शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

गोसीखुर्द जलस्तराचा दुसरा टप्पा पूर्ण

By admin | Updated: November 18, 2016 00:36 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या व महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम सुरु असून धरणामध्ये

जलस्तर २४२.१०० मीटर : यावर्षी २४२.५०० मीटरचे उद्दिष्टपवनी : विदर्भातील सर्वात मोठ्या व महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम सुरु असून धरणामध्ये दुसऱ्या टप्प्याचे म्हणजे २४२ मिटर पर्यंतचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले आहे. आज धरणाचा जलस्तर २४२.१०० मिटर वर पोहचला आहे. या वर्षी धरणामध्ये २४२.५०० मिटर पर्यंत जलस्तर वाढविण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका नाही. जलस्तर वाढविल्यामुळे नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वीत होण्याला मदत होणार आहे. डाव्या कालव्याने सिंचन करायला मदत होणार आहे.मागच्या वर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४२ मिटर पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट्य होते. पण जलस्तर वाढविल्यामुळे अनेक गावात पाणी शिरल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे नवीन गावठानात स्थानांतरण करायला अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मागच्या वर्षी सरकारने २४.८०० मिटर वर जलस्तर वाढविण्याचे काम थांबविले होते. पण जलस्तर वाढविण्याचे काम थांबविल्यामुळे राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या या धरणाला केंद्र सरकारकडून निधी मिळायला अडचणी येत होत्या. बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेजचा लाभ मिळाल्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे बुडीत क्षेत्राीतल गावे रिकामे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुनर्वसन कार्यक्रमाला गती आली. बुडीत क्षेत्रातील एक एक गाव रिकामे होऊ लागले व बुडीत क्षेत्रातील दुसऱ्या टप्प्यातील बहुतेक गावांनी नवीन गावठानात स्थानांतरण केले. त्यामुळे गोसेखुर्दचा जलस्तर वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला.भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील वडद, अर्जुनी, पिपरी, जाख, बोरगाव (बु.), मौदी, महालगाव, पाथरी, सावरगाव आदी गावे नवीन गावठानात स्थानांतरीत झाले आहेत. चिचखेडा गावातील ७५ टक्के प्रकल्पग्रस्त नवीन गावठानात गेले आहे. या गावाला कोणताही धोका नाही. नागपूर जिल्ह्यातील मालोदा, गडपायली, उमरी, बोरीनाईक, मरुपार, पांजरेपार, सोनारखारी, थुटानबोरी, खराडा, सावंगी, गोठनगाव, तुडका, सालेशहरी, सालेभट्टी, तुडका आदी गावे स्थलांगतरीत झाले आहेत. त्यामुळे जलस्तर वाढविण्याला कोणतीही अडचण नव्हती.यावर्षी आॅक्टोबर पासून गोसीखुर्दचा जलस्तर २४१.८०० मिटर पासून वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले. महिन्याच्या शेवटी दुसऱ्या टप्प्यातील २४२ मिटर वाढविण्याचे काम पूर्ण झाले. दिवाळी समोर असल्यामुळे जलस्तर वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते .मागील दोन दिवसापासून परत जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यातील जलस्तर आज २४२.१०० मिटरवर पोहचला आहे .यावर्षी जलस्तर २४२.५०० मिटर करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका नाही. (तालुका प्रतिनिधी)