शहरं
Join us  
Trending Stories
1
“१५ मिनिटे सत्ता द्या, पाकिस्तानला कसे नेस्तनाबूत करायचे ते दाखवून देऊ”; AIMIM नेते आक्रमक
2
पाकिस्तानची फजिती! अर्थ व्यवहार मंत्रालयाचे अकाऊंट हॅक; 'त्या' पोस्टने वेधून घेतलं जगाचं लक्ष
3
Operation Sindoor Live Updates: भारतात घुसखोरी करणाऱ्या ७ दहशतवाद्यांना BSF जवानांनी ठार केले
4
'कराची बेकरी' पाकिस्तानी ब्रँड आहे का? कोणी केली सुरुवात? का दिलं असं नाव? हा इतिहास माहितीच हवा
5
India Pakistan Conflict :'आम्हाला मदत करा होss...'; भारताने घुसून मारल्यानं पाकिस्तानवर हात पसरण्याची वेळ; जागतिक बँकेकडे कर्जाची मागणी
6
आधारमधील तुमचा मोबाईल नंबर ऑनलाइन कसा बदलायचा? घरबसल्या २ मिनिटांत होईल काम
7
India-Pakistan War: सैन्य कारवाईवेळी घराचं नुकसान झाल्यास केंद्र सरकार किती पैसे देते?
8
कराची अन् इस्लामाबादचं कनेक्शन तुटलं; भारताच्या INS विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
9
२३ वर्षांनी अमेरिकन पत्रकाराला मिळाला न्याय; भारतानं पाकिस्तानवर हल्ला करत घेतला बदला
10
सीमेपासून समुद्रापर्यंत... भारताचे नियोजन पाहून पाकिस्तानला भरली धडकी!
11
"शत्रूला त्याची जागा दाखवण्याची वेळ आली...", मधुगंधा कुलकर्णीची देशभक्तीवरील पोस्ट चर्चेत
12
"माझी गरज लागली तर मी बॉर्डरवर जाऊन युद्ध लढण्यासाठी तयार", प्रसिद्ध अभिनेत्याची पोस्ट चर्चेत
13
टीव्ही अभिनेत्याचं कुटुंब जम्मूमध्ये; रात्री घाबरुन पोस्ट करत म्हणाला, "मी देशाबाहेर..."
14
मोठी बातमी! ट्रान्स-हार्बर लोकल सेवा अनिश्चित काळासाठी बंद, तुर्भेजवळ गर्डर पडण्याचा धोका असल्याने खबरदारी
15
“पाकचा खात्मा करण्यास भारतीय सैन्याला यश मिळो”; गुवाहाटीत कामाख्या देवीला साकडे, विशेष पूजा
16
Stock Market Today: मोठ्या घसरणीसह उघडल्यानंतर शेअर बाजार स्थिरावला, निफ्टीमध्येही २०० अंकांची घसरण
17
IMF Bailout Package to Pakistan : रात्रभर मिसाईल्सनं ठोकलं, आता पाकिस्तानला उपाशी मारण्याची तयारी; ११ हजार कोटींची खैरात मिळणार नाही?
18
India Pakistan: पाकिस्तानच्या कुरघोड्यांमुळे सीमेवर तणाव वाढला, भारतातील २४ विमानतळे बंद
19
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वे हाय अलर्टवर; अधिकारी, कर्मचाऱ्यांना मार्गदर्शक सूचना जारी
20
Operation Sindoor : राजनाथ सिंह घेणार मोठी बैठक, तिन्ही लष्करप्रमुख आणि सीडीएस राहणार उपस्थित!

ओवारा येथे नागरिकांची पाण्यासाठी पायपीट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2021 04:32 IST

देवरी : तालुक्यातील महत्त्वपूर्ण ओवारा प्रकल्पातील नागरिक मागील एक महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करत असल्याची बाब समोर आली आहे. येथील ...

देवरी : तालुक्यातील महत्त्वपूर्ण ओवारा प्रकल्पातील नागरिक मागील एक महिन्यापासून पाण्यासाठी भटकंती करत असल्याची बाब समोर आली आहे. येथील नागरिकांना थेंबथेंब पाण्यासाठी भटकंती करून दूरवरून पाणी आणावे लागत आहे. यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. याला ग्रामपंचायत प्रशासनच कारणीभूत असल्याचा आरोप येथील गावकरी करीत आहेत.

तालुक्यातील ओवारा प्रकल्पातून देवरी व आमगाव तालुक्यांना सिंचनाकरिता पाणी उपलब्ध करण्यात येते; परंतु येथील ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे स्थानिक नागरिकांना दररोज पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. येथील पाणीपुरवठा योजना मागील एक महिन्यापासून ठप्प पडली आहे. अधिकांश सार्वजनिक हातपंप नादुरुस्त असून, जे सुरू आहेत, त्यातून दूषित पाणी येत आहे, तसेच सार्वजनिक विहिरीचीही स्थिती बिकट असून, दुर्गंधीयुक्त, गढूळ व दूषित पाणी येते. ग्रामपंचायतीचे सरपंच व सचिवांच्या दुर्लक्षामुळे गावात पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असून, त्यांना नाहकच त्रास सहन करावा लागत आहे. मागील एक महिन्यापासून गावात पाण्याची समस्या आहे. गावात पाणी शुद्धीकरण करण्याची कोणतीही व्यवस्था नाही. सतत गढूळ, अशुद्ध आणि आरोग्याला नुकसान करणारे पाणी गावातील नागरिकांना पुरविण्यात येत असून, येथील पाणीपुरवठा एक महिन्यापासून बंदच आहे. ओवारा येथील पाण्याच्या समस्यांबाबत त्रस्त गावकऱ्यांनी यासंबंधी जिल्हाधिकारी, पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे तक्रार केली आहे. तक्रारीत गावकऱ्यांसाठी पाण्याची व्यवस्था करण्यात यावी व समस्येपासून त्यांना मुक्त करण्यात यावे, अशी मागणी केली आहे.