शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामानाने भेंडी पिकावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:00 IST

आठवडा संपूनही वातावरण ढगाळ असल्याने नगदी पिकांवर मोठे संकट आले आहे. भंडारा जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षपणामुळे या वर्षाला सुमार बागायतीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदर कोसळले : उत्पादनात घट, भाजीपाल्याचा शेतकरी नैराश्याच्या खाईत

मुखरु बागडे ।आॅनलाईन लोकमतपालांदूर (चौ.) : आठवडा संपूनही वातावरण ढगाळ असल्याने नगदी पिकांवर मोठे संकट आले आहे. भंडारा जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षपणामुळे या वर्षाला सुमार बागायतीत वाढ झाली आहे. भेंडीचे बाग उत्तम सजले असताना हवामानाच्या वक्रदृष्टीने पिक किटकांच्या सावटात सापडले आहे. उत्पन्नावर विपरीत परिणाम असून दर्जाही घसरल्याने व्यापारी दर कमी देत शेतकºयांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे.शासनस्तरावर शेतीला नवे आयाम देण्याकरिता भरपूर पाठपुरावा केला जातो. शेतकरी ही नव्या आशा मनी बाळगत नव्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याकरिता नवनवे प्रयोग करतो. मात्र शेतकºयांच्या पदरी निराशाच दिसत आहे. दिवाळीनंतर पावसाने विश्रांती घेताच बाग सजीवत जानेवारीपासून शेतमाल बाजारात दिसते. आरंभाला दर अधिक मिळतो. नंतर मात्र भाजीपाल्याची आवक वाढली की बाजारात नेण्याचा सुद्धा खर्च निघत नाही. यावर्षाला बºयाच शेतकºयांनी फुलकोबी न काढता शेतात नष्ट केले. २ ते ३ रुपये एवढ्या पडक्या दरातत ब्रोकोली विकावी लागली. भाजी २० ते २५ रुपये एवढ्या भावाने विकणारी आतापासूनच ७ रुपये प्रतीकिलो एवढ्या कमी दरात विकावी लागत आहे. वांगे, भटई यांनाही ५-७ रुपये किलो एवढाच दर असल्याने बागायतदार अडचणीत आला आहे.जानेवारी ते मार्च पर्यंत भेंडी पिकाला दरवर्षी उत्तम दर मिळत होते. मात्र दर गडगडल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. भेंडी पिकाला संपूर्ण मशागत खर्चाचा अंदाज बांधला असता प्रतिकिलो ७ रुपये एवढा निश्चित आहे. मागील आठवड्यात ६ रुपये एवढ्या कमी दरात भेंडी विकावी लागली. अलिकडे १५ - १८ रुपये एवढा दर मिळत आहे. पण उत्पन्न कमी झाले आहे. शेतकºयांनी उत्पादीत तरी काय करावे की ज्यात त्याचा सन्मान वाढून आर्थिक स्थैर्य लाभेल, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.भंडारा जिल्ह्यातील भेंडी चवदार व देखणी असल्याने देशासह दुबई शहरात पोहचली आहे. मात्र त्या तुलनेत अपेक्षित दर यंत्रणेकडून शेतकºयांना देत नाही. शेतकºयांची आर्थिक मुस्कटदाबी दलालांकडून होत असून प्रशासन हातावर हात ठेवून येरे माझ्या मागल्याची भूमिका निभावत आहे. शेतकºयाच्या शेतातून मालवाहक शेतमाल बाजारात स्वत: विकतो. शेतकºयाला खोटा भाव व वजन सांगून त्याची पिळवणूक करतो. गटागटाने शेती करीत विविध पिके उत्पादीत केली. स्वत: बाजारात गेला तर नक्कीच बाजाराची परिस्थिती अभ्यासून पिक उत्पादीत करायला व भाव निश्चितीला मार्ग मिळेल यात शंका नाही.सुमार अडचणींचा सामना करीत धानपिकाला डावलत भेंडीचे पिक एक एकरात लावले आहे. अपेक्षित भावाचा हंगाम संपण्याच्या वाटेवर आला. मात्र अजूनही खर्ची झालेले पैसे निघाले नाही. मजुरांच्या एकीने त्यांच्या सोईने मजुरी द्यावी लागते. मात्र आम्हा शेतकºयात ऐकी नाही हे दुर्भाग्य आहे, असे शेतकºयाकडून सांगण्यात आले.बाजारातील दर मागणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. शेतकºयांनी बाजारपेठेचा अभ्यास ठेवूनच पिके निवडावी. यावर्षात मिरचीला उत्तम दर आहे. एकच पिक / भाजीपाला लावण्यापेक्षा विविध प्रकारची लागवड करावी. .-बंडू बारापात्रे, व्यापारी, बीटीबी, भंडारा