शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेसाठी निधी वळवला; संजय शिरसाट संतापले, म्हणाले, “खाते बंद केले तरी चालेल”
2
खात्यात काय सुरु माहिती नाही, निधी वळल्यावर संतापाला काय अर्थ? वडेट्टीवारांचा शिरसाटांवर निशाणा
3
नाशिकमध्ये आणखी एक हत्या! आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःच नेले जिल्हा रुग्णालयात, स्वतःहून गेला पोलीस ठाण्यात
4
“अमित शाह महाराष्ट्रात ३ पक्ष चालवतात, अजितदादा-एकनाथ शिंदे कधीही CM होणार नाहीत”: संजय राऊत
5
हिंदी चित्रपटात का दिसत नाहीत भरत जाधव? सांगितलं महत्त्वाचं कारण, म्हणाले- "एकदा मला नोकराची भूमिका..."
6
भारताच्या भीतीनं कराची स्टॉक एक्सचेंजमध्ये भूकंप, असा पडला की आता बाहेर येणंही झालं कठीण
7
Rashid Khan: असा झेल कधीच पाहिला नसेल, गुजरात- हैदराबाद सामन्यात राशीद खानची जबरदस्त फिल्डिंग
8
"दोन पेग मारल्यानंतर सलमान खानने माझ्याशी..."; मिका सिंगने सांगितली भाईजानची कधीही न ऐकलेली गोष्ट
9
Charanjit Singh Channi : "सर्जिकल स्ट्राईकचा पुरावा मागत नाही"; टीकेची झोड उठताच चरणजीत सिंग चन्नी यांचा यू-टर्न
10
शिक्षिकेचं १३ वर्षाच्या विद्यार्थ्यासोबतच जुळलं सूत, पळूनही गेली; मानसी म्हणाली, 'माझ्या गर्भात त्याचं बाळ'
11
कर्ज नको म्हणून दिव्यांगाचा काढला विमा; हत्या करुन हडपले लाखो रुपये, 'असा' झाला पर्दाफाश
12
काव्या मारनपेक्षाही अनेक पटींनी श्रीमंत आहे राम चरणची सासू; एकट्या सांभाळतात ७७ हजार कोटींचा व्यवसाय
13
“पाक कायम शत्रू, मोदी-शाहांनी परवानगी दिल्यास युद्धास जायला तयार”; कर्नाटकातील मंत्री आक्रमक
14
नारळ पाण्यामुळे शुगर लेव्हल वाढते का, किती असते नॅचरल शुगर, शरीरावर काय होतो परिणाम?
15
पाकिस्तानची आर्थिक कोंडी; भारताने ट्रेड स्ट्राईक करत आयातीवर घातली बंदी, जहाजांचा मार्ग रोखला
16
“मोदींनी अद्यापही युद्ध सुरू केलेले नाही, त्यांची मानसिकता...”; संजय राऊतांची पुन्हा टीका
17
Narasimha Navratri 2025: आजपासून ११ मे पर्यंत नृसिंह नवरात्रीत न विसरता म्हणा 'हे' तापमुक्ती देणारे स्तोत्र!
18
Bhiwandi Crime: पती कामावरून घरी आला अन् पत्नीसह तीन लेकींचे मृतदेहच दिसले, पोलिसही हादरले!
19
Delhi Rains : हृदयद्रावक! मुसळधार पावसामुळे उद्ध्वस्त झालं कुटुंब; २० दिवसांपूर्वी आलेल्या ४ जणांचा मृत्यू
20
तुम्हाला धीरुभाई अंबानींचं खरं नाव माहितीये का, कोणत्या वयात उभी केलेली रिलायन्स?

मुख्यमंत्री सडक योजनेचे रस्ते लॉकडाऊनमुळे प्रभावित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क चुल्हाड ( सिहोरा ) : सिहोरा परिसरातील गावांना थेट तुमसर बपेरा राज्य मार्गाला जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम ...

लोकमत न्यूज नेटवर्क

चुल्हाड ( सिहोरा ) : सिहोरा परिसरातील गावांना थेट तुमसर बपेरा राज्य मार्गाला जोडण्यासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला मंजुरी देण्यात आली असली तरी लॉकडाऊनमुळे रस्त्याचे बांधकाम प्रभावित झाले आहेत. कोरोना विषाणू संसर्गच्या भीतीमुळे कंत्राटदारासह मजूर, कामगारांनी पोबारा केला आहे. परिणामतः पुलाच्या बांधकामाला पाणीच मिळत नसल्याचे दिसून येत आहेत. यामुळे गुणवत्तेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सिहोरा परिसरातील गावांना थेट तुमसर बपेरा राज्य मार्गाला जोडण्यासाठी माजी आमदार चरण वाघमारे यांनी नियोजन केले होते. निवडणुकी पूर्वी या रस्त्याचे भूमिपूजन कार्यक्रमाचा झंझावात निर्माण केला होता. निवडणुकीनंतर प्रत्यक्षात मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांना सुरुवात झाली होती. रास्ता डांबरीकरण व खडीकरणच्या कामातील गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात आले होते. अनेक रस्ते महिनाभरात उखडल्याने आरोप प्रत्यारोप झाले. परंतु कामे थांबले नाहीत. या कालावधीत निधीचे अडचणी वाढल्या होत्या. नंतर कोरोना विषाणू संसर्गच्या प्रादुर्भावाने डोके वर काढल्यानंतर मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे कामे प्रभावित झाले आहेत.

या योजने अंतर्गत रस्त्याचे खडीकरनाचे कामे सुरू करण्यात आले. पुलाचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहेत. परंतु लॉकडाऊन घोषित होताच कामे बंद करण्यात आली आहेत. भर उन्हाळ्यात पुलाचे बांधकामाला मजबुतीकरणासाठी पाण्याची गरज असताना ते मिळणे बंद झाले आहे. कोरोना विषाणू संसर्गच्या वाढत्या प्रभावाने कंत्राटदारासह मजूर, कामगारांनी पोबारा केला आहे. त्यांचे फिरकणे बंद झाले असल्याने विकास कामे प्रभावित झाले आहेत. निधी अभावी रस्त्याचे बांधकाम अडले असल्याचे लक्षात येताच आमदार राजू कारेमोरे यांनी निधी खेचून आणण्याचे प्रयत्न केले आहेत. बिनाखी ते गोंडीटोला मार्गाचे नवीन कामासाठी त्यांनी निधी खेचून आणला आहे. दरम्यान मुख्यमंत्री ग्राम सडक योजने अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण करण्याचे कालावधी नियोजन आहे. या कालावधीत कामे पूर्ण होणार नाहीत. अशी शक्यता आहे. यामुळे गावांना जोडणाऱ्या रस्त्याचे बांधकाम लांबणीवर जाणार आहेत. गावांना जोडणारे रस्त्याचे बांधकाम अर्धवट सोडण्यात आले असल्याने गावकरी मात्र त्रस्त झाले आहेत. ब्राह्मणटोला, बिनाखी ते गोंडीटोला, सुकली नकुल तथा महालगाव फाटा ते गोंडीटोला रस्त्याचे डांबरीकरण अडले आहे. पावसाळा तोंडावर असल्याने गावकरी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्याची ओरड करीत आहेत.

बॉक्स

रस्त्याची नियोजित जागा शेतात

मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या कामांना मंजुरी मिळाल्यानंतर ई निविदा अंतर्गत कामे कंत्राटदारांना उपलब्ध झाले आहेत. रस्त्याची नियोजित जागा मोजमाप करण्यात आली आहे. जागा शेतात असल्याने अतिक्रमणात गेली असल्याने कंत्राटदार हैराण झाले आहेत. शेतकऱ्यांनी जागा हडपल्यानंतर थेट धुऱ्याचे बांधकाम रस्त्यावर आणले आहेत. यामुळे रस्त्याचे बांधकाम करताना कंत्राटदारांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. विकास कामात शेतकऱ्यांचे सहकार्य मिळत नसल्याचे दिसून येत आहेत. मुख्य रस्ते अतिक्रमणात गेल्यानंतर पाणंद रस्त्याची कल्पनाच करता येत नाही.