शहरं
Join us  
Trending Stories
1
Shrivardhan Nagar Parishad Election Result 2025: रायगडमध्ये मोठा ट्विस्ट! श्रीवर्धनमधील ठाकरे गटाचा विजयी नगराध्यक्ष शिंदेसेनेत प्रवेश करणार?
2
Sangamner Nagar Parishad Election Result 2025: संगमनेरमध्ये पुन्हा 'तांबे-थोरात' पॅटर्न; डॉ. मैथिली तांबे महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने विजयी
3
Khed Nagar Parishad Election Result 2025: “कोकणातील विजय हा मुंबई मनपा विजयाची नांदी”; एकनाथ शिंदे यांच्या शिलेदाराचे मोठे भाकित
4
एका आठवड्यात चांदी १६ हजारांनी महागली; वर्षात दिला १२६% परतावा, सोन्याची काय स्थिती?
5
Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी
6
IND vs PAK U19 Asia Cup: कोण आहे Sameer Minhas? ज्यानं दोन वेळा मोडला वैभव सूर्यवंशीचा रेकॉर्ड
7
सावधान! तुमचं बँक खातंही होऊ शकतं रिकामं! आधार कार्ड सुरक्षित ठेवण्यासाठी करा 'बायोमॅट्रिक लॉक'
8
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
9
Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव
10
'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: राज्यात शिवसेनेची जोरदार फाईट, भाजपाही मजबूत; उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला किती जागा? जाणून घ्या
12
भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 
13
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
14
Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...
15
Shahada Nagar Parishad Election Results 2025: २९ पैकी २० जागा भाजपाने जिंकल्या, पण नगराध्यक्षद जनता विकास आघाडीकडे
16
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
17
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
18
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
19
शूटिंग करताना अक्षय खन्नाला 'या' गोष्टीचा होतो त्रास, 'धुरंधर' अभिनेता म्हणाला- "रात्रीच्या वेळी मला..."
Daily Top 2Weekly Top 5

किमान पात्रतेच्या अध्यादेशामुळे उमेदवारांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST

राहुल भुतांगे तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावरच राज्य सरकार नवनवे निर्णय घेत आहे. थेट सरपंच निवड रद्द केल्यानंतर, सरपंचपदाचे ...

राहुल भुतांगे

तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावरच राज्य सरकार नवनवे निर्णय घेत आहे. थेट सरपंच निवड रद्द केल्यानंतर, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता सरपंचपदाचा उमेदवार किमान सातवी पास असावा, असा नवा अध्यादेश काढण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्व तांत्रिक कामे ही इंग्रजीमध्येच असल्याने त्या किमान पात्रतेचा सरपंचाला कितपत फायदा होणार आहे, हे अजूनही अनुत्तरित आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. गावपातळीवर आपल्या गटाकडे सत्ता आली पाहिजे; म्हणजे पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये मताधिक्य मिळविण्यासाठी सोयीचे होते. यासाठी पुढारी मंडळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अधिक सक्रिय दिसून येत आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात एकाच वेळी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान, तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. २०२०-२१ च्या निवडणुकीत महत्त्वाचे बदल राज्य शासनातर्फे करण्यात आले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काळातील थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करीत, सदस्यांतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. तसेच यावेळी सरपंच आरक्षण सोडत ही निवडणुकीपूर्वी न होता, ती निवडणुकीनंतर होणार आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाचा नवा आदेश समोर आला आहे. या निवडणुकीमध्ये सदस्य आणि सरपंच उमेदवाराबाबतचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने २४ डिसेंबरला अध्यादेश जारी केला आहे. यामध्ये निवडणूक अर्ज भरताना अर्जदार २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा, उमेदवाराचे नाव मतदार यादीत असावे, १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असेल आणि ज्यांना कोणत्याही कायद्याने बाद ठरवले नसेल, त्यांना सातवी पास असल्याशिवाय सरपंच म्हणून निवडून दिले जाऊ शकणार नाही. परंतु ही किमान पात्रता त्या पदास सयुक्तिक असेल असे दिसून येत नाही; कारण ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे सर्व इस्टिमेट, आदी सर्व कागदपत्रे ही इंग्रजी भाषेत आहेत. त्याचबरोबर आता ग्रामपंचायतीचे डिजिटलायझेशन झाले असल्याने ग्रामपंचायतीची अत्याधिक कामे इंग्रजीमध्येच होतात. परिणामी सरपंचाला ज्या ठिकाणी सचिव सही करायला लावतात तिथे सरपंच सही करून मोकळे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाने निवडणुकीच्या नव्या धोरणात्मक निर्णयाची लांबच लांब शेपूट लावण्याची गरज नसून, अध्यादेशावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यासाठी अर्ज भरणेही सुरू असले तरी सरपंच आरक्षण सोडतीपासून ते अर्ज भरण्यापर्यंत गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. यातच नव्या अध्यादेशामुळे आखणी भर पडली असल्याने अनेकांची धावपळ झाली आहे.

- गौरीशंकर मोटघरे

जिल्हा महासचिव, काँग्रेस, भंडारा