भंडारा: नगर पालिकेकडून मागील आठवडाभरापासून सुरू असलेली अतिक्रमण हटाव मोहिम बुधवारी खांबतलाव चौकात पोहोचली. जेसीबीच्या सहाय्याने येथील अतिक्रमण पुर्णपणे साफ करण्यात आले. आता हा चौक मोकळा श्वास घेऊ लागला आहे.अतिक्र मणामुळे शहराची अवस्था बकाल झाली आहे. वाढत्या अतिक्र मणामुळे नागरिकांना रस्त्याने धड चालतासुद्धा येत नव्हते. त्यामुळे नगर पालिकेने मागील आठवडाभरापासून अतिक्रमण हटाव मोहिम हाती घेतली. या मोहिमेला नागरिकांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. गांधी चौक, पोष्ट आॅफीस चौक व अन्य भागातील अतिक्र मण काढल्यानंतर बुधवारी अतिक्र मण निर्मुलन पथक गजबजलेल्या खांबतलाव चौकात पोहोचले. या चौकाच्या सभोवताल असलेले अतिक्र मण पूर्णपणे काढण्यात आले.खांबतलाव चौक हा गजबजलेला परिसर असून याठिकाणी मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ असते. निमुळता रस्ता असल्यामुळे याठिकाणी यापुर्वी अपघातात अनेकांचा बळी गेला आहे. त्यामुळे या चौकाचे विस्तारीकरण होणे आवश्यक आहे. बुधवारी अतिक्र मण निर्मुलन पथकाने या चौकातील अतिक्र मण काढल्याने हा चौक मोकळा झाला आहे. आता याठिकाणी पुन्हा अतिक्र मण होऊ नये, याची खबरदारी पालिकेने घ्यावी, असा आशावाद नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे. मोहिमेच्या प्रारंभापासूनच शहरवासीयांनी पालिकेला सहकार्य केल्याचे दिसून आले. बहुतांश नागरिकांनी स्वत:च आपले अतिक्रमण काढून पालिकेला सहकार्य केले असल्याचे दिसले.ही कारवाई पालिकेचे अतिक्र मण निर्मुलन पथकाचे प्रमुख आनंद मिश्रा यांच्या नेतृत्वात किशोर उपरीकर, पवन मोगरे, मुनीश मोगरे, दिनेश भवसागर यांनी पार पाडली. (नगर प्रतिनिधी)
खांबतलाव चौकाने घेतला मोकळा श्वास
By admin | Updated: January 28, 2015 23:09 IST