शहरं
Join us  
Trending Stories
1
'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" (Video)
2
IND vs WI: भारताचा कसोटी संघ जाहीर! पडीक्कलला संधी; श्रेयस अय्यर, करूण नायरला वगळले
3
'शेतकऱ्यांना मदतीसाठी पंचांग पाहणार का?'; उद्धव ठाकरेंचा सरकारला थेट सवाल
4
समोर मृत्यू आला पण त्यांनी संघर्ष निवडला; गुराख्याने परतवला वाघ आणि बछड्यांचा हल्ला
5
पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्या मैत्रीवरून सोनिया गांधींनी उपस्थित केला सवाल, म्हणाल्या...
6
AI बिनधास्त वापरा, पण त्याआधी 'या' गोष्टी लक्षात ठेवा! नाहीतर स्वतःच अडचणीत सापडाल
7
५ राशींवर दुर्गा देवीची कायम लक्ष असते, लाभते विशेष कृपा; हाती राहतो पैसा, शुभ-कल्याण-भरभराट!
8
कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला
9
सेन्सेक्सलाही टाकले मागे! सरकारी कंपनीचा शेअर महिन्यात ४०% नी वधारला; तेजीचे कारण काय?
10
लेक राहासाठीही आहे वेगळी व्हॅनिटी व्हॅन, आलियाचा प्रश्न ऐकून महेश भटही झाले शॉक
11
भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट
12
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार हवा, पण अर्धी अमेरिकाच नाखूश! सर्वेक्षणात झाला धक्कादायक खुलासा 
13
IND vs PAK: 'इतका राग होता तर खेळलाच कशाला?' हस्तांदोलन न करण्यावर शशी थरूर संतापले!
14
शेतकऱ्यांना त्यांच्या पिकांना योग्य भाव का मिळत नाही? नितीन गडकरी यांनी कारण सांगितले
15
वाढीव मदतीचा प्रस्ताव कॅबिनेटसमोर मांडू; मंत्री मकरंद पाटील यांचे शेतकऱ्यांना आश्वासन
16
भाजपाच्या अध्यक्षपदासाठी नाव आघाडीवर, कशी असेल पुढची वाटचाल? फडणवीस यांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
17
भगवा कुर्ता, कपाळी भस्म; संजय दत्तने घेतलं महाकालेश्वरचं दर्शन, भक्तीत तल्लीन झाला अभिनेता
18
'रशियाचे लष्कर कागदी वाघासारखेच'; डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना डिवचले, रशियानेही केला पलटवार
19
कारगिल युद्धावेळीही आपण पाकिस्तानसोबत..., हस्तांदोलन वादावरून शशी थरूर यांनी दिला टीम इंडियाला सल्ला

शिक्षक बदली प्रक्रिया रद्द करावी

By admin | Updated: June 18, 2017 00:26 IST

राज्यात शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याने ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षक कृती समितीचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याने अनेकांवर ती अन्यायकारक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी शिक्षक कृती समिती भंडाराच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी सर्वसाधारण शिक्षक बदलीसाठी घेतलेला शासनाने निर्णय स्थगीत करावा यासह अनेक मागण्यांचा यात समावेश आहे. मागण्यांमध्ये शिक्षकांचे पगार १ तारेखेला करावे, २००५ नंतर लागलेल्या प्राथमिक शिक्षकांना पेंशन लागू करावी, पदस्थापना देण्यात आलेल्या सर्व पदविधर विषय शिक्षकांना वेतनश्रेणी, ग्रेड वेतन लागू करावे, जिल्ह्यातील सर्व शाळांना संगणकीकृत करून नेट जोडणी करावी, जि.प. शाळांचे विद्युत बिल शासनाने भरावे, केंद्राची पुनर्रचना करून केंद्र प्रमुखांची पदे प्राथमिक विषय शिक्षकांमधून भरावे, चार टक्के सादील खर्चाची रक्कम शाळांच्या खात्यावर जमा करावी, विद्यार्थ्यांना गणवेशाकरिता ५०० रूपये द्यावे, मुलींचा उपस्थिती भत्ता १० रूपये करावा, शालेय पोषण आहार शिजविणाऱ्यांचे मानधन पाच हजार रूपये करावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्यावेळी कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, केशव बुरडे, महेश गावंडे, प्रमोद घमे, संदीप वडीले, किशोर ईश्वरकर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, मुकूंद ठवकर आदींचा समावेश होता.