शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

५५ दिवसात संपूर्ण धान खरेदीचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 05:06 IST

जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या १०६ आधारभूत केंद्रावर धान खरेदी केली जात आहे. मात्र गत महिनाभरापासून ...

जिल्ह्यात १ नोव्हेंबरपासून धान खरेदीला प्रारंभ झाला. सध्या १०६ आधारभूत केंद्रावर धान खरेदी केली जात आहे. मात्र गत महिनाभरापासून धान खरेदीची गती मंदावली आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे गोदाम धानाने हाऊसफुल्ल झाले आहे. काही केंद्रावर तर उघड्यावर धान खरेदी केली जात आहे. दुसरीकडे मिलर्सनी अद्यापही भरडाईसाठी धान उचला नाही. भरडाईच्या दरात वाढ करावी, अशी मागणी मिलर्स करीत आहे. त्यासाठीच त्यांनी असहकार आंदोलन पुकारले आहे. विशेष म्हणजे जिल्ह्यातील २०३ मिलर्सनी पणन महासंघासोबत भरडाईसाठी करार केला आहे. ८० हजार क्विंटलचे डीओ तयार आहे. परंतु भरडाईसाठी कुणीही धान उचलायला तयार नाही.

गोदाम रिकामे झाल्याशिवाय नवीन धान खरेदी करताना अडचणी येत आहे. जिल्ह्यातील गोदामांची क्षमता आठ लाख क्विंटलची आहे. तब्बल दहा लाख क्विंटलपेक्षा अधिक धान आजही उघड्यावर आहे. काही दिवसात संपूर्ण धान खरेदी ठप्प होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत पणन महासंघ ३१ मार्चपर्यंत धान खरेदी करणार आहे. पर्यायाने केवळ ५५ दिवस शेतकऱ्यांजवळ धान विक्रीसाठी उरले आहेत. या ५५ दिवसात धान विकताना शेतकऱ्यांची मोठी दमछाक होणार आहे. सुरूवातीपासूनच धान विक्रीसाठी शेतकऱ्यांना मोठी प्रतीक्षा करावी लागते. आता तर मिलर्सच्या असहकार आंदोलनाने संपूर्ण खरेदी प्रभावित होण्याची शक्यता आहे.

गतवर्षी ३२ लाख क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली होती. यावर्षी त्यापेक्षा अधिक धान खरेदी होण्याची शक्यता आहे. मात्र नियोजित कालावधीत धान खरेदी होणार की नाही हा प्रश्न आहे. पणन महासंघाने आधारभूत केंद्रावर धान खरेदी केला नाही तर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या दारात जाण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

बॉक्स

मिलर्स आपल्या मागण्यांवर ठाम

इतर राज्याप्रमाणे महाराष्ट्रातही धान भरडाईचे दर द्यावे या मागणीसाठी जिल्ह्यातील राईस मिल असोसिएशनने असहकार आंदोलन पुकारले आहे. भंडारा जिल्हा राईस मिलर्स संघर्ष समितीची स्थापना करून त्यांनी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले आहे. तीन वर्षातील कामाचा आढावा घेऊन मिलर्सना नियतन देण्यात यावे, भरडाईचे दर वाढून द्यावे आणि शासनाकडे तीन वर्षापासून थकीत असलेले भरडाईचे पैसेही द्यावे, अशा मागण्या आहेत. आतापर्यंत याबाबत वरिष्ठ स्तरावर चर्चा झाली. परंतु अद्यापतरी तोडगा निघाला नाही.