शहरं
Join us  
Trending Stories
1
छावा संघटनेच्या कार्यकर्त्याला मारहाण प्रकरणी सूरज चव्हाण यांनी मागितली माफी, म्हणाले...
2
IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग
3
हनी ट्रॅप प्रकरणात भाजपा नेत्याच्या निकटवर्तीयाला मुंबईत अटक; अनेक मोठी नावे उघड होणार
4
तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय...
5
ना साईड बिझनेस, ना शेअर बाजाराच्या टीप्स; ४५ व्या वर्षी ₹४.७ कोटींसोबत होऊ शकता रिटायर, काय आहे ‘सिक्रेट प्लान’
6
Laxman Hake : "फडणवीसांनी अजितदादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालावा, नाहीतर तुमचं..."; लक्ष्मण हाके संतापले
7
मंगला एक्स्प्रेसमध्ये पकडले ३६ कोटींचे ड्रग्ज; मेथाफेटामाईनसह कोकेनही आढळले!
8
पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
9
"...अन् मी संजीव कुमार यांना ऑटोग्राफ दिला", सचिन पिळगावकरांनी सांगितला तो किस्सा
10
नियमित शस्त्रक्रिया बंद; परिचारिका संपाचा फटका, प्रकृती स्थिर असणाऱ्यांना दिले डिस्चार्ज
11
चातुर्मासातील सलग दुसरा भौम प्रदोष: ‘या’ मंत्रांचा अवश्य जप करा; व्रतातील शिवपूजन कसे कराल?
12
Suraj Chavan :'सुरज चव्हाणांना अटक करा, गुंडगिरी खपवून घेणार नाही'; अंजली दमानियांचा हल्लाबोल
13
परस्पर समझोता करून तक्रार मागे, पोलीस हतबल; राज्यातील हनी ट्रॅप प्रकरणात आतापर्यंत काय घडलं?
14
"चपलेचा मार द्यायची गरज होती.."; इस्कॉनमध्ये मांसाहार करणाऱ्या व्यक्तीवर बादशाहचा संताप, नेमकं काय घडलं?
15
रोहित पवारांवर आझादनगर पोलिसांत गुन्हा; पाेलिस ठाण्यात केलेल्या दमदाटीचा व्हिडीओ व्हायरल
16
श्रावणाची सुरुवात गजलक्ष्मी योगात: ७ मूलांकांचे कल्याण, भरघोस लाभ; सुबत्ता-समृद्धी, शुभ काळ!
17
ऑपरेशन सिंदूर, ट्रम्प टॅरिफ मुद्द्यांवर विरोधक आक्रमक, आजपासून संसद अधिवेशन; सर्व मुद्द्यांवर चर्चेस सरकार तयार
18
मंत्रालयातील कर्मचाऱ्यांना घातला अडीच कोटींचा गंडा; निवृत्त उपसचिवावर पोलिसांत गुन्हा दाखल
19
आजचे राशीभविष्य, २१ जुलै २०२५: नोकरी - व्यवसायात लाभदायी अन् यशदायी दिवस
20
सिद्धार्थ-कियाराच्या लेकीचं घरी जंगी स्वागत, सोशल मीडियावर दिसली झलक

काही प्रभागांत अविरोध, तर काहींमध्ये रिक्त जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:54 IST

आमगाव (दिघोरी) : १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक गावांमध्ये काही वॉर्डांमध्ये अविरोध उमेदवार उभे आहेत; तर काही ...

आमगाव (दिघोरी) : १५ जानेवारीला होऊ घातलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये अनेक गावांमध्ये काही वॉर्डांमध्ये अविरोध उमेदवार उभे आहेत; तर काही वॉर्डांमध्ये एकही उमेदवार उभे न झाल्याने त्या जागा रिक्त ठेवण्याची नामुष्की अनेकांवर आली आहे. या वेळेस सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर जाहीर करण्याचे धोरण अवलंबिल्याने गावागावांत निवडणूक लढविण्याची धुरा ज्यांनी आपल्या खांद्यावर घेतली होती ते चूपचाप राहिले किंवा पाहिजे त्या प्रमाणात त्यांनी यात निवडणुकीमध्ये रस घेतला नाही.

ज्यांना कुणाला सदस्यपद निवडून यायचे आहे त्यांनी स्वतः निवडणुकीला उभे राहून येणाऱ्या खर्चाचीसुद्धा जबाबदारी स्वीकारावयाची असल्याने अनेक लोकांनी निवडणूक लढविण्यासाठी अनुत्सुकता दाखविली. त्यामुळे वाॅर्डात उमेदवार उभे करण्यासाठी अनेकांना तारेवरची कसरत करावी लागली. येणारा उमेदवार हा आपल्याच बाजूने राहील की नाही, याचीही शाश्वती नसल्याने अनेकांनी या निवडणुकीमध्ये रस घेण्याचे सोडून दिले असून, गावकऱ्यांसाठी एक मात्र चांगले झाले की, सामान्यांतील सामान्य माणूससुद्धा ग्रामपंचायतीचा सदस्य म्हणून निवडून येऊ शकतो किंवा भविष्यात सरपंचपदी विराजमानही होऊ शकतो. याआधी ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात गटागटांत राजकारण विभागले जात होते. तसेच गटातील सरपंच कसा निवडून येईल, यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले जात होते.

तसेच निवडणुकीसाठी वारेमाप पैसा खर्च केला जात होता. आता मात्र सरपंचपदाचे आरक्षण जाहीर न केल्यामुळे याबाबत आळा बसताना दिसत असून उमेदवार मी स्वतः कसा निवडून येईल, यासाठीच प्रयत्न करताना दिसून येत आहे. परिसरातील अनेक गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून प्रचाराला सुरुवात झाली आहे. त्याच्यात जसे दिवस जातील तसतसे निवडणुकीला जोर चढणार आहे. वाॅर्डात अनेकांनी सर्वच प्रवर्गांतील उमेदवार उभे केले असून, ते मिळविण्यासाठी मोठे प्रयत्न करावे लागले तर काही जागा अनेकांना रिक्त सोडाव्या लागल्या; कारण त्या जागेसाठी उमेदवार मिळू शकले नाहीत.

अनेक गावांमध्ये वर्षानुवर्षे ठराविकांकडे गावातील राजकारणाची धुरा सांभाळत येत होती किंवा गावातील राजकारणामध्ये काही ठरावीक लोकच मोठ्या प्रमाणात रस घेत असताना दिसून येत होते; त्यामुळे त्या गावातील राजकारण एकाकडे एकवटले जात होते. आपल्या मर्जीतील माणसे निवडणुकीला उभी करून त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेत होते व सरपंचपदीसुद्धा आपण स्वतः किंवा आपल्या मर्जीतील माणसाला बसविले जात होते. आता मात्र सरपंचपद कुणासाठी आरक्षित राहणार हे जाहीर न झाल्यामुळे अनेकांच्या मनसुब्यांवर पाणी फिरले गेले. यदाकदाचित सरपंचपद स्त्रीसाठी राखीव झाले तर आपली पंचाईत होऊ नये म्हणून अनेकांनी आपण स्वतः निवडणुकीला उभे न राहता आपल्या पत्नीला सदस्यपदासाठी उभे केल्याचे या निवडणुकीतून दिसून येत आहे. ही निवडणूक अनेक बाबतींत निर्णायक ठरणार असून, वारेमाप खर्चाला आळा बसणार आहे, एवढे मात्र निश्चित.