शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
4
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
5
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
6
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
7
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
8
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
9
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
10
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
11
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
12
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
13
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
14
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
15
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
16
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
17
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
18
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
19
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
20
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास

शासकीय आरोग्य यंत्रणेवरचा विश्वास झाला दृढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 04:33 IST

जिल्ह्यात एक लाख तीन हजार २०३ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबची चाचणी करण्यात आली. त्यात १२ हजार २१० व्यक्ती २७ डिसेंबरपर्यंत ...

जिल्ह्यात एक लाख तीन हजार २०३ व्यक्तींच्या घश्यातील स्वॅबची चाचणी करण्यात आली. त्यात १२ हजार २१० व्यक्ती २७ डिसेंबरपर्यंत पॉझिटिव्ह आढळून आले. तर ११ हजार ४९५ व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली. २८९ व्यक्ती कोरोनाचे बळी ठरले. पहिला रुग्ण भंडारा तालुक्यातील गराडा येथे आढळला. तेव्हा आरोग्य यंत्रणेसह सर्वांचीच तारांबळ उडाली होती. नंतर मात्र हळूहळू रुग्ण संख्या वाढत गेली. आरोग्य यंत्रणाही त्याच पद्धतीने सक्षम झाली. ग्रामीण आणि शहरी आरोग्य यंत्रणा प्रभाविपणे राबतात दिसून आली. कधीही शासकीय रुग्णालयाचे उंबरठे न गाठणारे या काळात शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दिसू लागले. या परिस्थितीत खाजगी डॉक्टरांनीही आपली मोलाची सेवा दिली. मात्र काही डॉक्टरांवर रुग्णांची अधिक पैसे घेतल्याचा ठपका ठेवला. क्वॉरंटाईन सेंटरमधील अनास्थेबद्दलही अनेकदा ओरड झाली. शासकीय रुग्णालयातही योग्य उपचार होत नसल्याच्या बोंबा होत्या. परंतु या सर्व टिका टिपण्णींना बाजूला ठेवत आरोग्य यंत्रणेने सक्षमपणे कोरोना नियंत्रणाचे काम केले. आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांनी घरोघरी जावून सर्व्हेक्षण केले. एकंदरीत कोरोनाने आरोग्य यंत्रणा सक्षमच नाही तर सर्वसामान्यांचा विश्वास दृढ झाला, हे या सरत्या वर्षाने दिलेली देणच म्हणावी लागेल.

बॉक्स

रस्त्या रस्त्यावर मास्कची विक्री

कोरोना येण्यापुर्वी तोंडावर मास्क बांधणे म्हणजे आजारी असणे असा काहीचा समज होता. आरोग्य सेवेतील मंडळीच मास्कचा वापर करीत होते. परंतु कोरोनाने लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांना मास्क बांधणे सक्तीचे केले. कोरोनावर कोणतेही औषध नसल्याने मास्क हाच प्रभावी उपाय आहे. वर्षभरात मास्कची प्रचंड मागणी वाढली. औषधी दुकानातून एन-९५ मास्कसह विविध मास्कची चढ्या किंमतीत विक्री झाली. त्याच काळात शहरातील रस्त्या रस्त्यांवर मास्कचे दुकान लागले. आजही विविध ठिकाणी रस्त्यावर मास्क विकले जात आहे. कापड दुकानापासून जनरल स्टोअर्समध्येही दर्शनी भागात दिसून येतात.

बॉक्स

असे वाढले रुग्ण

मार्च ००

एप्रिल ०१

मे ३०

जून ४९

जुलै १७०

ऑगस्ट १०३०

सप्टेंबर ३९५८

ऑक्टोबर ३०८१

नोव्हेंबर १५६४

डिसेंबर १४५२

२७ डिसेंबरपर्यंत.

मृत्यू

मार्च ००

मे ००

जून ००

जुलै ०२

ऑगस्ट २१

सप्टेंबर ९२

ऑक्टोबर १००

नोव्हेंबर ३६

डिसेंबर ३८

२७ डिसेंबरपर्यंत.