शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

अड्याळ येथील बसथांबा अतिक्रमणाच्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2021 04:28 IST

: येथील बसथांबा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली होती. यासाठी गावातील ग्रामस्थांनी, युवकांनी मोठी मेहनत घेऊन व ...

: येथील बसथांबा परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली होती. यासाठी गावातील ग्रामस्थांनी, युवकांनी मोठी मेहनत घेऊन व वर्गणी गोळा करून या बसथांबा परिसराचा कायापालट केला होता. प्रवाशांनी मोकळा श्वास घेतला होता, पण आज पुन्हा हा बसथांबा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडल्याने प्रवाशांचा प्रवास धोक्यात आला आहे. याकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे लक्ष जात नाही का, निष्पाप लोकांचे बळी गेल्यावर जाग येणार का, असा संतप्त सवाल ग्रामवासीय विचारत आहेत.

या परिसरातील रस्त्याच्या दुतर्फा नेहमीच गर्दी पाहायला मिळते. त्यातही महत्त्वाचे म्हणजे अड्याळ हे शिक्षणाचे मुख्य ठिकाण असल्याने येथे विद्यार्जनासाठी रोज हजारो विद्यार्थी येतात. शाळेला सुट्टी होते त्यावेळी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. कुठलेही अतिक्रमण एकावेळी होत नाही. ते हळुवार होते. हे सर्वांना माहीत असले तरी त्याचा परिणाम मात्र एखाद्याचा जीव घेतल्याशिवाय राहत नाही. ग्रामपंचायत प्रशासन असो वा पोलीस प्रशासन यांनी लक्ष केंद्रित करायचे नाही, तर मग कुणी करायचे. अड्याळ बसथांबा परिसराची सध्याची स्थिती एवढी बिकट आहे की, प्रवाशांना बसायची सोडाच, पण उभे राहायलासुद्धा परिपूर्ण जागाच मिळत नाहीत. हे जर दिसत नसेल तर मग यांना दिसते तरी काय, असाही संतप्त सवाल यावेळी उपस्थित होतो आहे.

ज्यावेळेस येथील अतिक्रमण हटवले होते तेव्हा समस्त परिसर स्वच्छ व मोकळा झाला होता, पण आज परिस्थिती आधीपेक्षा बिकट होण्यामागे जबाबदार ग्रामपंचायत प्रशासन की पोलीस प्रशासन. परिस्थिती या बसथांबा परिसराची असो वा गावातील मुख्य रस्त्यावरची वा पोलीस स्टेशन हद्दीतील अवस्था बिकट होत चालली आहे, पण याकडे आता गंभीरपणे दखल घेण्याची नितांत गरज असूनसुद्धा याकडे दुर्लक्ष का? जीव गेल्यावर सांत्वन करण्यासाठी जाण्यापेक्षा आपल्या अधिकाराचा वापर करून ग्रामस्थ असो वा प्रवाशांना त्या होणाऱ्या त्रासदायक ठिकाणाला लाभदायक बनविण्यासाठी आता कोणते प्रशासन पुढे येते, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.

बसथांबा परिसरातील दुतर्फा सध्या महामार्ग बांधकाम विभागाचे नाल्याचे बांधकाम सुरू आहे. खोदकामात निघालेली माती अनेक दिवस जिथल्या तिथं पडून राहते. यामुळेसुद्धा प्रवाशांना त्रासच त्रास सहन करावाा लागतो. एकंदरीत या ठिकाणी येणे म्हणजे जीव मुठीत घेऊनच यावे लागते. कोण कुठला वाहनचालक भरधाव वेगाने येणार आणि कधी कुणाचा अपघात होणार याचीही शाश्वती आज मात्र राहिली नाही. तरी येथील ग्रामपंचायत तथा पोलीस प्रशासन तत्काळ कोणते पाऊल उचलतात, याकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. प्रवाशांना बसायला जागा नाही आणि त्याच ठिकाणी लहान, मोठी दुचाकी चारचाकी वाहने उभी राहतात.