शहरं
Join us  
Trending Stories
1
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
2
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
3
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
4
हे कसले डॉक्टर? जीवाशी खेळ; सर्दीच्या रुग्णांना कॅन्सरची आणि गर्भवती महिलांना वंध्यत्वाची औषधं
5
Viral Video : दुकानदाराच्या डोळ्यांदेखत चोराने मोबाईल उचलून नेला अन् कुणाला कळलंही नाही! व्हिडीओ बघाच 
6
जितेंद्र आव्हाड यांच्याविरोधात गुन्हा दाखल, मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला गुन्हा
7
१,२,३...२४ तासांत तीन मिसाईल टेस्ट! भारताची ऑपरेशन सिंदूरनंतर मोठी कामगिरी, लडाखमध्ये एक...
8
विश्वासघातकी चीन! भारताचं करायचंय २.७५ लाख कोटींचं नुकसान; ड्रॅगनची एक चाल, सरकार काय करणार?
9
Video: आव्हाड-दानवे बोलत होते, रिपोर्टर रेकॉर्डिंग करत होता... आव्हाडांना राग आला... हात उचलला! बघा, काय घडलं!
10
Rohit Pawar: "आवाज खाली करा, बोलता येत नसेल तर..."; रोहित पवारांनी पोलीस अधिकाऱ्याला झापलं!
11
विधानभवनातील वाद अन् गोपीचंद पडळकरांचं गाणं चर्चेत; तुम्ही पाहिलं का?
12
तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?
13
'लॅन्ड फॉर जॉब' घोटाळ्यात लालू यादव यांना मोठा धक्का! पण 'या' प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा
14
हिंदू रक्षा दलाचे कार्यकर्ते केएफसीमध्ये घुसले, रेस्टॉरंटला ठोकले टाळे; म्हणाले, "श्रावणामध्ये नॉन व्हेज..."
15
सात तरुण, २३ मोबाईल, दुबईहून सुरू होता भयंकर खेळ, पाहून पोलिसही अवाक्
16
'...तेव्हा राज ठाकरे-उद्धव ठाकरेंना लोक आपटून आपटून मारतील'; भाजप खासदार निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
17
लेकीच्या जन्मानंतर दुसऱ्याच दिवशी गमावला दीड वर्षांचा मुलगा; कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर
18
प्रेग्नंट पत्नीसोबत असा रोमँटिक झाला राजकुमार राव; स्विमिंग पूलमध्येच केलं लिपलॉक; बघा PHOTO
19
विजेचा झटका दिला, गर्भपात करायला लावला; एका 'थार'साठी नवऱ्याने मनीषासोबत काय काय केलं? झाला मोठा खुलासा
20
पोस्ट ऑफिसच्या स्कीम्समध्ये महिलांना पुरुषांपेक्षा अधिक व्याज मिळतं का? चेक करा डिटेल्स

मुख्यमंत्र्यांचा सरपंचांसोबत संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 5, 2019 21:32 IST

राज्याच्या प्रथम नागरिकाने थेट गावच्या प्रथम नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा योजनेबाबत सूचना दिल्या. निमित्त होते जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन सोहळ्याचे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांना मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा मान मिळाला.

ठळक मुद्देव्हिडीओ कॉन्फरन्स : १६ पाणीपुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्याच्या प्रथम नागरिकाने थेट गावच्या प्रथम नागरिकांशी संवाद साधून पाणीपुरवठा योजनेबाबत सूचना दिल्या. निमित्त होते जिल्ह्यातील १६ पाणी पुरवठा योजनेचे ई-भूमिपूजन सोहळ्याचे. मोहाडी तालुक्यातील कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांना मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधण्याचा मान मिळाला.ग्रामीण पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सात कोटी २५ लाख ३६ हजार रुपये खर्चाच्या १६ पाणी पुरवठा योजनेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शनिवारी ई-भूमिपूजन करण्यात आले. मोहाडी तालुक्यातील करडी व तुमसर तालुक्यातील येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेच्या पुनरुज्जीवनास पाणीपुरवठा मंत्र्यांनी मंजुरी प्रदान केली. जिल्हाधिकारी कार्यालयात खासदार मधुकर कुकडे, आमदार चरण वाघमारे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र जगताप, ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे कार्यकारी अभियंता एम.बी. मैदमवार, माजी सभापती नरेश डहारे आणि विविध गावांचे सरपंच उपस्थित होते. या कार्यक्रमात व्हीडीओ कॉन्फरन्सीच्याद्वारे मुख्यमंत्र्यांनी कांद्री येथील सरपंचासोबत थेट संपर्क साधला. यावेळी पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पाणीपुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव शामलाल गोयल, विभागीय आयुक्त डॉ.संजीवकुमार नागपूर येथील कार्यक्रमाला उपस्थित होते.यावेळी कांद्री येथील सरपंच शालूताई मडावी यांनी कांद्री हे गाव आयएसओ असल्याचे मुख्यमंत्र्यांना सांगितले. कांद्री गावाला पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. या योजनेमुळे गावकऱ्यांना पाणी मिळणार असून हे आपल्यामुळेच घडणार असल्याचे शालूताई मडावी यांनी सांगितले. यावर मुख्यमंत्र्यांनी त्यांच्यासह गावकºयांचे अभिनंदन केले.खासदारांनी केली आरओ प्लांटची मागणीजिल्हाधिकारी कार्यालयातून व्हीडीओ कॉन्फरन्सीद्वारे संवाद साधताना खासदार मधुकर कुकडे यांनी मुख्यमंत्र्यांकडे आरो प्लांटची मागणी केली. भंडारा शहराला अशुद्ध पाणीपुरवठा होतो. तसेच जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाण्याची गुणवत्ता ढासळलेली आहे. त्यामुळे शुद्ध पाणी पुरवठा करण्यासाठी आरओ प्लांट देण्याची मागणी केली. यावर मुख्यमंत्र्यांनी ग्रामीण रुग्णालयांना शुद्ध पाणी पुरवठा व आरओ प्लांटबाबत कारवाई करण्याचे आश्वासन दिले.