भंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघात मुख्य लढत दोन प्रमुख पक्षामध्ये होत आलेली असली तरी प्रत्येकच निवडणुकीत बहुजन समाज पार्टीने आपले वेगळे अस्तित्व निर्माण केले आहे. परंतु या निवडणुकीत बसपाने घेतलेली मते अत्यल्प आहेत. त्यामुळे सोशल इंजिनिअरिंगचा प्रभाव हा पक्ष दाखवू शकला नाही. २00४ मध्ये बसपाच्या उमेदवारीने राजकीय समिकरण पुर्णत: बिघडविले होते. या समीकरणात भाजपने डाव मारला. याचा फटका काँग्रेस-राकाँ आघाडीच्या उमेदवाराला बसला. मागील २0 वर्षात बसपाने आपली वोट बँक मजबूत केली. १९८४ नंतर बसपाला मिळालेल्या मतांवर नजर टाकल्यास १९८९ मध्ये बसपाला ५,६६१ मते मिळाली होती. १९९१ च्या निवडणुकीत बसपाला २,५३८ मते मिळाली. १९९८ मध्ये बसपा उमेदवाराने १0,१७३ मते घेतली होती. १९९९ मध्ये बसपाने ११,0५१ मते घेतली. २00४ मध्ये पहिल्यांदा बसपाने चांगली उंची गाठली. अजाबलाल शास्त्री यांनी ९0,६७२ मते घेऊन चौथ्या क्रमांकावर राहिले. यावेळी बसपाची मते ३२.६ टक्के ईतके वाढले. २00९ मध्ये बसपाने ६८,२४६ मते घेतली होती. २0१४ च्या निवडणुकीत बसपाचे संजय नासरे यांनी ५0,९५८ मते घेतली. मताधिक्य वाढण्याऐवजी पूर्वीच्या तुलनेत कमी झाली. याला गटबाजी कारणीभूत ठरली.
बसपाचा हत्ती चाललाच नाही
By admin | Updated: May 16, 2014 23:48 IST