शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

शिक्षक बदली प्रक्रिया रद्द करावी

By admin | Updated: June 18, 2017 00:26 IST

राज्यात शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याने ...

जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : शिक्षक कृती समितीचा पुढाकारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्यात शिक्षक बदली प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या बदली प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाली असल्याने अनेकांवर ती अन्यायकारक आहे. त्यामुळे ही प्रक्रिया राबविण्यासाठी शासनाने घेतलेला निर्णय रद्द करावा, अशी मागणी शिक्षक कृती समिती भंडाराच्या वतीने करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे निवेदन पाठविण्यात आले आहे. या निवेदनात त्यांनी सर्वसाधारण शिक्षक बदलीसाठी घेतलेला शासनाने निर्णय स्थगीत करावा यासह अनेक मागण्यांचा यात समावेश आहे. मागण्यांमध्ये शिक्षकांचे पगार १ तारेखेला करावे, २००५ नंतर लागलेल्या प्राथमिक शिक्षकांना पेंशन लागू करावी, पदस्थापना देण्यात आलेल्या सर्व पदविधर विषय शिक्षकांना वेतनश्रेणी, ग्रेड वेतन लागू करावे, जिल्ह्यातील सर्व शाळांना संगणकीकृत करून नेट जोडणी करावी, जि.प. शाळांचे विद्युत बिल शासनाने भरावे, केंद्राची पुनर्रचना करून केंद्र प्रमुखांची पदे प्राथमिक विषय शिक्षकांमधून भरावे, चार टक्के सादील खर्चाची रक्कम शाळांच्या खात्यावर जमा करावी, विद्यार्थ्यांना गणवेशाकरिता ५०० रूपये द्यावे, मुलींचा उपस्थिती भत्ता १० रूपये करावा, शालेय पोषण आहार शिजविणाऱ्यांचे मानधन पाच हजार रूपये करावे यासह अन्य मागण्यांचा समावेश आहे.जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्यावेळी कृती समितीचे रमेश सिंगनजुडे, धनंजय बिरणवार, ईश्वर नाकाडे, केशव बुरडे, महेश गावंडे, प्रमोद घमे, संदीप वडीले, किशोर ईश्वरकर, हरिकिसन अंबादे, रमेश पारधीकर, मुकूंद ठवकर आदींचा समावेश होता.