शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आरक्षण सुनावणी होणार जलद; हायकोर्टात विशेष पूर्णपीठ स्थापन; SCच्या आदेशानंतर पाऊल
2
अफगाणिस्तानला भारताचा मदतीचा हात! अटारी मार्गे केली विशेष मदत; पाकिस्तानला दाखवून दिले
3
आजचे राशीभविष्य १७ मे २०२५ : नोकरदारांना नोकरीत लाभ होईल, जाणून घ्या, कसा असेल आजचा दिवस
4
भारताला हवेत हाफिज सईद, मसूद अझहर, दाऊद इब्राहिम; मोस्ट वाँटेडची यादी पाकला सोपवणार
5
‘सेलेबी’ला काम नको; आयबीचा होता इशारा, सुरक्षेविषयी नवीन प्रश्न निर्माण होण्याची भीती
6
भारत आता पाकिस्तानवर ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ करणार; ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती जगात पोहोचवणार
7
आगळीक करू नका, ‘ऑपरेशन सिंदूर’ हा फक्त ट्रेलर, गरज पडल्यास पूर्ण ‘पिक्चर’ दाखवू: राजनाथ सिंह
8
अफगाणिस्तानातून पाकची जलकोंडी होण्याची शक्यता; शाहतूत धरणास भारताचे आर्थिक, तांत्रिक सहकार्य
9
‘८६४७’ म्हणजे थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या हत्येचा संदेश? जेम्स कॉमी यांच्या पोस्टमुळे खळबळ
10
मध्य प्रदेशच्या मंत्र्यानंतर आता उपमुख्यमंत्र्यांचेही विधान चर्चेत; काँग्रेसची भाजपावर टीका
11
पाक समर्थक तुर्की, अझरबैजानशी  कोणताही व्यापार, पर्यटन नाही; भारतीय व्यापाऱ्यांचा बहिष्कार
12
“तणावाच्या पार्श्वभूमीवर तुर्की, अझरबैजानसोबत करार करू नका”; याआधीचे करार रद्द करायचा निर्णय
13
मुंबईत तळ ठोकून असणाऱ्या २५० बांगलादेशींना घरचा रस्ता; २ दिवसांत पोलिसांची मोठी धडक कारवाई
14
राजकीय नेत्यांना चढला महापालिका निवडणुकीचा ज्वर! स्थानिक प्रश्नांकडे लक्ष, भेटीगाठी सुरू
15
...आता सहपोलिस आयुक्त गुप्तवार्ता; आयपीएस डॉ. आरती सिंह यांच्याकडे जबाबदारी
16
तिन्ही मार्गावर मुंबईत उद्या ‘मेगा ब्लॉक डे’; पश्चिम, मध्य, हार्बरवरील वेळापत्रक कसे असेल?
17
मुंबई सेंट्रल स्थानकावर पहिले डिजिटल लाउंज; केवळ प्रवासी नाही तर नागरिकांनाही लाभ मिळणार
18
दारूच्या नशेत बेभान कंटेनर चालकाने वाहनांसह २० नागरिकांना उडविले; बीडमधील थरार, महिला ठार
19
भारताच्या नीरज चोप्राची ऐतिहासिक कामगिरी; दोहा डायमंड लीगमध्ये भालाफेकीत ९० मीटरचा टप्पा सर
20
पाकला आणखी एक दणका! अफगाणिस्तानातून मिळणारे पाणीही थांबणार? भारताची पावले उचलण्यास सुरुवात

मुख्यमंत्र्यांचा सरपंचांसोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:32 IST

राज्याच्या प्रथम नागरिकाने थेट गावच्या प्रथम नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा योजनेबाबत सूचना दिल्या. निमित्त होते जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन सोहळ्याचे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांना मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा मान मिळाला.

ठळक मुद्देव्हिडीओ कॉन्फरन्स : १६ पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्याच्या प्रथम नागरिकाने थेट गावच्या प्रथम नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा योजनेबाबत सूचना दिल्या. निमित्त होते जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन सोहळ्याचे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांना मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा मान मिळाला.ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात कोटी २५ लाख ३६ हजार रुपये खर्चाच्या १६ पाणी पुरवठा योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी ई-भूमिपूजन करण्यात आले. मोहाडी तालुक्यातील करडी व तुमसर तालुक्यातील येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनास पाणीपुरवठा मंत्र्यांनी मंजुरी प्रदान केली. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एम.बी. मैदमवार, माजी सभापती नरेश डहारे आणि विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. या कार्यक्रमात व्हीडीओ कॉन्फरन्सीच्याद्वारे मुख्यमंत्र्यांनी कांद्री येथील सरपंचासोबत थेट संपर्क साधला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार नागपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांनी कांद्री हे गाव आयएसओ असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. कांद्री गावाला पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. या योजनेमुळे गावकऱ्यांना पाणी मिळणार असून हे आपल्यामुळेच घडणार असल्याचे शालूताई मडावी यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासह गावकºयांचे अभिनंदन केले.खासदारांनी केली आरओ प्लांटची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे संवाद साधताना खासदार मधुकर कुकडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आरो प्लांटची मागणी केली. भंडारा शहराला अशुद्ध पाणीपुरवठा होतो. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आरओ प्लांट देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालयांना शुद्ध पाणी पुरवठा व आरओ प्लांटबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.