शहरं
Join us  
Trending Stories
1
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
2
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
5
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
6
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
7
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
8
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
9
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
10
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
11
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
12
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
13
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
14
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
15
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
16
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
17
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
18
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
19
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
20
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
Daily Top 2Weekly Top 5

किमान पात्रतेच्या अध्यादेशामुळे उमेदवारांची धावपळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 1, 2021 04:24 IST

राहुल भुतांगे तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावरच राज्य सरकार नवनवे निर्णय घेत आहे. थेट सरपंच निवड रद्द केल्यानंतर, सरपंचपदाचे ...

राहुल भुतांगे

तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीच्या तोंडावरच राज्य सरकार नवनवे निर्णय घेत आहे. थेट सरपंच निवड रद्द केल्यानंतर, सरपंचपदाचे आरक्षण निवडणुकीनंतर काढण्याचा निर्णय घेतल्यानंतर, आता सरपंचपदाचा उमेदवार किमान सातवी पास असावा, असा नवा अध्यादेश काढण्यात आला आहे. ग्रामपंचायतीमध्ये सर्व तांत्रिक कामे ही इंग्रजीमध्येच असल्याने त्या किमान पात्रतेचा सरपंचाला कितपत फायदा होणार आहे, हे अजूनही अनुत्तरित आहे.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला राजकीयदृष्ट्या वेगळे महत्त्व आहे. गावपातळीवर आपल्या गटाकडे सत्ता आली पाहिजे; म्हणजे पुढच्या सर्व निवडणुकांमध्ये मताधिक्य मिळविण्यासाठी सोयीचे होते. यासाठी पुढारी मंडळी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत अधिक सक्रिय दिसून येत आहेत.

राज्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्यात आले आहे. संपूर्ण राज्यात एकाच वेळी १५ जानेवारी २०२१ रोजी मतदान, तर १८ जानेवारी २०२१ रोजी मतमोजणी होणार आहे. २०२०-२१ च्या निवडणुकीत महत्त्वाचे बदल राज्य शासनातर्फे करण्यात आले आहेत.

महाविकास आघाडी सरकारने भाजपच्या काळातील थेट सरपंच निवडीचा निर्णय रद्द करीत, सदस्यांतून सरपंच निवडीचा निर्णय घेतला. तसेच यावेळी सरपंच आरक्षण सोडत ही निवडणुकीपूर्वी न होता, ती निवडणुकीनंतर होणार आहे. त्यातच राज्य निवडणूक आयोगाचा नवा आदेश समोर आला आहे. या निवडणुकीमध्ये सदस्य आणि सरपंच उमेदवाराबाबतचे निकष स्पष्ट करण्यात आले आहेत. निवडणूक आयोगाने २४ डिसेंबरला अध्यादेश जारी केला आहे. यामध्ये निवडणूक अर्ज भरताना अर्जदार २१ वर्षांपेक्षा कमी वयाचा नसावा, उमेदवाराचे नाव मतदार यादीत असावे, १९९५ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेला असेल आणि ज्यांना कोणत्याही कायद्याने बाद ठरवले नसेल, त्यांना सातवी पास असल्याशिवाय सरपंच म्हणून निवडून दिले जाऊ शकणार नाही. परंतु ही किमान पात्रता त्या पदास सयुक्तिक असेल असे दिसून येत नाही; कारण ग्रामपंचायतीच्या विकासकामांचे सर्व इस्टिमेट, आदी सर्व कागदपत्रे ही इंग्रजी भाषेत आहेत. त्याचबरोबर आता ग्रामपंचायतीचे डिजिटलायझेशन झाले असल्याने ग्रामपंचायतीची अत्याधिक कामे इंग्रजीमध्येच होतात. परिणामी सरपंचाला ज्या ठिकाणी सचिव सही करायला लावतात तिथे सरपंच सही करून मोकळे होत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे शासनाने निवडणुकीच्या नव्या धोरणात्मक निर्णयाची लांबच लांब शेपूट लावण्याची गरज नसून, अध्यादेशावर पुनर्विचार करण्याची गरज आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. त्यासाठी अर्ज भरणेही सुरू असले तरी सरपंच आरक्षण सोडतीपासून ते अर्ज भरण्यापर्यंत गोंधळ सुरू असल्याचे दिसत आहे. यातच नव्या अध्यादेशामुळे आखणी भर पडली असल्याने अनेकांची धावपळ झाली आहे.

- गौरीशंकर मोटघरे

जिल्हा महासचिव, काँग्रेस, भंडारा