शहरं
Join us  
Trending Stories
1
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
2
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
5
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
6
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
7
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
8
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
9
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
10
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
13
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
14
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
15
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला
16
अणुबॉम्बसारखा स्फोट! भर समुद्रात ज्वालामुखी उद्रेक; जीव वाचवण्यासाठी पर्यटकांची धावाधाव...
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
हैदराबाद गॅजेट टिकवणे सरकारची जबाबदारी, अन्यथा सरकारला सुट्टी नाही; मनोज जरांगेंचा इशारा
19
बिंग फुटले, आता चौकशी करतायत...! युक्रेनने भारताकडून आयात करत असलेले डिझेल रोखले 
20
आरारारा खतरनाक! 'या' देशात भाडे तत्वावर मिळतो बॉयफ्रेंड; मोजावे लागतात 'इतके' पैसे

प्रकल्पबाधित क्षेत्रातील जाचक अटी रद्द होणार

By admin | Updated: March 18, 2016 00:34 IST

राज्यात अनेक ठिकाणी मोठमोठी सिंचन प्रकल्प बांधण्यात आली तर काहीचे काम सुरू आहे.

काशीवार यांची विधानसभेत मागणी : लवकरच परिपत्रक काढण्याचे आश्वासनसंजय साठवणे साकोलीराज्यात अनेक ठिकाणी मोठमोठी सिंचन प्रकल्प बांधण्यात आली तर काहीचे काम सुरू आहे. मात्र या परिसरातील शेतकऱ्यांना जमीन विक्रीसाठी बऱ्याच जाचक अटीचा सामना करावा लागतो. त्यामुळे शेतकरी हवालदिल होऊन शेती एजंटमार्फत विकतो. यात शेतकऱ्याचे नुकसान होते त्यामुळे प्रकल्पबाधीत क्षेत्रातील शेतीच्या विक्रीसाठी असलेल्या जाचक अटी शिथील करण्यात यावी, अशी आग्रही मागणी साकोलीचे आमदार बाळा काशीवार यांनी विधानसभेत केली. त्यानंतर महसूलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा करून त्यासंबंधीचे परिपत्रक काढण्याची मागणी केली.शेतीला सिंचनाची सोय व्हावी म्हणून राज्यात मोठमोठे सिंचनप्रकल्प बनविण्यात आले. काही ठिकाणी प्रकल्पाचे काम सुरू आहे. या सिंचन प्रकल्पाचा फायदा सिंचनासाठी होणार आहे. मात्र निसर्गाचा लहरीपणा व दिवसेंदिवस उत्पन्नात होणारी घट यामुळे शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. शेतकऱ्यांना जीवन जगताना नानाविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे अशा परिस्थितीत मुलांचे शिक्षण, मुलामुलीचे विवाह, कुटूंबातील सदस्यांचे आजारपण यासारख्या विविध कामासाठी शेती विकावी लागते. अशावेळेस प्रकल्पबाधीत क्षेत्रातील शेती विकताना ५ एकरखालील शेती विक्रीला मध्यम प्रकल्प लघु पाटबंधारे विभागाची परवानगी घ्यावी लागते. मात्र ५ एकरपेक्षा जास्त शेतीची विक्री करतानी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घ्यावी लागते. ही परवानगी घेताना अनेक जाचक अटी व नियमांची पुर्तता शेतकऱ्यांना करून घ्यावी लागते. मात्र या अटीपुर्ण करताना शेतकऱ्याची दमछाक होते. परिणामी शेतकरी शेती विकू शकत नाही, त्यामुळे त्याची नियोजित कामे होत नाहीत.या जाचक अटीमुळे शेतकरी हवालदिल होतो. शेवटी शेती विक्रीशिवाय त्याच्यासमोर पर्याय नसल्याने तो दलालाला शरण जातो. हे दलाल शेतकऱ्यांच्या जमिनीला कवडीमोल किंमत देऊन जास्तीचा पैसा आपल्या खिशात टाकतात. यामुळेही शेतकरी आर्थिक संकटात सापडत आहे. त्यामुळे प्रकल्पबाधीत परिसरातील शेतीविक्रीकरीता शासनाने लावलेल्या जाचक अटी शिथील करण्यात यावे, अशी मागणी आमदार बाळा काशीवार यांनी सभागृहात केली. यावेळी त्यांनी महसुलमंत्री एकनाथ खडसे यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी हा प्रश्न लवकरच निकाली काढू, असे आश्वासन त्यांना दिले.