शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
2
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
3
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
4
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
5
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
6
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
7
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
8
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
9
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
10
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
11
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
12
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
13
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
14
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
15
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
16
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
17
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
18
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
19
मैत्रिणीसोबत थांबला होता फ्लॅटमध्ये, तरुणाने अचानक ३२व्या मजल्यावरून मारली उडी
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

ढगाळ हवामानाने भेंडी पिकावर संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 11, 2018 22:00 IST

आठवडा संपूनही वातावरण ढगाळ असल्याने नगदी पिकांवर मोठे संकट आले आहे. भंडारा जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षपणामुळे या वर्षाला सुमार बागायतीत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देदर कोसळले : उत्पादनात घट, भाजीपाल्याचा शेतकरी नैराश्याच्या खाईत

मुखरु बागडे ।आॅनलाईन लोकमतपालांदूर (चौ.) : आठवडा संपूनही वातावरण ढगाळ असल्याने नगदी पिकांवर मोठे संकट आले आहे. भंडारा जिल्ह्यात पाण्याच्या दुर्भिक्षपणामुळे या वर्षाला सुमार बागायतीत वाढ झाली आहे. भेंडीचे बाग उत्तम सजले असताना हवामानाच्या वक्रदृष्टीने पिक किटकांच्या सावटात सापडले आहे. उत्पन्नावर विपरीत परिणाम असून दर्जाही घसरल्याने व्यापारी दर कमी देत शेतकºयांच्या अपेक्षेवर पाणी फेरले आहे.शासनस्तरावर शेतीला नवे आयाम देण्याकरिता भरपूर पाठपुरावा केला जातो. शेतकरी ही नव्या आशा मनी बाळगत नव्या स्वप्नांना प्रत्यक्षात उतरविण्याकरिता नवनवे प्रयोग करतो. मात्र शेतकºयांच्या पदरी निराशाच दिसत आहे. दिवाळीनंतर पावसाने विश्रांती घेताच बाग सजीवत जानेवारीपासून शेतमाल बाजारात दिसते. आरंभाला दर अधिक मिळतो. नंतर मात्र भाजीपाल्याची आवक वाढली की बाजारात नेण्याचा सुद्धा खर्च निघत नाही. यावर्षाला बºयाच शेतकºयांनी फुलकोबी न काढता शेतात नष्ट केले. २ ते ३ रुपये एवढ्या पडक्या दरातत ब्रोकोली विकावी लागली. भाजी २० ते २५ रुपये एवढ्या भावाने विकणारी आतापासूनच ७ रुपये प्रतीकिलो एवढ्या कमी दरात विकावी लागत आहे. वांगे, भटई यांनाही ५-७ रुपये किलो एवढाच दर असल्याने बागायतदार अडचणीत आला आहे.जानेवारी ते मार्च पर्यंत भेंडी पिकाला दरवर्षी उत्तम दर मिळत होते. मात्र दर गडगडल्याने शेतकरी विवंचनेत सापडला आहे. भेंडी पिकाला संपूर्ण मशागत खर्चाचा अंदाज बांधला असता प्रतिकिलो ७ रुपये एवढा निश्चित आहे. मागील आठवड्यात ६ रुपये एवढ्या कमी दरात भेंडी विकावी लागली. अलिकडे १५ - १८ रुपये एवढा दर मिळत आहे. पण उत्पन्न कमी झाले आहे. शेतकºयांनी उत्पादीत तरी काय करावे की ज्यात त्याचा सन्मान वाढून आर्थिक स्थैर्य लाभेल, हा प्रश्न अनुत्तरीत आहे.भंडारा जिल्ह्यातील भेंडी चवदार व देखणी असल्याने देशासह दुबई शहरात पोहचली आहे. मात्र त्या तुलनेत अपेक्षित दर यंत्रणेकडून शेतकºयांना देत नाही. शेतकºयांची आर्थिक मुस्कटदाबी दलालांकडून होत असून प्रशासन हातावर हात ठेवून येरे माझ्या मागल्याची भूमिका निभावत आहे. शेतकºयाच्या शेतातून मालवाहक शेतमाल बाजारात स्वत: विकतो. शेतकºयाला खोटा भाव व वजन सांगून त्याची पिळवणूक करतो. गटागटाने शेती करीत विविध पिके उत्पादीत केली. स्वत: बाजारात गेला तर नक्कीच बाजाराची परिस्थिती अभ्यासून पिक उत्पादीत करायला व भाव निश्चितीला मार्ग मिळेल यात शंका नाही.सुमार अडचणींचा सामना करीत धानपिकाला डावलत भेंडीचे पिक एक एकरात लावले आहे. अपेक्षित भावाचा हंगाम संपण्याच्या वाटेवर आला. मात्र अजूनही खर्ची झालेले पैसे निघाले नाही. मजुरांच्या एकीने त्यांच्या सोईने मजुरी द्यावी लागते. मात्र आम्हा शेतकºयात ऐकी नाही हे दुर्भाग्य आहे, असे शेतकºयाकडून सांगण्यात आले.बाजारातील दर मागणी पुरवठ्यावर अवलंबून आहे. शेतकºयांनी बाजारपेठेचा अभ्यास ठेवूनच पिके निवडावी. यावर्षात मिरचीला उत्तम दर आहे. एकच पिक / भाजीपाला लावण्यापेक्षा विविध प्रकारची लागवड करावी. .-बंडू बारापात्रे, व्यापारी, बीटीबी, भंडारा