शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

काही प्रभागांत अविरोध, तर काहींमध्ये रिक्त जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:54 IST

आमगाव (दिघोरी) : १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक गावांमध्ये काही वॉर्डांमध्ये अविरोध उमेदवार उभे आहेत; तर काही ...

आमगाव (दिघोरी) : १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक गावांमध्ये काही वॉर्डांमध्ये अविरोध उमेदवार उभे आहेत; तर काही वॉर्डांमध्ये एकही उमेदवार उभे न झाल्याने त्या जागा रिक्त ठेवण्याची नामुष्की अनेकांवर आली आहे. या वेळेस सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्याचे धोरण अवलंबिल्याने गावागावांत निवडणूक लढविण्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती ते चूपचाप राहिले किंवा पाहिजे त्या प्रमाणात त्यांनी यात निवडणुकीमध्ये रस घेतला नाही.

ज्यांना कुणाला सदस्यपद निवडून यायचे आहे त्यांनी स्वतः निवडणुकीला उभे राहून येणाऱ्या खर्चाचीसुद्धा जबाबदारी स्वीकारावयाची असल्याने अनेक लोकांनी निवडणूक लढविण्यासाठी अनुत्सुकता दाखविली. त्यामुळे वाॅर्डात उमेदवार उभे करण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली. येणारा उमेदवार हा आपल्याच बाजूने राहील की नाही, याचीही शाश्वती नसल्याने अनेकांनी या निवडणुकीमध्ये रस घेण्याचे सोडून दिले असून, गावकऱ्यांसाठी एक मात्र चांगले झाले की, सामान्यांतील सामान्य माणूससुद्धा ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकतो किंवा भविष्यात सरपंचपदी विराजमानही होऊ शकतो. याआधी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गटागटांत राजकारण विभागले जात होते. तसेच गटातील सरपंच कसा निवडून येईल, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात होते.

तसेच निवडणुकीसाठी वारेमाप पैसा खर्च केला जात होता. आता मात्र सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न केल्यामुळे याबाबत आळा बसताना दिसत असून उमेदवार मी स्वतः कसा निवडून येईल, यासाठीच प्रयत्न करताना दिसून येत आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्याच्यात जसे दिवस जातील तसतसे निवडणुकीला जोर चढणार आहे. वाॅर्डात अनेकांनी सर्वच प्रवर्गांतील उमेदवार उभे केले असून, ते मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले तर काही जागा अनेकांना रिक्त सोडाव्या लागल्या; कारण त्या जागेसाठी उमेदवार मिळू शकले नाहीत.

अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे ठराविकांकडे गावातील राजकारणाची धुरा सांभाळत येत होती किंवा गावातील राजकारणामध्ये काही ठरावीक लोकच मोठ्या प्रमाणात रस घेत असताना दिसून येत होते; त्यामुळे त्या गावातील राजकारण एकाकडे एकवटले जात होते. आपल्या मर्जीतील माणसे निवडणुकीला उभी करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत होते व सरपंचपदीसुद्धा आपण स्वतः किंवा आपल्या मर्जीतील माणसाला बसविले जात होते. आता मात्र सरपंचपद कुणासाठी आरक्षित राहणार हे जाहीर न झाल्यामुळे अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले गेले. यदाकदाचित सरपंचपद स्त्रीसाठी राखीव झाले तर आपली पंचाईत होऊ नये म्हणून अनेकांनी आपण स्वतः निवडणुकीला उभे न राहता आपल्या पत्नीला सदस्यपदासाठी उभे केल्याचे या निवडणुकीतून दिसून येत आहे. ही निवडणूक अनेक बाबतींत निर्णायक ठरणार असून, वारेमाप खर्चाला आळा बसणार आहे, एवढे मात्र निश्चित.