शहरं
Join us  
Trending Stories
1
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
2
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
3
सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लाागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
4
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
5
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
6
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
7
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
8
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
9
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
10
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
11
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
12
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
13
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
14
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
15
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
16
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
17
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
18
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
19
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
20
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
Daily Top 2Weekly Top 5

बसेस बंद असल्याने मजुरांचा पुन्हा पायी प्रवास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:21 IST

रावणवाडी : मार्च महिन्यापासून पुन्हा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील बसेसला राज्यात प्रवेशबंदी ...

रावणवाडी : मार्च महिन्यापासून पुन्हा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने याला प्रतिबंध लावण्यासाठी मध्य प्रदेश सरकारने महाराष्ट्रातील बसेसला राज्यात प्रवेशबंदी केली आहे. त्यामुळे मुंबई, पुणे व हैद्राबाद येथे रोजगारासाठी गेलेल्या मजुरांना गोंदिया येथून बसेस बंद असल्याने पायीच प्रवास करावा लागत असल्याचे चित्र आहे.

मागील आठवडाभरापासून महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बसफेऱ्या बंद करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशची सीमा महाराष्ट्राला लागून असल्याने गोंदिया येथे रेल्वेगाड्याने येणारे मजूर पायीच मध्य प्रदेशात जात आहेत. त्यामुळेच मागील आठ दिवसांपासून जिल्ह्याच्या सीमेवरील रजेगावजवळ मोठ्या प्रमाणात पायी जाणाऱ्या मजुरांचे जत्थे दिसून येत आहेत. मध्य प्रदेशातील मजूरवर्ग मोठ्या प्रमाणात रोजगारासाठी मुंबई, पुणे, हैद्राबाद, नागपूर या शहरांमध्ये रोजगारासाठी जातात. होळी सणानिमित्त सध्या ते आपल्या गावाला जात आहेत, पण बससेवा बंद असल्याने ते पायीच आपले गाव गाठत आहेत. मागीलवर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे केलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वच वाहतूक व्यवस्था ठप्प असल्याने त्यांना पायीच आपले गाव गाठावे लागले होते. तेव्हादेखील हजारो किमीचा प्रवास करुन मजूरवर्ग आपल्या गावी परतला होता. तीच स्थिती यंदा बसेस बंद असल्याने पुन्हा निर्माण झाली आहे.

खासगी वाहनांचे दर चारपट

हावडा-मुंबई मार्गावरील गोंदिया रेल्वेस्थानक हे एक महत्त्वपूर्ण स्थानक असून या रेल्वेस्थानकावर दररोज मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्यातील मजूर परतत आहेत. मात्र, त्यांना आपल्या गावी परत जाण्यासाठी बसेसची सोय नसल्याने खासगी वाहने भाड्याने घेऊन ते गावी परतत आहेत. मात्र, या संधीचा फायदा खासगी वाहनचालक घेत त्यांच्याकडून चारपट वाहनेभाडे घेत असल्याचे चित्र आहे.

रजेगाव सीमेपर्यंत सोडण्यासाठी २०० रुपये भाडे

गोंदिया जिल्ह्याला मध्य प्रदेशाची सीमा लागून आहे. रजेगावनंतर मध्य प्रदेशची सीमा सुरू होत असल्याने तिथपर्यंत सोडून देण्यासाठी ऑटोचालक प्रवाशांकडून प्रतिव्यक्ती दोनशे रुपये भाडे घेत असल्याची माहिती आहे. त्यामुळे या प्रवाशांना भूर्दंड बसत आहे.