शहरं
Join us  
Trending Stories
1
"अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम फेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
2
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
3
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
4
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
5
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
6
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
7
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
8
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
9
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
10
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
11
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
12
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
13
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
14
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
15
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
16
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
18
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
19
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
20
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?

शेतकऱ्यांची चिंता वाढली : बावनथडी प्रकल्पाचे पाणी सोडा

By admin | Updated: July 14, 2014 00:25 IST

बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन

सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पाला पावसाची प्रतीक्षारंजित चिंचखेडे  चुल्हाड (सिहोरा)बावनथडी नदीवर साकारण्यात आलेल्या सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्पातील समस्या निकाली काढण्यास यंत्रणेला यश आले आहे. नदी पात्रातील पाण्याचा उपसा करण्यासाठी प्रकल्पाला पावसाची प्रतीक्षा आहे. सद्यस्थितीत नदीचे पात्र कोरडे असल्याने शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत.सिहोरा परिसरातील बावनथडी नदीवर सोंड्याटोला उपसा सिंचन प्रकल्प साकारण्यात आलेला आहे. हा प्रकल्प नदी पात्रातून सन २००७ पासून पाण्याचा उपसा चांदपूर जलाशयात करीत आहे. या जलाशयात साठवणूक करण्यात आलेले पाणी शेतकऱ्यांच्या शेतीला खरीप आणि रब्बी हंगामात वाटप होत आहे. यामुळे शेतकरी या प्रकल्पाकडे आशान्वीत आहेत. परंतु या प्रकल्पात निधी अभावी अनेक समस्या निर्माण झालेल्या आहेत. दुष्काळसदृष्य परिस्थितीत हा प्रकल्प १४ हेक्टर शेतीला जीवनदायी ठरणारा आहे. परंतु तसे नियोजन नाही. या प्रकल्पस्थळात पावसाळा तोंडावर असताना बॅटऱ्या दुरुस्त नाही. या शिवाय टाकीतील गाळ काढण्यात आली नाही. लक्षावधी निधीचा खर्च असताना उपलब्ध करण्यात आलेला नाही. यामुळे यंदा नदी पात्रातून प्रकल्प पाण्याचा उपसा करणार किंवा नाही असा संशय शेतकऱ्यांना निर्माण झाला. प्रकल्पातील समस्या निकाली काढण्यासाठी लोकप्रतिनिधी तथा शेतकऱ्यांनी आंदोलन उभे केले. यामुळे यंत्रणा खळबडून जागी झाली. या संदर्भात लोकमतने सातत्याने वृत्त प्रकाशित करीत या प्रकल्पाची व्यथा जनता आणि यंत्रणेच्या दरबारात मांडली.प्रकल्पातील समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी यंत्रणेने मनावर घेतले. प्रकल्प स्थळातच अधिकाऱ्यांनी ठाण मांडले. नादुरुस्त बॅटऱ्याची शोध मोहीम राबविली. यात ३ नवीन बॅटऱ्याची सोय करण्यात आली आहे. सध्यास्थित असलेल्या बॅटऱ्या, पंपगृहाला वीज पुरवठा करण्यास सक्षम आहे. ही अडचण निकाली काढण्यात आली असली तरी यंत्रणेने नवीन बॅटऱ्या पुरवठा करण्यासाठी वरिष्ठांना पाठपुरावा सुरु केला आहे. या प्रकल्पस्थळांच्या टाकीत असलेली गाळ काढण्याचे कार्य प्रगतीपथावर आहे. या प्रमुख दोन समस्या निकाली काढण्यात आल्याने यंदा प्रकल्प पाण्याचा उपसा करण्यास सज्ज आहे. परंतु पावसाळा कोरडा जात असल्याने नदी पात्रात पाणी नाही. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्याआहेत. शेतकऱ्यांनी खरीप हंगाम तोंडावर असल्याने धानाची नर्सरी घातली आहे. या नर्सरीला जीवंत ठेवण्यासाठी कसरत सुरु झाली आहे. चांदपूर जलाशयात गत वर्षीचे शिल्लक असलेले पाणी धानाच्या नर्सरीकरिता वाटप करण्यात आले आहे. हे पाणी आता संपले आहे. ६ फुट पाणी जलाशयात असल्याने पाणी वाटप बंद करण्यात आले आहे. आता या धानाच्या नर्सरी निसर्गाच्या पावसावर अवलंबून आहेत. परंतु पावसाचा थांगपत्ता नाही. येत्या १० दिवसात पावसाची हजेरी नसल्यास भीषण दुष्काळाचे चित्र निर्माण होणार आहेत. या धानाच्या नर्सरी करपल्यास जलाशयाचे पाणी वाटपाचे महत्व राहणार नाही. परिसरात दुष्काळावर आंशीकरित्या मात करण्यासाठी आता सोंड्याटोला प्रकल्पाला राजीव सागर (बावनथडी प्रकल्पाचे) पाणी देण्याची गरज आहे. हा पाणी शेतकऱ्यांना संजीवनी ठरणार आहे.