शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
4
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
5
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
6
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
7
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
8
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
9
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
10
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
11
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
12
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
13
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
14
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
15
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
16
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
17
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
18
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
19
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
20
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'

केंद्राचा निधी रखडला; बांधकाम अर्ध्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:21 IST

सालेकसा : नगर पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गावांतील नागरिकांना घरकुल मिळाल्याने ते आनंदी होते. उधार-उसनवार करून त्यांनी साहित्य आणले, ...

सालेकसा : नगर पंचायतीच्या हद्दीत येणाऱ्या गावांतील नागरिकांना घरकुल मिळाल्याने ते आनंदी होते. उधार-उसनवार करून त्यांनी साहित्य आणले, बांधकाम केले. राज्य शासनाने आपला हिस्सा लाभार्थींच्या खात्यात टाकला. मात्र केंद्र शासनानेच पैसे दिले नाही. त्यामुळे आता लाभार्थी संतापले आहेत. सावकारांकडून पैसे आणून बांधकाम केले. आता ते सावकार पैशांकरिता तगादा लावत असल्याने लाभार्थींची आर्थिक कोंडी झाली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२१पर्यंत सर्वांना हक्काचे घर बांधून देण्याची योजना आखली. या योजनेंतर्गत राज्य आणि केंद्राच्या हिस्स्यातून निधी देण्यात येतो. ज्या लाभार्थींची नावे घरकुल बांधकामाच्या यादीत मंजूर झाली, त्या लाभार्थींमध्ये आनंदाचे वातावरण होते. आज ना उद्या निधी येईल या आशेने त्यांनी आपले राहते घर तोडून बांधकाम सुरू केले. उधार-उसनवारी करून साहित्य आणले. राज्य शासनाने आपला हिस्सा लाभार्थींच्या खात्यावर टाकला. मात्र केंद्र शासनाने अद्यापही पैसा दिला नाही. त्यामुळे अनेकांचे घरकुल अपूर्ण पडले आहेत. कित्येकांचे बांधकाम पूर्ण झाले असून, त्यांच्याकडे दुकानदार आणि सावकार पैशांकरिता तगादा लावत आहेत. सालेकसा नगर पंचायतीच्या हद्दीत असणाऱ्या आमगाव खुर्द, हलबीटोला, जांभळी, सालेकसा आणि बाकलसर्रा येथील ४०२ लाभार्थी अद्यापही केंद्र शासनाकडून येणाऱ्या दीड लाख रुपयांच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या लाभार्थींना घरकुल मंजूर झाले, त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची असून, उधारी कशी फेडायची, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे. आपल्या खात्यात पैसे जमा झाले काय, याची खातरजमा करण्याकरिता लाभार्थी दररोज नगर पंचायतीत जाऊन विचारणा करीत आहेत. मात्र गेल्या वर्षभरापासून पैसेच आले नाही, हेच उत्तर त्यांच्या कानावर पडत आहे. यासंदर्भात नगर पंचायतीचे अध्यक्ष वीरेंद्र उईके यांच्याशी संपर्क केला असता लवकरच निधी प्राप्त होणार असल्याचे सांगितले.

उघड्यावर राहण्याची वेळ

घरकुल मंजूर होण्यापूर्वी लाभार्थींकडे झोपडीवजा घर होते. घरकुल मंजूर झाल्याने त्यांनी आपल्याला पक्के घर मिळेल, या आशेने आपले घर पाडून त्याठिकाणी बांधकाम सुरू केले. मात्र वर्ष लोटूनदेखील निधी आला नसल्याने घरकुलाचे बांधकाम रखडले आहे. त्यामुळे डोक्यावरचे छतही गेले असून, उन्हाळ्यात त्यांना बांधकामाच्या बाजूला ताणलेल्या तंबूमध्येच आसरा घेण्याची वेळ आली आहे.