शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
2
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
3
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
4
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
5
'सद्दाम हुसेनसारखी अवस्था...', इस्रायलचा इराणचे प्रमुख अयातुल्ला अली खमेनी यांना थेट इशारा
6
"भाजपावाले आता दाऊद इब्राहिमलाही पक्षात प्रवेश देणार का?"; काँग्रेसचा खोचक सवाल
7
"तो मरेल, जनरेटर चालू करा..."; डायलेसिस करताना लाईट गेली, आईसमोर लेकाचा तडफडून मृत्यू
8
“काँग्रेसकडे प्रेरणादायक काही नाही; नेतृत्वहीन, नात्यागोत्याचा पक्ष झाला”: अशोक चव्हाण
9
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
10
राजा रघुवंशीला मारण्यासाठी एक नव्हे दोन शस्त्र वापरली, सोनमसमोर केले वार! मोठा खुलासा
11
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
12
Mumbai: मुंबईत १५० स्कूल बसवर कारवाईचा बडगा, नियम काय सांगतात?
13
पहिल्या कसोटी आधी 'विराट' प्लॅनिंग; किंग कोहलीच्या दरबारात जमली होती टीम इंडियातील मंडळी?
14
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
15
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
16
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
17
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
18
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
19
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
20
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"

किमान पात्रतेच्या अध्यादेशामुळे उमेदवारांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST

राहुल भुतांगे तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावरच राज्य सरकार नवनवे निर्णय घेत आहे. थेट सरपंच निवड रद्द केल्यानंतर, सरपंचपदाचे ...

राहुल भुतांगे

तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावरच राज्य सरकार नवनवे निर्णय घेत आहे. थेट सरपंच निवड रद्द केल्यानंतर, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता सरपंचपदाचा उमेदवार किमान सातवी पास असावा, असा नवा अध्यादेश काढण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्व तांत्रिक कामे ही इंग्रजीमध्येच असल्याने त्या किमान पात्रतेचा सरपंचाला कितपत फायदा होणार आहे, हे अजूनही अनुत्तरित आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. गावपातळीवर आपल्या गटाकडे सत्ता आली पाहिजे; म्हणजे पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये मताधिक्य मिळविण्यासाठी सोयीचे होते. यासाठी पुढारी मंडळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अधिक सक्रिय दिसून येत आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात एकाच वेळी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान, तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. २०२०-२१ च्या निवडणुकीत महत्त्वाचे बदल राज्य शासनातर्फे करण्यात आले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काळातील थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करीत, सदस्यांतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. तसेच यावेळी सरपंच आरक्षण सोडत ही निवडणुकीपूर्वी न होता, ती निवडणुकीनंतर होणार आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाचा नवा आदेश समोर आला आहे. या निवडणुकीमध्ये सदस्य आणि सरपंच उमेदवाराबाबतचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने २४ डिसेंबरला अध्यादेश जारी केला आहे. यामध्ये निवडणूक अर्ज भरताना अर्जदार २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा, उमेदवाराचे नाव मतदार यादीत असावे, १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असेल आणि ज्यांना कोणत्याही कायद्याने बाद ठरवले नसेल, त्यांना सातवी पास असल्याशिवाय सरपंच म्हणून निवडून दिले जाऊ शकणार नाही. परंतु ही किमान पात्रता त्या पदास सयुक्तिक असेल असे दिसून येत नाही; कारण ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे सर्व इस्टिमेट, आदी सर्व कागदपत्रे ही इंग्रजी भाषेत आहेत. त्याचबरोबर आता ग्रामपंचायतीचे डिजिटलायझेशन झाले असल्याने ग्रामपंचायतीची अत्याधिक कामे इंग्रजीमध्येच होतात. परिणामी सरपंचाला ज्या ठिकाणी सचिव सही करायला लावतात तिथे सरपंच सही करून मोकळे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाने निवडणुकीच्या नव्या धोरणात्मक निर्णयाची लांबच लांब शेपूट लावण्याची गरज नसून, अध्यादेशावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यासाठी अर्ज भरणेही सुरू असले तरी सरपंच आरक्षण सोडतीपासून ते अर्ज भरण्यापर्यंत गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. यातच नव्या अध्यादेशामुळे आखणी भर पडली असल्याने अनेकांची धावपळ झाली आहे.

- गौरीशंकर मोटघरे

जिल्हा महासचिव, काँग्रेस, भंडारा