शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Updates Live: मुंबईतील सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांना सुट्टी जाहीर
2
ट्रम्प यांच्यासोबतच्या बैठकीनंतर पुतिन यांना आली भारताची आठवण, डायल केला पंतप्रधान मोदींचा नंबर; सगळंच सांगितलं!
3
किरकोळ तेजीसह शेअर बाजार उघडला, 'या' स्टॉक्सनं तेजीसह केली कामकाजाला सुरुवात
4
Shocking! विवाहबाह्य संबंधातून आमिर खानला आहे एक मुलगा, भावाचा धक्कादायक खुलासा
5
१००पेक्षा जास्त लोकल रद्द, नाेकरदारांचे मेगा हाल! मुंबई विद्यापीठाने परीक्षा पुढे ढकलल्या!
6
FD-RD सर्व विसरा! हा आहे LIC चा जबरदस्त प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल 'The End'
7
रील्स बनवण्याचा नाद, घरमालकाच्या मुलाशी जवळीक, पतीची हत्या करून फरार झालेल्या पत्नीला बॉयफ्रेंडसह अटक 
8
Achyut Potdar Death: "अरे कहना क्या चाहते हो.." डायलॉगफेम ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार काळाच्या पडद्याआड
9
युद्ध थांबणार...! "खूप आनंद वाटतोय, रशियाच्या राष्ट्राध्यक्षांना फोन केला..."; झेलेन्स्की यांच्या सोबतच्या बैठकीनंतर, काय म्हणाले ट्रम्प? 
10
वाचवा म्हणत तरुणीची कारमधून उडी, पाठलाग सुरु असतानाच थारची रिक्षाला धडक, ५ जणांचा मृत्यू
11
आजचे राशीभविष्य, १९ ऑगस्ट २०२५: कुटुंबात वाद संभवतात, नोकरीतील वातावरण चिंताजनक असेल
12
शाळेला निघालेली मुलं पाेलिस ठाण्यात! माटुंगा येथे दोन स्कूल बस अडकल्या गुडघाभर पाण्यात...
13
अतिवृष्टीचा ४ लाख हेक्टरवरील पिकांना फटका; मुंबईसह कोकण, मराठवाड्यात पावसाचे धुमशान
14
मुंबई: वडाळ्यात बेस्ट बसच्या धडकेत टॅक्सीची वाट बघत उभ्या असलेल्या आई, मुलाचा मृत्यू
15
पावसाचा मंडे ‘ब्लॉक’! चाकरमानी स्टेशनावर अडकले, चार तासांत उपनगरात ७५ मि.मी. पाऊस
16
मुदतीत थकबाकी न भरल्यास संरक्षण नाहीच, भाडे न देणाऱ्याची हकालपट्टी निश्चित: सुप्रीम कोर्ट
17
माेफत शिका, तुम्हीही ‘एआय’ एक्स्पर्ट बना; केंद्राच्या स्वयम पोर्टलवर अनेक काेर्सेस उपलब्ध
18
मुंबई, ठाण्याची दैना; आठवड्याच्या पहिल्याच दिवशी दाणादाण; आज रेड अलर्ट तर उद्या यलाे अलर्ट!
19
मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात ‘इंडिया’कडून महाभियोगाची तयारी; मतदारयादी त्रुटींबाबत आक्रमक
20
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले

जिल्ह्यात ग्रामपंचायतच्या ३६२ जागा बसपा लढविणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 00:26 IST

सध्या सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असताना सरकारकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा करून नागावले जात आहे.

ठळक मुद्देपत्रपरिषद : राजेश नंदूरकर यांची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : सध्या सर्वत्र दुष्काळसदृश स्थिती असताना सरकारकडून नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. कर्जमाफीची फसवी घोषणा करून नागावले जात आहे. ग्रामीण विकासाच्या नावावर आश्वासनेच दिली जात आहेत. याविरोधात जनमाणसात संताप आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी बहुजन समाज पक्ष हा बहुजन समाज पॅनलखाली ग्रामपंचायतीच्या ३६२ जागा लढविणार आहे, अशी माहिती बसपाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष डॉ. राजेश नंदूरकर यांनी पत्रपरिषदेत दिली.ग्रामीण भागातील जनतेत सरकारप्रती असंतोष आहे. अनेक ठिकाणी पुनर्वसनाचा प्रश्न प्रलंबित आहे. त्यांना मोबदला मिळाला नाही. व्याघ्र प्रकल्पाच्या समस्या कायम आहेत. याशिवाय ग्रामस्वच्छता, आरोग्य, शिक्षण आदी बाबतीत राज्य सरकार अपयशी ठरली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने बियर बारसाठी आखलेली ५०० मिटरची मर्यादा ही तरुणांसाठी धोकादायक आहे. या मर्यादेमुळे सर्वाधिक दारू दुकाने ही ग्रामीण भागात उघडले जाऊन तिथे अनेक समस्या निर्माण होणार आहेत. या सर्व प्रकाराला विरोध करण्यासाठी तसेच जनतेमध्ये जनजागृती करण्यासाठी बसपा प्रयत्न करणार आहे. शहरी भागातील नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी नगर परिषदांकडे पाठपुरावा केला जाणार असल्याचे डॉ. नंदूरकर म्हणाले. पत्रपरिषदेला बसपाचे जिल्हा महासचिव शशिकांत भोयर, जि.प. सदस्य रेखा भुसारी, शहर अध्यक्ष निरंजन दलाल, पवनी शहर अध्यक्ष राजाराम गणविर, संजय सावरकर, शबाना शेख, प्रिया शहारे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.