडीच्या उपसंचालकांना लाच घेतल्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतले; नेमकं प्रकरण काय?
10
युद्धविराममध्ये कधीही व्यापाराचा उल्लेख नव्हता; भारताने ट्रम्प यांच्या टॅरिफ दाव्यांना पुन्हा एकदा नाकारले
11
वैष्णवी तर गेलीच आहे, आता वाईट बोलू नका; वडिल अनिल कस्पटेंच्या भावनांचा बांध फुटला
12
Vinayak Chaturthi 2025: सद्गुरू वामनराव पै सिद्धीविनायकाकडे काय मागावं हे सांगताहेत!
13
RCB vs PBKS : कोहलीचं सेलिब्रेशन बघून अनुष्का शर्माला आलं हसू; तो व्हिडिओ होतोय व्हायरल
14
धारावीत निम्मी जागा सार्वजनिक वापरासाठी; उर्वरित जागेत पुनर्वसन, नूतनीकरणाचे होणार काम
15
'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली महिलेची १ कोटी ८१ लाखांची फसवणूक; गुन्हे शाखेच्या कारवाईत टोळीचा पर्दाफाश
16
Covid-19 च्या डेल्टा व्हेरिएंटमुळे सायलेंट हॉर्ट अटॅक वाढले, आयआयटी इंदूरच्या अहवालात खुलासा
17
Ola Electric Q4 results: 'ओला'चे डोळे ओले! तोटा वाढून ₹८६० कोटींवर, महसुलातही ५९% ची घसरण
18
पाकिस्तानात गेलेल्या महिलेने हेरगिरी केल्याचा संशय, नागपुरात गुन्हा दाखल
19
राज्यसभेच्या ८ जागांसाठी १९ जूनला मतदान; मतांचे गणित जुळवणं सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान

उन्हाळी धान खरेदी केंद्रावरून शेतकऱ्यांत संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:32 IST

चुल्हाड ( सिहोरा ) : उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी शासनाने ऑनलाईन सात-बारा नोंद करण्यासाठी मुदतवाढ दिली असली, तरी धानाच्या ...

चुल्हाड ( सिहोरा ) : उन्हाळी धान खरेदी करण्यासाठी शासनाने ऑनलाईन सात-बारा नोंद करण्यासाठी मुदतवाढ दिली असली, तरी धानाच्या खरेदी प्रक्रियेवरून शेतकऱ्यांत संभ्रम निर्माण झाला आहे. धान खरेदी शासनावर बंधनकारक नसल्याचे पत्रात नमूद करण्यात आल्याने गेल्या वर्षातील खरीप हंगामातील लॉलीपॉपचे चित्र शेतकऱ्यांचे डोळ्यासमोर आले आहे. यामुळे शेतकरी थेट दलालांच्या दारात पोहोचले आहेत. शासनाच्या या पत्राने शेतकऱ्यांचे डोके चक्रावले आहे.

राज्य शासनाने उन्हाळी धानाची खरेदी प्रक्रिया सुरू करण्यासाठी ऑनलाईन सात-बारा नोंदणीला एप्रिल महिन्यात मंजुरी दिली आहे. १ एप्रिल ते ३० एप्रिल असा हा कालावधी होता. या कालावधीत हुशार शेतकरी व राजकीय पुढाऱ्यांनी मजल मारली. ऑनलाईन सात-बारा नोंदणीचा कालावधी प्रसिद्ध करण्यात आला नाही. यामुळे शेतकरी अनभिज्ञ होते. कोरोना पादुर्भावाचे कारण पुढे करण्यात आले. घराबाहेर पडू नका, असे सांगण्यात आले. सामान्य व अशिक्षित शेतकऱ्यांना नियमाचे डोस देण्यात आले. तब्बल एप्रिल महिन्यात कर्मचारी ते सामान्य नागरिक घरात दडून बसले. यामुळे सात-बारा दस्तऐवज शेतकऱ्यांना मिळाले नाही. नंतर उन्हाळी धान कापणीचा हंगाम सुरू झाला असता, शेतकऱ्यांनी आधारभूत केंद्र सुरू करण्याची ओरड सुरू केली. विरोधकांनी आंदोलनाची भूमिका घेतली.

राज्य शासनाने ३१ मेपर्यंत ऑनलाईन सातबारा नोंदणीला मुदतवाढ दिली आहे. १९ मे ला या आशयाचे पत्र निघाले आहे. तलाठी कार्यलयात कोरोना पादुर्भाव रोखण्याचे सारेच रेकॉर्ड गर्दीने मोडले आहेत. सिहोरा परिसरात ४-५ दिवस सात-बारा मिळत नाहीत. शासनाच्या पत्रात सात-बारा ऑनलाइ;न नोंदणीनंतर धान खरेदीची प्रक्रिया बंधनकारक राहणार नसल्याचे नमूद करण्यात आले आहे. यामुळे गेल्या खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे डोके चक्रावून सोडणारे प्रकार ताजे झाले आहेत.

बाॅक्स

ऑनलाईन नोंदणीची मुदत जूनपर्यंत द्या

सिलेगाव केंद्रावर ऑनलाईन सात-बारा नोदणी झालेल्या शेतकऱ्यांचे धान मार्चअखेर संपल्याने खरेदी करण्यात आले नाही. पत्रातील ओळीने उन्हाळी धान खरेदीवरून संभ्रम निर्माण झाला आहे. एकट्या चुल्हाड परिसरात ४ ते ६ हजार हेक्टर आर शेतीत उन्हाळी धान पीक आहे. शेतकऱ्यांना सात-बारा ऑनलाई करण्यासाठी १२ दिवसांची मुदतवाढ देण्यात आली आहे. शेतकऱ्यांना सात-बारा मिळत नाही. अवकाळी पावसाच्या भीतीने त्यांचे कुटुंब शेतात धान कापणी करीत आहे. पत्रातील आदेशाने शेतकऱ्यांचे डोके चक्रावले असून, जून अखेरपर्यंत मुदतवाढ द्यावी, अशी मागणी किशोर राहगडाले, योगराज टेभरे यांनी केली आहे.