शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
2
फडणवीसांबद्दल अपशब्द वापरल्यास जीभ हासडून हातात देऊ; मंत्री नितेश राणेंचा मनोज जरांगेंना इशारा
3
पाकिस्तान हेरगिरी प्रकरणी यूट्यूबर ज्योती मल्होत्राला केलं कोर्टात हजर; ९५ दिवसांनी तुरुंगाबाहेर!
4
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
5
Shakib Al Hasan World Record : ५०० विकेट्स अन् ७००० धावा! पठ्ठ्यानं वर्ल्ड रेकॉर्डसह केली हवा
6
वडील सोडून गेले, चारित्र्यावर झाली चिखलफेक, जीवे मारण्याच्या धमक्या; अभिनेत्रीने केला संघर्ष
7
Hartalika Teeja 2025: हरितालिका व्रत केल्याने केवळ सौभाग्य नाही, तर 'हे'देखील लाभ होतात!
8
TCS-इन्फोसिस ठरले हिरो! आयटी शेअर्समुळे बाजारात तेजी; निफ्टी-सेन्सेक्सही वधारले; पण, 'या' क्षेत्रात दबाव
9
Mumbai Crime: मरीन ड्राईव्हच्या समुद्रात आढळला तरुणीचा मृतदेह; चेहऱ्यावर जखमा
10
"तीच लोक डोक्यावर पाय देऊन गद्दारांच्या टोळीत सामील झाले"; मनसे नेते राजू पाटलांना संताप अनावर
11
५ वर्षात १ लाख रुपयांचे झाले १९ लाख! डिफेन्स शेअरची जोरदार उसळी, ६ महिन्यांत १००% परतावा!
12
स्मशानभूमीला पाणीपट्टीचे बिल पाठवले, १० टक्के सवलतही दिली; महापालिकेचा अजब पराक्रम!
13
जगदीप धनखड नजरकैदेत? अमित शाहांच्या उत्तरावर जयराम रमेश यांची टीका; म्हणाले- 'रहस्य...'
14
'माय फ्रेंड गणेशा' मधला छोटासा मुलगा आता आहे प्रसिद्ध अभिनेत्री, पाहा कशी दिसते? (Photos)
15
Jio IPO ची प्रतीक्षा आता संपणार! शुक्रवारी मुकेश अंबानी देणार सरप्राईज?
16
व्हिएतनाममधील ५.८ लाख लोकांना आपली घरं सोडावी लागणार! नेमकं कारण तरी काय?
17
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
18
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
19
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
20
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती

गोसीखुर्द जलस्तराचा दुसरा टप्पा पूर्ण

By admin | Updated: November 18, 2016 00:36 IST

विदर्भातील सर्वात मोठ्या व महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम सुरु असून धरणामध्ये

जलस्तर २४२.१०० मीटर : यावर्षी २४२.५०० मीटरचे उद्दिष्टपवनी : विदर्भातील सर्वात मोठ्या व महत्वाकांक्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर वाढविण्याचे काम सुरु असून धरणामध्ये दुसऱ्या टप्प्याचे म्हणजे २४२ मिटर पर्यंतचे उद्दिष्ट्य पूर्ण झाले आहे. आज धरणाचा जलस्तर २४२.१०० मिटर वर पोहचला आहे. या वर्षी धरणामध्ये २४२.५०० मिटर पर्यंत जलस्तर वाढविण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका नाही. जलस्तर वाढविल्यामुळे नेरला उपसा सिंचन योजना कार्यान्वीत होण्याला मदत होणार आहे. डाव्या कालव्याने सिंचन करायला मदत होणार आहे.मागच्या वर्षी गोसीखुर्द धरणाचा जलस्तर २४२ मिटर पर्यंत वाढविण्याचे उद्दिष्ट्य होते. पण जलस्तर वाढविल्यामुळे अनेक गावात पाणी शिरल्यामुळे प्रकल्पग्रस्तांचे नवीन गावठानात स्थानांतरण करायला अनेक अडचणी येत होत्या. त्यामुळे मागच्या वर्षी सरकारने २४.८०० मिटर वर जलस्तर वाढविण्याचे काम थांबविले होते. पण जलस्तर वाढविण्याचे काम थांबविल्यामुळे राष्ट्रीय प्रकल्प असलेल्या या धरणाला केंद्र सरकारकडून निधी मिळायला अडचणी येत होत्या. बुडीत क्षेत्रातील प्रकल्पग्रस्तांना पुनर्वसन पॅकेजचा लाभ मिळाल्यामुळे या प्रकल्पग्रस्तांनी त्यांचे बुडीत क्षेत्राीतल गावे रिकामे करण्यास सुरुवात केली. त्यामुळे पुनर्वसन कार्यक्रमाला गती आली. बुडीत क्षेत्रातील एक एक गाव रिकामे होऊ लागले व बुडीत क्षेत्रातील दुसऱ्या टप्प्यातील बहुतेक गावांनी नवीन गावठानात स्थानांतरण केले. त्यामुळे गोसेखुर्दचा जलस्तर वाढविण्याचा मार्ग मोकळा झाला.भंडारा जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील वडद, अर्जुनी, पिपरी, जाख, बोरगाव (बु.), मौदी, महालगाव, पाथरी, सावरगाव आदी गावे नवीन गावठानात स्थानांतरीत झाले आहेत. चिचखेडा गावातील ७५ टक्के प्रकल्पग्रस्त नवीन गावठानात गेले आहे. या गावाला कोणताही धोका नाही. नागपूर जिल्ह्यातील मालोदा, गडपायली, उमरी, बोरीनाईक, मरुपार, पांजरेपार, सोनारखारी, थुटानबोरी, खराडा, सावंगी, गोठनगाव, तुडका, सालेशहरी, सालेभट्टी, तुडका आदी गावे स्थलांगतरीत झाले आहेत. त्यामुळे जलस्तर वाढविण्याला कोणतीही अडचण नव्हती.यावर्षी आॅक्टोबर पासून गोसीखुर्दचा जलस्तर २४१.८०० मिटर पासून वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले. महिन्याच्या शेवटी दुसऱ्या टप्प्यातील २४२ मिटर वाढविण्याचे काम पूर्ण झाले. दिवाळी समोर असल्यामुळे जलस्तर वाढविण्याचे काम थांबविण्यात आले होते .मागील दोन दिवसापासून परत जलस्तर वाढविण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. तिसऱ्या टप्प्यातील जलस्तर आज २४२.१०० मिटरवर पोहचला आहे .यावर्षी जलस्तर २४२.५०० मिटर करण्याचे उद्दिष्ट्य आहे. त्यामुळे बुडीत क्षेत्रातील कोणत्याही गावाला धोका नाही. (तालुका प्रतिनिधी)