शहरं
Join us  
Trending Stories
1
"हिंदी भाषा सक्ती असू नये, पण विद्यार्थ्यांनी द्वेष करु...", भाषेवरुन शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
2
"मराठी माणूस एकत्र येऊ नये म्हणून गाठीभेटी घेतात"; ठाकरेंच्या टीकेवर CM फडणवीस म्हणाले, "बोलबच्चन असलेल्यांना..."
3
वंदे भारत एक्सप्रेसमध्ये भाजपा आमदारानं समर्थकांसह प्रवाशाला केली बेदम मारहाण
4
इस्त्रायलने २००० किलोमीटरवरुन क्षेपणास्त्र डागले ! इराणचे अणु केंद्र उद्ध्वस्त केले; सॅटेलाईट फोटो आले समोर
5
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
6
एअर इंडिया विमान अपघातात सापडलेल्या ७० तोळे सोने आणि रोख रकमेवर कुणाचा हक्क? कायदा काय सांगतो?
7
UCO Bank Case: अभय लोढा यांची दोषमुक्तता करण्यास सीबीआय न्यायालयाने दिला नकार!
8
Israel Stock Market : हल्ल्याच्या बातमीनंतरही इस्रायलचा शेअर बाजार सुस्साट; ५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर, कारण काय?
9
"आम्ही बहीण-भाऊ आहोत, शंका घेऊ नका"; एकाच स्कार्फने दोघांनी संपवले आयुष्य, सोलापुरात खळबळ!
10
Iran-Israel War : भारताचे ४७७० कोटी रुपये धोक्यात, इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर सर्व केलेल्यावर पाणी फेरलं जाईल
11
Viral Video: वा क्या कारीगरी है; विजेच्या खांबातून रस्ता, बंगळुरूतील व्हिडीओ व्हायरल, तुम्ही बघितला का?
12
Sonam Raghuvanshi : पिठाच्या गिरणीतून थेट कोट्यवधींचे साम्राज्य! सोनम रघुवंशीचे वडील इतके श्रीमंत कसे झाले?
13
Yogini Ekadashi 2025: योगिनी ते आषाढी एकादशी, १५ दिवस ऐका 'हे' स्तोत्र; मिटेल चिंता, होईल अपार लाभ!
14
"मला सक्रीय राजकारणात यायचंय", सायली संजीवने व्यक्त केली इच्छा; म्हणाली...
15
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
16
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
17
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
18
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
19
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
20
Pandharpur Wari: वारीत गर्दी नियंत्रण, सुरक्षेसाठी ‘एआय’; ७ हजार पोलिस तैनात

सहा महिन्यांपासून बांबूचा पुरवठा बंद

By admin | Updated: April 24, 2016 00:38 IST

येथील वनविभागाच्या डेपोतून सहा महिन्यांपासून बुरड कामगारांना बांबुचा पुरवठा करण्यात आलेला नाही.

वनविभागाची अनास्था : बांबू टंचाईने बुरड कामगारांवर बेकारीचे सावटसाकोली : येथील वनविभागाच्या डेपोतून सहा महिन्यांपासून बुरड कामगारांना बांबुचा पुरवठा करण्यात आलेला नाही. त्यामुळे लाखांदूर फाटा परिसरात राहणाऱ्या ४० कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढवली आहे. याबाबत वारंवार तक्रार करूनही वनविभागाने बांबू पुरवठा केला नाही. परिणामी बुरड कामगारांचा व्यवसाय बंद पडला आहे.परिसरात बुरड समाजाची ४० कुटूंबे राहतात. यातील १५० महिला-पुरुषांची उपजीविका बांबूपासून दैनंदिन उपयोगाचे व कलाकुसरीच्या वस्तू तयार करुन त्यांच्या विक्रीतून होते. बुरड समाजासाठी येथील वनविभगाच्या डेपोतून बांबूचा पुरवठा करण्यात येत होता. परंतु मागील वर्षात दिवाळीनंतर या डेपोतून बांबुचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे खरीप हंगामात शेतकऱ्यांची गरज असूनही या कामगारांना सूप, टोपल्या, वडगे आदीचा पुरवठा करता आला नाही.मागील सहा महिन्यांपासून वनविभागाच्या डेपोतून बांबूचा पुरवठा झाला नाही. त्यामुळे बुरड कामगारांवर बेरोजगारी आली असून त्यांच्या कुटूंबाचा उदनिर्वाह करणे कठीण झाले आहे. काही कामगारांनी नवेगावबांध येथील डेपोतून मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु त्यासाठी चार ते पाच दिवस मुक्काम करावा लागतो. बांबूचा दर्जा योग्य नाही. शिवाय वाहतुक खर्चही अधिक येत असल्याने वस्तुच्या किंमती वाढतात त्या शेतकऱ्यांना परवडत नाही. शेतकऱ्यांच्या शेतातील बांबू प्रति नग प्रमाणे खरेदी करावा लागतो. त्यामुळे तो सुध्दा परवडत नाही. अशावेळी वनविभागाचे बांबूचा पुरवठा करावा याकरिता समाज बांधवांनी पाठपुरावा केला. परंतु त्याबाबत अधिकाऱ्यांची अनास्था असल्याने मागील सहा महिन्यापासून कामगारांना बांबूचा पुरवठा झाला नाही. या समाजातील महिला-पुरुषांना उदरनिर्वाहाचे साधन उपलब्ध व्हावे याकरिता साकोली डेपोतून बांबूचा पुरवठा करावा, अशी मागणी अखिल खडतकर, अंजना नागपूरे, अंकिता नागपूरे, सुनील गऱ्हाटे, शंकून गऱ्हाटे, गोपाल नागपूरे यांच्यासह बुरड कामगारांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)बुरड लोकांच्या कामासाठी आपल्याकडे योग्य बांबू नाही. नवेगावबांध, चिचगड व गोंदिया डेपोतून बांबू मागवावा लागतो. एका ट्रकमध्ये २५०० ते ३००० बांबू येतात. त्यातून ते निवडून ८०० ते १००० काढतात. वाहनाची कमतरता असल्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात त्यांना वेळेवर बांबु उपलब्ध नाही.- मनोहर गोखले, सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो) साकोली.